शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचा नेता ठाकरेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश; सावंतवाडीत दीपक केसरकरांची चिंता वाढली?
2
IAS अधिकारी रानू साहू यांना अटक, 540 कोटींचा DMF घोटाळा काय?
3
15 विधानसभा उमेदवारांची नावे असलेली यादी व्हायरल; काँग्रेसने सांगितलं सत्य काय?
4
इस्रायलच्या हल्ल्यात हमास प्रमुख याह्या सिनवार ठार; 3 महिन्यांत 3 मोठे शत्रू संपवले
5
Women's T20 World Cup: ऑस्ट्रेलियाचा खेळ खल्लास; दक्षिण आफ्रिकेनं दिमाखात गाठली फायनल
6
Mahayuti: "रामटेकमध्ये जयस्वाल नकोच, महायुतीने दुसरा उमेदवार द्यावा"
7
आज माझं कुटुंब कोसळलं आहे, पण...; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर मुलगा झिशान सिद्दिकींनी काय आवाहन केलं?
8
'जुन्या गोष्टी विसरुन भविष्याकडे वाटचाल करा', भारत-पाक संबंधांवर नवाझ शरीफ स्पष्ट बोलले
9
"वरोराची जागा भाजपलाच हवी, अन्यथा...", पक्षाला इशारा, इच्छुक धडकले कार्यालयात
10
सरकारनं खेळाडूंची बक्षिसं दिली नाहीत, विश्वविजेत्या संघातील काहींशी चर्चा झाली; आव्हाडांचा दावा
11
"तुमच्यात धमक असेल, तर..."; प्रवीण दरेकरांचं मनोज जरांगेंना खुलं आव्हान
12
'या खुर्चीने दगा दिला ऐसा की...'; शिंदेंच्या सेनेने ठाकरेंना व्यंगचित्रातून डिवचलं
13
IPL 2025: काव्या मारन खेळणार मोठा डाव; पॅट कमिन्स नव्हे, 'हा' स्टार क्रिकेटर खाणार जास्त 'भाव'
14
विधानसभेला भाजपचे प्रभाकर पाटील 'घड्याळ' हातात बांधणार?; महायुतीत हालचाली गतीमान; लवकरच शिक्कामोर्तब!
15
दोन महिन्यांपासून ठावठिकाणा नाही, शेख हसिना आहेत कुठे? समोर आली अशी माहिती
16
INDW vs NZW : टीम इंडियाची घोषणा! हरमनबद्दलच्या चर्चांना पूर्णविराम; रिचा १२वी बोर्ड परीक्षेमुळे मुकणार
17
माजी खासदार संभाजीराजेंचा मोठा गौप्यस्फोट; "लोकसभा निवडणुकीत काँग्रेस हायकमांडनं..."
18
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खासगी प्रवासी बसची टेम्पोला धडक; अपघातात २३ जण जखमी 
19
१८०० वर इच्छुकांसोबत आज केवळ चर्चा, निर्णय अंतिम बैठकीत समाज घेणार: मनोज जरांगे
20
पुन्हा रेल्वे अपघात, लोकमान्य टर्मिनल एक्स्प्रेसचे ८ डबे रुळावरून घसरले; आसाममध्ये रेल्वे सेवा विस्कळीत

गरीब विद्यार्थ्यांना आयुक्तांनी वेठीस धरले

By admin | Published: February 04, 2017 3:44 AM

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बहुजन, कष्टकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक सुविधांपासून वंचित ठेवले आहे. त्यांच्या विरोधात आवाज उठविणाऱ्याविरोधात वैयक्तिक

