शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
3
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
4
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
5
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
6
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
7
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
8
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
9
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
10
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
11
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
12
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
13
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
14
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
15
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
16
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
17
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
18
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
19
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
20
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी

रिक्षाचालकांची मनमानी सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2018 2:55 AM

सुनियोजित शहर अशी ओळख असलेल्या नवी मुंबई परिसरात बेशिस्त रिक्षा चालकांमुळे ही ओळख पुसली जाणार की काय अशी शंका उपस्थित केली जात आहे.

नवी मुंबई : सुनियोजित शहर अशी ओळख असलेल्या नवी मुंबई परिसरात बेशिस्त रिक्षा चालकांमुळे ही ओळख पुसली जाणार की काय अशी शंका उपस्थित केली जात आहे. शहरातील प्रत्येक रेल्वे स्थानकाबाहेर लागूनच प्रशस्त बस टर्मिनल्स, पार्किंग आणि रिक्षा-टॅक्सी स्टँडचीही व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु काही रेल्वे स्थानकाबाहेर पडताच प्रवाशांना रिक्षाचालकांच्या बेशिस्तपणाचा सामना करावा लागत आहे. स्थानकांबाहेर नियोजित रिक्षा तळ असून रिक्षांना व प्रवाशांना रांग लावण्याची व्यवस्था आहे. असे असूनही रिक्षाचालक प्रवासी मिळविण्याच्या चढाओढीत मनमानीपणे रिक्षा उभ्या करताना दिसून येतात.वाशी, सानपाडा, नेरुळ आदी रेल्वेस्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. त्यात आपल्या रिक्षाला सर्वप्रथम भाडे मिळावे यासाठी रिक्षाचालक अगदी स्थानकांच्या तोंडावर आपल्या रिक्षा उभ्या करतात. पोलिसांच्या अनुपस्थितीत रिक्षाचालक आपल्या बेलगाम वागण्याने प्रवाशांना हैराण करून सोडतात. त्यातच शेअर आॅटो हा प्रवाशांच्या सोयीचा ठरणारा प्रवास वाहतुकीसाठी त्रासदायक ठरू लागला आहे. ग्राहक मिळण्यासाठी बस,रेल्वे थांब्यांवरतीच रिक्षा आणून थांबविण्याचा प्रकार बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी त्रासदायक ठरू लागला आहे. संध्याकाळी लोकल आल्याने प्रवासी बाहेर पडताच, रिक्षाचालक प्रवाशांसाठी भर रस्त्यात रिक्षा थांबवतात.अनेकदा एखादा प्रवासी कमी असल्यास तो प्रवासी मिळेपर्यंत रिक्षाचालक रिक्षा जागेवरून हलवत नाहीत. मग त्यामुळे कितीही वाहतूककोंडी झाली तरी त्याकडे ते दुर्लक्ष करतात. त्यात रस्त्याच्या निम्म्या भागात काँक्र ीटीकरणाचे काम सरू असल्याने निम्माच रस्ता वापर योग्य आहे. त्यामुळे प्रवाशांना रस्त्यावरून चालणेही कठीण होत आहे. रात्रीच्या वेळी रिक्षाचालकांची ही मुजोरी अधिक प्रमाणात दिसून येते. प्रवासी मिळवण्याच्या वादात अनेकदा रिक्षाचालकांतच भांडणे पाहायला मिळतात.