शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी आनंद दिघेंचा अपघाताआधी मागितला होता राजीनामा", कदमांचा गौप्यस्फोट
2
पुराचे थैमान! नेपाळमध्ये परिस्थिती गंभीर; १७० जणांचा मृत्यू, १११ जण जखमी, ४२ बेपत्ता
3
कार अपघातात एअरबॅग उघडली पण आईच्या मांडीवर बसलेल्या २ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू
4
"भाग्यश्री आत्राम अहेरीत पराभूत होतील"; शरद पवारांच्या उमेदवाराला काँग्रेसचाच विरोध
5
"केवळ ७% जीडीपी वाढ पुरेशी नाही..," RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचं बेरोजगारीबद्दल मोठं वक्तव्य
6
IND vs BAN : जबरदस्त सेटअप! कमालीच्या इन स्विंग चेंडूवर बुमराहनं उडवला रहिमचा त्रिफळा
7
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
8
खुशखबर! सुनीता विल्यम्स पृथ्वीवर लवकरच परतणार; नासाची टीम अंतराळात पोहोचली, पहिला व्हिडीओ आला समोर
9
शेअर मार्केटमध्ये मोठी गॅप डाऊन ओपनिंग; निफ्टी सपोर्ट लेव्हलवर, भूराजकीय तणावात खरेदी करावी की नाही?
10
"कुठे गेले ते १५ मिनिटवाले...?"; आमदार नितेश राणेंचा ओवैसींवर हल्लाबोल
11
"माझी बाहुली हरवली म्हणून भोकाड पसरणारे..."; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंचा पलटवार
12
Success Story: ८००० रुपये कर्ज घेऊन सुरू केलं काम; आज ८०० कोटींच्या मालकिण, कपड्यांचा आहे मोठा ब्रँड
13
आधी संसदेत बसवताना केला होता विरोध, आता उदयनिधी यांच्या हातातच 'सेंगोल' दिसले
14
तिरुपती लाडू वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; याचिकाकर्त्यांने सीबीआय चौकशीची मागणी केली
15
बाप बन गया रे! रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, पापाराझींसमोर व्यक्त केल्या भावना
16
सोशल मीडियात ट्रेंड करणारे 'पंखेवाले बाबा' लड्डू मुत्या स्वामी नेमके कोण आहेत?
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रत्येक काम आत्मविश्वासाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल
18
निवडणुका वेळेवरच ! पण अधिकाऱ्यांच्या आता बदल्या का नको...
19
KKK 14 Winner: करणवीर मेहरा झाला KKK 14 चा विजेता, गश्मीर महाजनीची संधी थोडक्यात हुकली
20
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 

पालिकेत ‘पाणी वाचवा’चा नारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2015 12:02 AM

स्वत:च्या मालकीचे धरण असल्यामुळे शहरात पाण्याची उधळपट्टी सुरू आहे. मोठ्याप्रमाणात पाणीगळती सुरू असून ती थांबविण्यासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे

नवी मुंबई : स्वत:च्या मालकीचे धरण असल्यामुळे शहरात पाण्याची उधळपट्टी सुरू आहे. मोठ्याप्रमाणात पाणीगळती सुरू असून ती थांबविण्यासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. पाणीगळती व चोरीची चाौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेमध्ये केली आहे. काँगे्रस नगरसेविका मंदाकिनी रमाकांत म्हात्रे यांनी नवी मुंबईमधील पाण्याच्या उधळपट्टीविषयी व पाणी गळतीविषयी लक्षवेधी मांडली होती. दोन महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या लक्षवेधीवर गुरुवारी चर्चा करण्यात आली. स्वच्छतेविषयी नवी मुंबईला देशात तिसरा व राज्यात प्रथम क्रमांक मिळाला. परंतु पाण्याच्या नियोजनात मात्र पालिका अपयशी ठरली आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून पालिकेने मोरबे ते कळंबोली व पूर्ण शहरात पाइपलाइन टाकली आहे. परंतु यानंतरही प्रचंड पाणीगळती सुरू आहे. लाखो लिटर पाणी वाया जात असून गळती थांबविण्यास प्रशासनास अपयश आले आहे. दहा वर्षांत पालिकेचे १५० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणाची योग्य चौकशी करून कारवाई करावी अन्यथा न्यायालयात जाऊ, असा इशारा म्हात्रे यांनी दिला. विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनीही पालिकेच्या पाणीपुरवठ्याच्या यंत्रणेविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. पालिकेने २०० कोटी रुपये खर्च करून पाइपलाइन टाकली आहे. परंतु नवीन पाइपलाइन टाकल्यानंतर जुने पाइप काढले का, ते कुठे आहेत? अद्याप दिघा व इतर काही परिसरांत पुरेसे पाणी मिळत नाही. स्काडा सिस्टीम सुरू नाही. प्रशासनाने स्काडा सुरू असल्याचे दाखविल्यास नगरसेवकपदाचा राजीनामा देण्याचे आव्हानही त्यांनी दिले. सभागृह नेते जयवंत सुतार यांनीही शहरातील पाण्याचा काटेकोरपणे वापर करण्यासाठी योग्य उपाययोजना करण्यात याव्यात, अशा सूचना केल्या. अनेक नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागात पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नसून नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचे स्पष्ट केले. महापौर सुधाकर सोनावणे यांनीही सर्व नगरसेवकांच्या मतांचा विचार करून प्रशासनाने योग्य उपाययोजना कराव्यात, अशा सूचना केल्या.