नवी मुंबई : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बहुजन, कष्टकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक सुविधांपासून वंचित ठेवले आहे. त्यांच्या विरोधात आवाज उठविणाऱ्याविरोधात वैयक्तिक स्तरावर उतरून त्रास दिला जात आहे. अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतरही शहरवासीयांना त्रास देण्यासाठी शासनाने त्यांना येथे ठेवले असून त्यांच्याविरोधात विद्यार्थी, पालकांना घेवून भीक मांगो आंदोलन करणार असल्याचा इशारा महापौर सुधाकर सोनावणे यांनी दिला आहे. महापौर सुधाकर सोनावणे यांनी पत्रकार परिषद घेवून आयुक्तांच्या कार्यशैलीवर जोरदार टीका केली. शहरात ८ महिन्यांपासून लोकशाही पायदळी तुडविली जात आहे. लोकशाही मूल्यांना तिलांजली देवून कामकाज सुरू आहे. आयुक्तांच्या कार्यशैलीवर आक्षेप घेणारांना वैयक्तिक स्तरावर जावून त्रास देण्याचा व आवाज दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. पालिका शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गणवेश व इतर सुविधांपासून वंचित ठेवण्यात आले आहे. भ्रष्टाचाराचा गवगवा करून शैक्षणिक साहित्याचा ठेका रद्द केला. नंतर कमी पैशात साहित्य देण्याचा बहाणा केला, पण वर्षभरात साहित्य दिले नाही.आॅडिओ व्हिज्युअल व संगणक शिक्षणाचे काम थांबविले. जाणीवपूर्वक गरीब विद्यार्थ्यांना सुविधांपासून वंचित ठेवले आहे. १५ दिवसांमध्ये शिक्षक आणतो अशी घोषणा केली होती, पण अद्याप शिक्षक उपलब्ध झाले नाहीत. जे ठोक मानधनावर शिक्षक होते त्यांना कमी करण्याचा प्रयत्न झाला. न्यायालयात जावून त्यांनी स्थगिती मिळविली व विनावेतन शिक्षणाचे काम करत आहेत. उपाशी माणूस मुलांना कसा शिकविणार. परीक्षा संपल्यानंतर शिक्षकांच्या बदल्या करा असे सांगूनही ऐकले जात नाही. मुद्दाम बदल्या करून विद्यार्थ्यांचे नुकसान केले जात आहे. आयुक्तांनी गरीब मुलांच्या शिक्षणाची खेळ सुरू केल्याने त्यांच्या विरोधात पालकांना घेवून भीक मांगो आंदोलन करण्याचा इशाराही सोनावणे यांनी दिला आहे. महापालिकेतील १११ पैकी १०५ नगरसेवकांनी अविश्वास ठराव मंजूर केल्यानंतरही राज्य शासनाने अद्याप त्यांची बदली केलेली नाही. नवी मुंबईकरांना त्रास देण्यासाठीच त्यांना येथे ठेवले जात असल्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. आता आम्ही गप्प बसणार नाही. यापुढे आंदोलन तीव्र केले जाईल. रबाळेमध्ये राजश्री शाहू महाराज विद्यालय व हिंदी माध्यमाच्या शाळा आम्ही चांगल्या पद्धतीने चालवत आहोत. पण तेथील मुख्याध्यापकांची मुद्दाम बदली करण्यात आली. जाणीवपूर्वक शुक्रवारी आदेश जारी केले जातात. जेणेकरून न्यायालयात जावून दाद मागता येवू नये. अशाप्रकारे काम करून त्रास देण्याचे प्रकार थांबविले जावेत असे मतही त्यांनी व्यक्त केले. महापौरांनी केलेले आरोप - आयुक्तांकडून लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडविली जात आहेत- बहुजन, कष्टकरी विद्यार्थ्यांना सुविधांपासून वंचित ठेवले- आयुक्तांविरोधात आवाज उठविणाऱ्यांना वैयक्तिक स्तरावर जावून त्रास - परीक्षा संपण्यापूर्वीच शिक्षकांच्या केल्या बदल्या - डॉ. आंबेडकर स्मारकाच्या डोमला मार्बल लावण्यास विरोध - विद्यार्थ्यांना गणवेश, वह्या उपलब्ध करून देण्यात अपयश