शहरं
Join us  
Trending Stories
1
Baba Siddique : कुरिअरने दिलं पिस्तूल, एडवान्स पेमेंट; बाबा सिद्दिकींच्या हत्येचा बनवला होता 'मास्टर प्लॅन'
2
'नेत्यांची दिवसाढवळ्या हत्या होणं म्हणजे महाराष्ट्रातील गृहखातं फेल'; अजितदादांच्या आमदाराने देवेंद्र फडणवीसांच्या खात्याला फटकारलं
3
बाबा सिद्दिकींची संपत्ती किती? ईडीने ४६२ कोटींची मालमत्ता जप्त केलेली, सहा महिन्यांपूर्वीच आले राष्ट्रवादीत
4
Baba Siddique : लॉरेन्स बिश्नोई गँगने पंजाब जेलमध्ये रचला बाबा सिद्दिकींच्या हत्येचा कट, अडीच लाखांची सुपारी अन्...
5
Rahul Gandhi : "महाराष्ट्रातील कायदा, सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली; सरकारने जबाबदारी स्वीकारली पाहिजे"
6
आज अजित पवारांच्या स्टेजवर जाणार; काँग्रेसच्या निलंबनानंतर आमदार सुलभा खोडकेंची घोषणा
7
बाबा सिद्दिकींच्या जवळचाच कोणीतरी हल्लेखोरांना माहिती देत होता? पोलिसांना संशय, दोन आरोपी ताब्यात
8
Supriya Sule : "राज्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा..."; बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सुप्रिया सुळेंची पोस्ट
9
कोण होते बाबा सिद्दिकी? ज्यांनी मिटवला होता सलमान आणि शाहरुख खानमधील वाद, बॉलिवूडशी होतं खास कनेक्शन
10
रामलीलामध्ये कुंभकर्णाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचा हार्ट अटॅकने मृत्यू, खाली कोसळला अन्...
11
माझ्या गावचा मुलगा, घरकुल नाही आम्ही त्याला चांगले मोठे घर बांधून देणार; अजित पवारांच्या सूरजबाबत मोठ्या घोषणा
12
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर रितेश देशमुखची संतप्त पोस्ट, म्हणाला- "गुन्हेगारांना..."
13
बाबा सिद्दिकींना गोळी लागल्याचे कळताच सलमान, संजय दत्त, शिल्पा शेट्टीची रुग्णालयाकडे धाव
14
आजचे राशीभविष्य १३ ऑक्टोबर २०२४; दिलेले पैसे वसूल करता येतील, विवाहेच्छुकांसाठी आशादायी...
15
माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकींची गाेळ्या झाडून हत्या; ३ गोळ्या लागल्या, दोघे ताब्यात
16
दोन महिने थांबा, सत्तेत येतोय; कोणालाही सोडणार नाही...; दसरा मेळाव्यात ठाकरेंचे मुख्यमंत्री म्हणूनच ‘प्रोजेक्शन’
17
अंतराळातून टेहळणीसाठी भारत प्रक्षेपित करणार तब्बल ५२ उपग्रह; पाकिस्तान-चीनच्या हालचालींवर ठेवणार करडी नजर
18
दसऱ्याच्या दिवशी ईडीची छापेमारी, रांचीत खळबळ
19
जातीच्या आधारावर संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न; विजयादशमी उत्सवात डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता 
20
बांगलादेशमध्ये दुर्गापूजेशी संबंधित ३५ अनुचित घटना, भारताची तीव्र शब्दांत नाराजी

छाननीमध्ये हरकती, आक्षेपांना बगल

By admin | Published: February 08, 2017 4:21 AM

निवडणुका म्हटल्या की उमेदवारी अर्जाच्या छाननीपासूनच एकमेकांना जेरीस आणण्याची संधी राजकीय पक्षांनी कधीच सोडली नाही.

