शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

कुणी लसूण सोलताेय, तर कुणी कांदा चिरतोय; मराठा क्रांती मोर्चाच्या संयोजकांची जय्यत तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2024 7:59 AM

आता डोळ्यांत पाणी आलं तरी आरक्षण मिळेल तेव्हा तेच आनंदाश्रू ठरतील

- नारायण जाधवनवी मुंबई : आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेले मराठ्यांचे भगवे वादळ पुण्याची वेस  ओलांडून राजधानी मुंबईकडे कूच करतेय. मराठा आरक्षण मोर्चात लाखाे मराठा बांधवांसह लेकुरवाळ्या माता-भगिनींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. वयोवृद्धांनी आरक्षणासाठी वयोमानाचा थकवा विसरून मुंबईकडे धाव घेतली आहे. या सर्वांची खाण्यापिण्याची आबाळ होऊ नये, मराठा क्रांती मोर्चाच्या संयोजकांनी जय्यत तयारी केली आहे. 

खोपोली, पनवेल, कळंबोली, खारघर, नेरूळ, एपीएमसी मार्केट या भागात मराठा बांधवांनी आंदोलकांच्या जेवणाची जय्यत तयारी सुरू केली होती. यासाठी सकाळपासून मोर्चाच्या मार्गातील अनेक ठिकाणी जेवण तयार करण्यासाठी मराठा पुरुष बांधवांमध्ये कोणी लसूण सोलताना दिसतोय, कुणी कोथिंबीर, भाज्या निवडतोय, तर कोणी कांदा चिरताना दिसत हाेते. 

प्रसार माध्यमांशी संवाद साधल्यानंतर, ‘आण रं ती कांद्याची गोणी. त्या सुऱ्यापण घे, या भावड्यांना दे कांदा चिरायला. आरक्षणाच्या मागणीसाठी आपला वाघ येतोय मुंबईला, असे सांगून ते पुन्हा लसूण सोलू लागले, कांदा चिरू लागले.’

आता ही आरपारची लढाई आहे... 

कांदा चिरण्याची सवय नसल्याने अनेकांच्या डोळ्यांत पाणी आले होते. यावर त्यांचे म्हणणे होते, होय येथे पाहा कुणी लसूण सोलताेय तर कोणी डाळ-तांदूळ साफ करतोय. माझ्यासारख्या इतरांच्या डोळ्यांत कांदा चिरल्याने पाणी आलंय, हे खरं आहे; पण आमची लढाई हक्कांसाठी सुरू आहे. नव्या पिढीला आरक्षणाचे लाभ मिळावेत, यासाठी ती सुरू आहे. आता ही आरपारची लढाई आहे. यामुळे आता डोळ्यांत पाणी आलं तरी चालेल. कारण आरक्षण मिळाल्यास तेच आनंदाश्रू ठरतील.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलNavi Mumbaiनवी मुंबई