शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

उमेदवारी ठरविताना आर्थिक निकषांना प्राधान्य

By admin | Published: May 03, 2017 6:18 AM

पनवेल महापालिका निवडणुकीमध्ये उमेदवारी ठरविताना जनसंपर्क, सामाजिक कार्य यापेक्षा आर्थिक निकषांना प्राधान्य दिले जात

वैभव गायकर / पनवेलपनवेल महापालिका निवडणुकीमध्ये उमेदवारी ठरविताना जनसंपर्क, सामाजिक कार्य यापेक्षा आर्थिक निकषांना प्राधान्य दिले जात आहे. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूक प्रतिष्ठेची बनविल्यामुळे उमेदवार ठरविताना त्याच्या कामाबरोबर कोण किती खर्च करणार याला जास्त महत्त्व दिले जावू लागले आहे. यामुळे वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे पक्षाचे काम करणारे पालखीचे भोई ठरत आहेत. राजकीय पक्षाचा विस्तार करण्यासाठी व तो जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रामाणीक कार्यकर्त्यांची गरज असते. कार्यकर्ते निवडणूक असो किंवा नसो पक्षाची व नेत्याची भूमिका सदैव जनतेपर्यंत घेवून जाण्याचा प्रयत्न करत असतात. वर्षभर गणेशोत्सव, दहीहंडीपासून ते हळदीकुंकू समारंभापर्यंत सर्व कार्यक्रम राबविण्यात येतात. प्रभागातील एखादी व्यक्ती आजारी पडली किंवा निधन झाले तर हेच कार्यकर्ते सगळ्यात अगोदर रूग्णालयात हजर असतात. २४ तास नागरिकांच्या मदतीला व नेत्यांच्या आदेशाचे पालन करण्यात घालविण्यात येतात. पण निवडणूक आली की प्रामाणिक कार्यकर्त्यांपेक्षा आर्थिक स्थिती कोणाची चांगली आहे हे पाहून उमेदवारी निश्चित करण्यात येत आहे. पनवेल महापालिका निवडणुकीमध्येही हीच स्थिती निर्माण होवू लागली आहे. निवडणुकीच्या तोंडावर पक्षात आलेल्यांना व दुसऱ्या पक्षातून तिकीट मिळाले नसल्याने आयत्या वेळी पक्षात घेवून उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. महापालिका निवडणुकांसाठी चार ते पाच महिन्यांपासून अनेक प्रमुख पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. प्रत्येक प्रभागात संभाव्य उमेदवार कोण असणार याची चाचपणी केली जात आहे. संभाव्य उमेदवारांशी चर्चा करताना निवडणुकीत किती खर्च करू शकणार असा प्रश्नही विचारला जावू लागला होता. यापूर्वी पनवेल नगरपालिका, खारघर ग्रामपंचायत व इतर अनेक निवडणुकांमध्ये काही उमेदवारांकडे १०० ते २०० कोटी रूपयांची मालमत्ता असल्याचे निदर्शनास आले होते. ग्रामपंचायतीसाठी करोडो रूपयांचा खर्च झाल्याच्या चर्चा होत्या. आता महापालिका निवडणुकीसाठी भरमसाट खर्च होण्याची शक्यता गृहीत धरूनच श्रीमंतांनाच उमेदवारी देण्याकडे सर्वांचा कल आहे. राज्य निवडणूक आयोगाने प्रत्येक उमेदवाराला ५ लाखांची खर्च मर्यादा ठरवून दिली आहे. परंतु काही राजकीय पक्षांनी ५० लाख रूपये खर्चाची तयारी असेल तरच उमेदवारी मागा अशा शब्दात सुनावल्याची चर्चा सुरू झाली आहे. उमेदवारी ठरविताना उमेदवाराचे शिक्षण, त्याने आतापर्यंत केलेले सामाजिक काम, पक्ष वाढविण्यासाठी घेतलेली मेहनत हे सर्व विषय गौण ठरत आहेत. मतदारांना आमिषमहापालिका निवडणुकीमध्ये मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम उमेदवारांकडून प्रयत्न होवू शकतो. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये प्रत्येक मतासाठी मोबदला देण्याबरोबर फ्रीज, इन्व्हर्टर ते दुचाकीचे आमिष दाखविल्याची चर्चा होती. खानावळ ही आता सामान्य गोष्ट झाली असून निवडणुकीमध्ये हे प्रकार थांबविण्याचे आव्हान निवडणूक विभागासमोर असणार आहे. श्रीमंत उमेदवारांची परंपरापनवेल तालुक्यामध्ये खारघर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी काही वर्षांपूर्वी एका उमेदवाराने २०० कोटी रूपयांची मालमत्ता जाहीर केली होती. राज्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार म्हणून त्या उमेदवाराची चर्चा झाली होती. याशिवाय पनवेल नगरपालिका व इतर ग्रामपंचायतीमध्येही अनेक उमेदवारांची संपत्ती डोळे दिपविणारी होती. पहिल्यांदा महापालिका निवडणूक होत असल्याने श्रीमंत उमेदवारांची परंपरा कायम राहण्याची शक्यता आहे.