शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

दहा लाख प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर

By admin | Published: June 27, 2017 3:35 AM

सायन-पनवेल महामार्गाचे रुंदीकरण केल्यानंतर वाहतुकीचा प्रश्न सुटण्याऐवजी गंभीर बनला आहे. भुयारीमार्गाची दुरवस्था झाली आहे.

नामदेव मोरे । लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गाचे रुंदीकरण केल्यानंतर वाहतुकीचा प्रश्न सुटण्याऐवजी गंभीर बनला आहे. भुयारीमार्गाची दुरवस्था झाली आहे. रोडवर सर्वत्र खड्डे पडले असून, निकृष्ट कामामुळे रोज १० ते १५ अपघात होत आहेत. पोलिसांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, एसपीटीपीएल व शासनाला शेकडो पत्रे दिली असून तीनही यंत्रणांनी दुरुस्तीचे काम करण्यास नकार दिला आहे. या मार्गावरून रोज प्रवास करणाऱ्या दहा लाख प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आली असून, शासकीय यंत्रणा व टोलवेज कंपनीविरोधात असंतोष वाढू लागला आहे. महामार्गावर उरण फाट्याजवळ चंद्रकांत येशी यांच्या मोटारसायकलला रविवारी पहाटे कंटेनरने धडक दिली. या आपघातामध्ये चंद्रकांत येशी यांचा जागीच मृत्यू झाला आहे. यामुळे महामार्गावरील प्रवास व वाहनधारकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शासनाने सायन-पनवेल महामार्गावरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी व अपघात कमी करण्यासाठी करोडो रुपये खर्च करून रोडचे रुंदीकरण केले आहे; परंतु ठेकेदाराने अद्याप काम पूर्ण केलेले नाही. रोडवर खड्डे पडले असून, उरण फाट्यावरील उड्डाणपुलावरील निसरड्या रोडमुळे रोज अपघात होत आहेत. रुंदीकरण केल्यानंतर या मार्गावरील वाहतूककोंडी व अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. उरण फाट्यावरील उड्डाणपुलावर पाऊस सुरू झाल्यापासून रोज किमान दहा अपघात होत आहेत. वाशी गावाजवळ भुयारी मार्गाचे काम अर्धवट राहिले आहे. तुर्भे पोलीस स्टेशनजवळील पादचारी पुलाचे काम अर्धवट राहिले आहे. शिरवणे भुयारी मार्ग व बाजूचा पूर्ण रोड खड्डेमय झाला असून तेथून वाहने चालविणे म्हणजे अपघाताला आमंत्रण देणे, अशी स्थिती आहे. उरण फाटा हा तर मृत्यूचा सापळाच बनला आहे. सीबीडी जंक्शनजवळ अद्याप सिग्नल बसविण्यात आलेला नाही. खारघर ते कामोठेपर्यंतची स्थितीही बिकट असून याकडे कोणीही गांभीर्याने लक्ष देत नाही. नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी महाराष्ट्र शासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, एसपीटीपीएल कंपनी या सर्वांना आतापर्यंत शेकडो पत्रे दिली आहेत. प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आली आहे. अपघात वाढत आहेत. जीवित व वित्तहानी होत आहे. भविष्यात गंभीर अपघात होऊ शकतात. वाहतूककोंडीमुळे प्रवाशांना प्रचंड त्रास होत आहे. भुयारी मार्गांचा काहीही उपयोग होत नाही. महामार्गावरील खड्डे भरण्यात यावेत. आवश्यक ती दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात यावीत, अशी मागणी पत्रांद्वारे केली आहे. पोलीस उपआयुक्त नितीन पवार यांनी टोलवेज कंपनीसह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, महापालिकेचे अधिकारी या सर्वांच्या अनेक वेळा बैठका घेतल्या आहेत; परंतु कोणीही या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्यास तयार नाही. अखेर उरण फाट्याजवळील उड्डाणपुलावर खासगी ठेकेदाराच्या माध्यमातून काम सुरू आहे. कर्तव्यदक्ष पोलिसाचे कौतुक महामार्गावरील समस्या सोडविण्यासाठी वाहतूक पोलीस वारंवार शासकीय यंत्रणेकडे पाठपुरवा करत आहेत. पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, उपआयुक्त नितीन पवार सर्व पातळीवर प्रयत्न करत आहेत. सीबीडी वाहतूक चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजीत मोहिते उरण फाट्यावरील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी दिवसरात्र मेहनत करत आहेत. खासगी ठेकेदाराच्या माध्यमातून त्यांनी उरण फाटा उड्डाणपुलावर पांढरे पट्टे मारण्याचे काम सुरू केले आहे. सोमवारी पहाटेपासून सायंकाळपर्यंत ते स्वत: पुलावर उभे राहून काम करवून घेत होते. त्यांच्या या कर्तव्यदक्षतेचे कौतुक होऊ लागले आहे.