अलिबाग : निवडणुका म्हटल्या की उमेदवारी अर्जाच्या छाननीपासूनच एकमेकांना जेरीस आणण्याची संधी राजकीय पक्षांनी कधीच सोडली नाही. हरकती आक्षेप घेऊन विरोधकांच्या उमेदवारांना अडचणीत आणून तो निवडणुकीच्या रिंगणातून बाद कसा होईल हे पाहिले जायचे मात्र आताच्या निवडणुकीत समोरासमोर थेट लढूनच विरोधी उमेदवाराला नामोहरण करण्याची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी केल्याचे मंगळवारच्या छाननी प्रक्रियेच्या वेळी दिसून आली. अलिबाग तालुक्यातील चेंढरे जिल्हा परिषद गटातून एका उमेदवाराचा अर्ज छाननीमध्ये बाद करण्यात आला. रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी प्राप्त झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया मंगळवारी पार पडली. काँग्रेस, शिवसेना, शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांच्या उमेदवारांवर हरकती आक्षेप घेण्याचे प्रमाण अल्प असल्याचे दिसून आले. सर्वच राजकीय पक्षांनी समझोत्याची भूमिका घेतली. हाच ट्रेंड अन्य तालुक्यांमध्येही कमी-अधिक प्रमाणात दिसून आला. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका या समोरासमोर थेट लढण्याचे संकेत राजकारण्यांनी दिल्याचे दिसून येते.अलिबाग तालुक्यातील चेंढरे जिल्हा परिषद गटातून एका उमेदवाराचा अर्ज छाननीमध्ये बाद करण्यात आला. त्यामुळे आता जिल्हा परिषदेच्या सात जागांसाठी ३८ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. पंचायत समितीच्या १४ जागांसाठी ६६ उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत. मंगळवारी सकाळी उमेदवारी अर्जाच्या छाननी प्रक्रियेला सुरुवात झाली. त्यावेळी शिवसेनेचे महेंद्र दळवी, विजय कवळे, दीपक रानवडे, काँग्रेसचे प्रदेश सदस्य अ‍ॅड. जे.टी. पाटील, हर्षल पाटील, अ‍ॅड. कौस्तुभ पुनकर, शेकापचे संजय पाटील, अ‍ॅड. सचिन जोशी, अ‍ॅड.परेश देशमुख, अजय झुंझारराव, राष्ट्रवादी काँग्रेसचे ऋषिकांत भगत विविध राजकीय पक्षांचे उमेदवार, नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रांताधिकारी कार्यालयात उपस्थित होते. एकमेकांच्या उमेदवारांबाबत काही आक्षेप आहेत का, अशी विचारणा शिवसेनेचे महेंद्र दळवी यांनी शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह पदाधिकारी यांना केली. त्यावेळी कोणाचेही कोणाच्या उमेदवाराबाबत आक्षेप नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे उमेदवारी अर्जाच्या छाननी प्रक्रियेच्या वेळी प्रांताधिकारी यांनी आक्षेप आहे, का असे विचारले असता, कोणीच आक्षेप घेतला नाही. राजकारण्यांमध्ये समझोताच्अलिबागमध्ये कोणाचाही उमेदवाराबाबत आक्षेप नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे उमेदवारी अर्जाच्या छाननी प्रक्रियेच्या वेळी प्रांताधिकारी यांनी आक्षेप आहे, का असे विचारले असता, कोणीच आक्षेप घेतला नाही. त्यामुळे छाननी प्रक्रिया वेळेत पूर्ण होण्यास मदत झाली. आक्षेप असते, तर कालावधी लांबण्याची शक्यता होती. राजकीय नेत्यांनी आपापसात समझोता करुन घेतल्याने निवडणुका शांततेत पार पडणार असल्याचे बोलले जाते. अन्य तालुक्यांमध्येही असेच कमी-अधिक प्रमाणात समझोते झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे पोषक वातावरणात निवडणुका लढण्याची मानसिकता राजकारण्यांनी केल्याचे दिसून येते. उमेदवाराच्या उमेदवारीवर हरकती, आक्षेप घेत तो रिंगणातून बाद कसा होईल हे पाहिले जायचे. आता मात्र त्याला जिल्ह्यामध्ये छेद दिल्याचे चित्र आहे.कर्जत तालुक्यात १८ जागांसाठी १११ उमेदवार रिंगणात1 कर्जत : जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी २१ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. सोमवारी ६ फेब्रुवारी रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणात एकूण १२४ नामनिर्देशनपत्रे दाखल झाली होती. मंगळवारी छाननीच्या वेळी जिल्हा परिषद गटामध्ये १ तर पंचायत समिती गणामध्ये १ अशी दोन नामनिर्देशनपत्रे अवैध ठरली आहेत. काही उमेदवारांनी सुरक्षितता म्हणून दोन नामनिर्देशनपत्रे दाखल केली होती. त्यामुळे त्यापैकी एक नामनिर्देशनपत्र ग्राह्य धरल्याने १११ नामनिर्देशनपत्रे वैध ठरविण्यात आली. असे असले तरी १३ फेब्रुवारीला नामनिर्देशनपत्र मागे घेण्याच्या अंतिम मुदतीनंतरच खरे चित्र स्पष्ट होईल.2मंगळवारी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयात नवी मुंबई महानगर पालिका अतिरिक्त आयुक्त तथा निवडणूक निरीक्षक रमेश चव्हाण यांच्या निरीक्षणाखाली निवडणूक निर्णय अधिकारी दत्ता भडकवाड यांनी छाननी सुरु केली. कळंब, पाथरज, उमरोली, नेरळ, सावेळे, बीड असे जिल्हा परिषदेचे सहा गट आहेत. त्यामध्ये ४० नामनिर्देशनपत्रे दाखल होती, मात्र छाननीत उमरोली गटातील अरु ण भोईर यांनी अनामत रक्कम न भरल्यामुळे त्यांचे नामनिर्देशनपत्र अवैध ठरले तर काही उमेदवाराची दोन नामनिर्देशनपत्रे होती त्या एकच ग्राह्य धरल्याने जिल्हा परिषद गटामध्ये ३८ नामनिर्देशनपत्रे वैध आहेत.