शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

रायगडाला शिवकालीन वैभव प्राप्त करून देता येईल

By admin | Published: January 20, 2016 2:04 AM

सरकारची इच्छा असेल तर हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडाची पुनर्बांधणी आणि या गडाला शिवकालीन गतवैभव प्राप्त करून देणे शक्य असल्याचे प्रतिपादन

महाड : सरकारची इच्छा असेल तर हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडाची पुनर्बांधणी आणि या गडाला शिवकालीन गतवैभव प्राप्त करून देणे शक्य असल्याचे प्रतिपादन कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी केले. रायगड महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या महोत्सवाच्या रूपरेषेविषयी सोमवारी सायंकाळी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे नितीन देसाई यांनी महाड येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी देसाई यांनी किल्ले रायगड आणि पाचाड येथील जिजामाता समाधीस्थळाच्या दयनीय अवस्थेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. शिवनेरी किल्ल्याच्या धर्तीवर रायगड किल्ल्याच्या पुनर्बांधणीचा आराखडा तयार असून केंद्र व राज्य शासनाने त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला तर पाच ते दहा वर्षांत या गडाला शिवकालीन वैभव प्राप्त करुन देता येईल. त्यासाठी एक शिवभक्त आणि मावळा म्हणून त्यात सहभागी होण्यास आपण तयार असल्याचेही देसाई यांनी यावेळी सांगितले. राज्य सरकारने रायगडावर २१ ते २४ जानेवारी या कालावधीत रायगड महोत्सवाचे आयोजन केले आहे. गडावर आणि गडाच्या पायथ्याशी पाचाड येथे नितीन देसाई यांच्या संकल्पनेतून शिवसृष्टी (तात्पुरती) आणि शिवकालीन वातावरण निर्माण करण्याचे काम सुरू आहे. याबाबत बोलताना नितीन देसाई यांनी सांगितले की, रायगड महोत्सव म्हणजे माझ्यासाठी एक शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे. गडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचा जिवंत देखावा सादर करुन हा सोहळा जगासमोर आणण्याचे काम या महोत्सवाच्या माध्यमातून केले जाणार आहे. यातून गडाचा विकास साधण्यासाठी एक नवे पाऊल उचलले जाईल, असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला आहे. किल्ले रायगड परिसरात कायमस्वरुपी शिवसृष्टी उभी राहावी. मात्र पुरातत्व विभागाच्या नियमांमुळे गडावर शिवसृष्टी उभारता येणे शक्य नाही. महोत्सवाच्या काळात शिवकालीन इतिहास जगासमोर येईल, अशी व्यवस्था करण्यात येत असल्याचेही देसाई यांनी यावेळी स्पष्ट केले. महोत्सवाच्या काळात किमान २५ हजार शिवभक्त गडावर येतील, अशी अपेक्षा देसाई यांनी व्यक्त केली. रोपवेची मर्यादा लक्षात घेता या रोपवेचा वापर शक्यतो ज्येष्ठ नागरिकांना करु द्यावा आणि तरुणांनी पायऱ्यांनी चढून गडावर जावे, असे आवाहन देसाई यांनी केले. रायगड महोत्सवासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. (वार्ताहर)