शहरं
Join us  
Trending Stories
1
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
2
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
3
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
4
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
5
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
6
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)
7
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
8
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
9
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
10
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
11
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
12
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
13
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
14
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
15
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
16
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
17
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
18
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
19
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?

रखडलेल्या उड्डाणपुलांमुळे प्रवासी वेठीस; वाशी खाडीपुलावर रोज चक्का जाम

By नामदेव मोरे | Published: December 14, 2022 8:57 AM

मुंबई-नवी मुंबईला जोडणारा प्रमुख मार्ग म्हणून सायन-पनवेल महामार्गाचा समावेश होतो.

- नामदेव मोरेलाेकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गावरील वाशी खाडीपूल व तुर्भे पुलाच्या रुंदीकरणाचे काम धिम्या गतीने सुरू असून, प्रतिदिन एक लाख वाहतूकदारांना याचा फटका बसत आहे. वाशी टोलनाका परिसरात नियमित चक्का जाम होत आहे. तुर्भेमध्ये वाहतूक बदलाचे सूचना फलकच नसल्यामुळे वाहतूकदारांना ठाणे-बेलापूर रोडवर पोहोचण्यासाठी दोन किलोमीटरचा वळसा घालावा लागत आहे. रिक्षा, टॅक्सीने प्रवास करणाऱ्यांच्या खिशालाही कात्री लागत असून, उड्डाणपुलांचे काम कधी पूर्ण होणार?, असा संतप्त प्रश्न प्रवासी विचारू लागले आहेत.

मुंबई-नवी मुंबईला जोडणारा प्रमुख मार्ग म्हणून सायन-पनवेल महामार्गाचा समावेश होतो. या मार्गावरून प्रतिदिन ८० हजार ते १ लाख वाहनांची ये-जा सुरू असते. या रोडवरील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी शासनाने वाशी खाडीपुलावर ऑक्टोबर २०२० पासून तिसरा पूल बांधण्याचे काम सुरू केले आहे. जवळपास ७७५ कोटी रुपये खर्च करून १२.७० मीटर रुंद व १८३७ मीटर लांबीच्या या पुलाचे काम नाेव्हेंबर २०२३ मध्ये काम पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु विविध कारणांमुळे हे काम रखडले असून, ते पूर्ण होण्यास २०२४ ची वाट पाहावी लागणार आहे. मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर वाशी गाव ते टोल नाका व नवी मुंबईकडे येणाऱ्या मार्गिकेवर टोल नाका ते खाडीपुलाच्या मध्यापर्यंत रोज वाहतूककोंडी होत आहे. जवळपास ८५० मीटर अंतर पूर्ण करण्यासाठी तीन मिनिटांऐवजी १५ ते ३० मिनिटे वेळ घालवावा लागत आहे.

वाशी खाडीपुलाप्रमाणे सायन-पनवेल महामार्गावर तुर्भे पुलाच्या विस्तारीकरणाचे कामही रखडले आहे. २०१९ मध्ये या पुलाचे काम सुरू केले आहे. जुलै २०२२ मध्ये हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु अद्याप रेल्वे मार्गिकेवरील गर्डर टाकायचे काम सुरू आहे. या पुलावरून ठाणे बेलापूर रोडवर तुर्भे नाक्याकडे जाणारी मार्गिका तोडण्यात आली आहे. याविषयी योग्य सूचना फलक लावण्यात आलेले नाहीत. यामुळे अनेक वाहतूकदारांना शिरवणे व नेरूळवरून वळसा घालून यावे लागत आहे. सानपाडावरून रिक्षाने व टॅक्सीने एमआयडीसीकडे जाणाऱ्या नागरिकांना जादा पैसे मोजावे लागत आहेत.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी