शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
2
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
3
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
4
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
5
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
6
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
7
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
8
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
9
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
10
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
11
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
12
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
13
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
14
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
15
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
16
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
17
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
18
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
19
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
20
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा

वादळी वाऱ्याने केली नवी मुंबईकरांची दैना, वाहतूक कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 9:01 AM

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सायंकाळी वादळी वातावरण निर्माण झाले.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : सोमवारी सकाळपासून घामाच्या धारांनी नवी मुंबईकर चांगलेच हैराण झालेले असताना दुपारनंतर हवामान खात्याच्या  अंदाजानुसार वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने शहरवासीयांची चांगलीच दैना उडाली. या पावसासोबत धुळीचे वादळ आल्याने  संपूर्ण शहर धुळीने झाकोळले गेले हाेते. तर ३६ हून अधिक ठिकाणी वृक्ष कोलमडून पडल्याच्या वा फांद्या पडल्याच्या घटना घडल्या, तर काही ठिकाणी बॅरिकेड्स उडून रस्त्यावर आल्याने वाहतूक कोंडी झाली. 

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सायंकाळी चार वाजता  वादळी वातावरण निर्माण झाले. हे वादळी वारे पालघर, डहाणू येथून सुरू होऊन भिवंडी, कल्याण, बदलापूर मार्गे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात येऊन धडकले. ताशी १०७ कि.मी. इतका वाऱ्याचा वेग होता. या वादळासोबत अवकाळी पाऊसदेखील सुरू झाला. शहरातील ठाणे-बेलापूर  रस्त्यासह सायन-पनवेल महामार्गावर रस्ते आणि पूल दुरुस्तीचे काम सुरू असल्याने अनेक ठिकाणी सुरक्षेसाठी लावलेले बॅरिकेड्स उडून रस्त्यावर आले होते. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याने वाहतूक पोलिसांनी पुढाकार घेऊन ते हटविले. 

यादरम्यान  ऐरोली-मुलुंड मार्गावर महावितरणची उच्चदाब वीजवाहिनी खाली असल्याने मोठा अडथळा निर्माण होऊन मुंबईहून नवी मुंबईसह कल्याण-डोंबविली, पुणेकडे जाणारी वाहतूक खोळंबली होती. ही वीज वाहिनी पूर्ववत करण्याचे काम सुरू होते.वाशी-कोपरखैरणे मार्गावर ठिकाणी रस्त्याचे काम महापालिकेकडून सुरू असून येथे लावलेले सूचना फलकही हवेच्या वेगामुळे कोसळले होते. 

पनवेल-उरण परिसरातही पावसाने जोरात हजेरी लावल्याने नवी मुंबईकरांप्रमाणे तेथील रहिवाशांची त्रेधातिपीट उडाली. विशेषत: मुंबई-गोवा मार्ग आणि जेएनपीएकडे जाणाऱ्या वाहतुकीला याचा फटका बसला. त्यामुळे कोंडी निर्माण झाली होती. 

 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईRainपाऊस