शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

भाजपला सत्ता दिल्यास देश कर्जात बुडेल, नेरूळमध्ये प्रकाश आंबेडकरांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2024 12:28 IST

‘इस बार ४०० पार’ असा प्रचार भाजपकडून केला जात आहे; परंतु या जागा निवडून आणायच्या की नाही, हे मतदारांच्या हातात असून, इसबार सेक्युलर विचारांचे सरकार येणार असल्याचे ते म्हणाले.

नवी मुंबई : २०१४ सालापूर्वी देशातील प्रत्येक नागरिकावर १०० पैकी २४ रुपये कर्ज होते. मात्र, मागील दहा वर्षांत हेच कर्ज ८४ रुपयांवर पोहोचले आहे. म्हणजेच १० वर्षांत प्रत्येक नागरिकावर तब्बल ६० रुपयांचे कर्ज वाढले असून, २०२६ साली देश कर्जात बुडालेला असेल, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली. तुम्हाला कर्जात बुडायचे नसेल, तर भाजपच्या विरोधात मतदान करा, असे आवाहन त्यांनी नेरूळमध्ये बुधवारी झालेल्या सत्ता परिवर्तन महासभेत उपस्थितांना केले.

‘इस बार ४०० पार’ असा प्रचार भाजपकडून केला जात आहे; परंतु या जागा निवडून आणायच्या की नाही, हे मतदारांच्या हातात असून, इसबार सेक्युलर विचारांचे सरकार येणार असल्याचे ते म्हणाले. भाजपने देशातील व्यवस्था बिघडवली असून, मागील १० वर्षांत सुमारे ३० ते ३५ हजार छापे टाकले आहेत; परंतु यामधील किती जणांना कोर्टाने शिक्षा सुनावली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

देशातील प्रत्येक राज्यात छापे पडत असताना गुजरातमध्ये एकही छापा पडलेला नसल्याची टीका त्यांनी यावेळी केली. राज्यातील अनेक उद्योग, कारखाने गुजरातला गेले असून, पुन्हा पाच वर्षे भाजपला दिल्यास सर्वच कारखाने गुजरातेत जातील, असे ते म्हणाले. मोदी हे देशापेक्षा गुजरातचेच पंतप्रधान अधिक असल्याची टीका यावेळी आंबेडकर यांनी केली. 

यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रेखा ठाकूर, युवक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नीलेश विश्वकर्मा, दिलीप बंदीचोडे, शिल्पा रणदिवे, डी.डी. गायकवाड आदी उपस्थित होते. यावेळी शेतकरी कामगार पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडी पक्षात प्रवेश केला. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीBJPभाजपाlok sabhaलोकसभा