शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने सेलिब्रेशनसाठी केक मागविला; कशासाठी?
2
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
3
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
4
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
5
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
6
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
7
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
8
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
9
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
10
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
11
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
12
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
13
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
14
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
15
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
16
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
17
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
18
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
19
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
20
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...

फ्लॉवरच्या पाल्यातून सामाजिक संस्था मालामाल, पूर्वाश्रमीचे ठेकेदार आता बनले व्यवस्थापक

By नामदेव मोरे | Updated: January 16, 2025 13:03 IST

मुंबईतील भाजीपाला मार्केट १९९६ मध्ये नवी मुंबईत स्थलांतर झाले.

नवी मुंबई : बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमधील कोबी, फ्लॉवरचा कचरा उचलण्यासाठीचा संघर्ष अनेक वर्षांपासून सुरू आहे.  सामाजिक संस्थांच्या नावाखाली हा कचरा उचलण्यात येत आहे. दहा वर्षांत चार संस्थांनी कचरा उचलण्याचे काम करून आर्थिक कमाई केली आहे. संस्था बदलल्या असल्या तरी प्रत्यक्षात राबणारे व राबवून घेणारे हात मात्र वर्षांनुवर्ष तेच असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

मुंबईतील भाजीपाला मार्केट १९९६ मध्ये नवी मुंबईत स्थलांतर झाले. मुंबईतून मार्केट स्थलांतर होत असताना तेथील गुन्हेगारीची मुळेही नवी मुंबईत स्थलांतरित झाली. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या अनेकांनी मार्केटमध्ये विविध प्रकारच्या कामांत हस्तक्षेप केले व त्या माध्यमातून अर्थार्जन करण्यास सुरुवात केली.  मार्केटमध्ये रोज कोबी फ्लॉवरची ३०० ते ४०० टन आवक होती. त्यांचा पाला कचरा म्हणून टाकून दिला जातो. रोज १२ ते १५ टन पाला तयार होतो. कचऱ्यात टाकलेला हा पाला उचलून तबेलाचालकांना पुरविण्याचे काम तीन ते चार  गट करतात. यामधील काहींचे गुन्हेगारी जगताशी संबंध असल्याचेही बोलले जाते. पूर्वी वैयक्तिक स्तरावर पाला उचलला जात होता. 

पाला उचलण्याच्या संघर्षातूनच झाला गाेळीबारसुरुवातीला अनेक वर्षे शिव चॅरिटेबल ट्रस्ट हे काम करीत होती. यानंतर कर्तव्य सामाजिक संस्था व  जय शंभोनारायण संस्था काम करत असल्याची माहिती बाजार समितीमधील काही घटकांनी दिली. अखेर राजाराम टोके यांच्या शेतकरी भाजीपाला पुरवठा सहकारी संस्थेने शासनाकडे पाठपुरावा करून हे काम मिळविले. पाला उचलण्यासाठी या संस्था व त्यांचे चालक यांच्यामध्ये नेहमीच संघर्ष होत असून, यातूनच टाेकेंवर गोळीबार केल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे. 

पूर्वाश्रमीचे ठेकेदार आता बनले व्यवस्थापकगोळीबारप्रकरणी अटक केलेला संतोष गवळी हा अनेक वर्षांपासून कोबी, फ्लॉवरचा कचरा उचलण्याचे काम करत होता.परंतु, शासनाने हे काम राजाराम टोके यांच्या संस्थेला दिल्यानंतर तो टोके यांच्या संस्थेमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करत होता. तशा प्रकारचे ओळखपत्रही त्याच्याकडे होते. गवळीबरोबर इतर ठेकेदारांकडेही व्यवस्थापकाचे व काम करणाऱ्यांकडे कामगार म्हणून ओळखपत्रे  आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती