शहरं
Join us  
Trending Stories
1
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
2
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
3
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
4
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
5
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
6
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
7
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
8
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
9
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
10
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
11
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
12
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
13
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
14
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
15
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
16
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
17
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
18
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
19
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
20
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

सीआरझेड क्षेत्रात बालाजी मंदिर बांधण्यास मनाई करा; नवी मुंबईतील पर्यावरणप्रेमींचे चंद्राबाबू नायडूंना पत्र

By नारायण जाधव | Published: June 13, 2024 5:59 PM

सीआरझेड क्षेत्रात बांधण्यात येत असलेल्या या मंदिराबाबत चिंता व्यक्त करून पर्यावरणवाद्यांनी चंद्राबाबू नायडू यांना तातडीने ई-मेल पाठवले आहे.

नारायण जाधव, नवी मुंबई : आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी चंद्राबाबू नायडू यांनी पदभार स्वीकारताच, नवी मुंबईतील पर्यावरणप्रेमींनी त्यांना पत्र लिहून येथील उवले येथे पूरप्रवण व सीआरझेड क्षेत्रात तिरुपती बालाजी मंदिर बांधण्यास मनाई संबंधित देवस्थानला मनाई करावी, असे साकडे घातले आहे. सीआरझेड क्षेत्रात बांधण्यात येत असलेल्या या मंदिराबाबत चिंता व्यक्त करून पर्यावरणवाद्यांनी चंद्राबाबू नायडू यांना तातडीने ई-मेल पाठवले आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानमचे मंदिर प्रशासन आंध्र प्रदेश सरकारच्या अखत्यारीत येते. यामुळे नायडू या पत्रावर काय भूमिका घेतात, याकडे पर्यावरणप्रेमींचे लक्ष लागले आहे. सिडकोने अटल सेतूसाठीच्या कास्टिंग यार्डसाठी तात्पुरत्या दिलेल्या ४० हजार चौरस मीटरचा भूखंडाच्या काही क्षेत्रावर हे मंदिर बांधण्यात येत आहे, पूर्वी हा परिसर मासेमारी क्षेत्र होता.

नायडूंना पाठवलेल्या ई-मेलमध्ये, नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी सीआरझेड क्षेत्रात बांधण्यात येत असलेल्या तिरुपती बालाजी मंदिराच्या बांधकामाबाबत आश्चर्य व्यक्त करून एकीकडे जगभर समुद्राच्या वाढत्या पातळीमुळे किनारी भागांना धोका निर्माण झाला आहे, अशा वेळी अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर एखादे मोठे मंदिर बांधणे शहाणपणाचे आहे का? असा प्रश्न केला आहे. मंदिराच्या जागेची उंची वाढवण्यासाठी भराव केला तरी आजूबाजूचा परिसर बुडून जाईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

मंदिराची जागा अत्यंत पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र आहे आणि पूररेषा त्या जागेतून कापली जाते. कुमार यांनी तेलगू देसम पक्षाचे प्रवक्ते नीलयपालम विजयकुमार यांच्या ऑगस्ट २०२१ मध्ये मंदिराच्या प्रकल्पात घाई केल्याबद्दल तत्कालीन राज्य सरकारची निंदा करणाऱ्या बातमीकडेही नायडू यांचे लक्ष वेधले आहे.

मंदिरासाठी इतरत्र भूखंड शोधामंदिराच्या बांधकामास विरोध नाही; परंतु नवी मुंबईतच जिथे जमिनीची कमतरता नाही, अशा पर्यावरणदृष्ट्या सुरक्षित भागात पूजास्थळ बांधावे, अशी सूचना केली आहे. कास्टिंग यार्डच्या बांधकामापूर्वी स्थानिक मासेमारी समुदाय येथे त्यांचे कार्य करत होते, असे सागरी शक्तीसह महाराष्ट्र लघु पारंपरिक मासे कामगार संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार पवार यांनी सांगितले. दरम्यान, नॅटकनेक्टने मंदिराच्या भूखंड वाटपाला आव्हान देणारा अर्ज यापूर्वीच राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे (एनजीटी) दाखल केला आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई