शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दुकानदारांनाही मिळणार पेन्शन? योजना या वर्ष अखेरीस सुरू होण्याची शक्यता
2
वक्फबाबत सुप्रीम कोर्टाचे अंतरिम आदेश; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
मुंबईचा फलंदाज बाद झाला, माघारी परतत असतानाच तिसऱ्या पंचांना दिसली यष्टीरक्षकाची घोडचूक, मग...
4
ठाणे: पट्टे, रॉड अन् बांबूने लहानग्यांना मारहाण, बालआश्रमातील वास्तव; ४ मुलींवर झाले अत्याचार
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२५: धन व कीर्ती यांची हानी संभवते
6
'टी. एन. शेषन यांनी मागितले होते गृहमंत्रिपद', माजी राज्यपालांच्या पुस्तकात खळबळजनक दावा
7
ठाण्यातील १,३०० झाडांवर कुऱ्हाड चालविण्याचा विकासकाचा ‘डाव’, वृक्षांचे वय लपवल्याचे वनविभागाच्या पाहणीत उघड
8
"इंडस्ट्रीतील प्रत्येक महिलेसोबत त्याचे शरीरसंबंध...", अमृता रावची बहीण प्रीतिकाचे टीव्ही अभिनेत्यावर गंभीर आरोप
9
समृद्धी महामार्गावरून मेपासून जा सुसाट; मुंबई ते नागपूर केवळ आठ तासांचा प्रवास
10
मध्य रेल्वेवर रविवारी खोळंबा, सीएसएमटी-विद्याविहारदरम्यान पाच तासांचा मेगाब्लॉक
11
विशेष लेख : बाळासाहेब ठाकरे नाशिकहून ‘लाइव्ह’..., आपल्या नेत्यांचे विचारच बदलायचे?
12
मुंबईतील ३६ विधानसभांसाठी भाजपचे १०८ मंडल अध्यक्ष, कोअर कमिटीच्या बैठकीत आज होणार शिक्कामोर्तब
13
वक्फ मालमत्तांचा दर्जा ५ मेपर्यंत रद्द होणार नाही; केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयाला हमी
14
अग्रलेख: तुही भाषा कंची? अशी सक्ती करायचे कारण नाही
15
शेअर बाजाराचा चौकार, ६.३७ टक्क्यांनी वाढला सेन्सेक्स; सलग चौथ्या दिवशी बाजारात वाढ
16
चार मुलींचा स्कूल बसमध्ये लैंगिक छळ, स्कूल बसच्या क्लिनरविरोधात गुन्हा दाखल
17
"न्यायालये राष्ट्रपतींना कालमर्यादा आखून देऊ शकत नाहीत; ‘सुपर पार्लमेंट’सारखे वागू नये"
18
महेश मांजरेकर यांना व्ही. शांताराम जीवन गौरव, भीमराव पांचाळे, अनुपम खेर, काजोल, मुक्ता बर्वेंचा सन्मान
19
NASHIK FIRE BREAKING VIDEO: नाशिकमध्ये अग्निकल्लोळ! प्लायवूड फॅक्टरीला भीषण आग; १८ बंब पोहोचले, तरीही...
20
परत पदावर येऊन धनंजय मुंडेंच्या हातून समाजसेवा घडावी; नामदेवशास्त्रींचे विधान, जरांगे भडकले

चौदा गावांचा भुर्दंड कदापि सहन करणार नाही, शिंदेंच्या निर्णयाला गणेश नाईकांचा विरोध कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 09:30 IST

Ganesh Naik Eknath Shinde: कुकशेत गावातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त नाईक यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.

नवी मुंबई : शहरवासीयांना विश्वासात न घेता १४ गावे नवी मुंबईवर लादली आहेत. हा भुर्दंड कदापि सहन करणार नाही. करदात्यांच्या पैशांचा दुरूपयोग होऊ देणार नसून नवी मुंबईच्या हितासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिला जाईल, अशी भूमिका वनमंत्री गणेश नाईक यांनी पुन्हा स्पष्ट केली आहे. 

कुकशेत गावातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त नाईक यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. नवी मुंबईमध्ये मागील २० वर्षे मालमत्ता कर वाढविलेला नाही. २०४५ पर्यंत अजून २० वर्षे करवाढ केली जाणार नाही. शहराचा विकास करताना नागरिकांवर करवाढीचा बोजा टाकला जाणार नाही. 

नवी मुंबईकरांच्या हितापुढे मंत्रिपद महत्त्वाचे नाही

नवी मुंबईकरांना विश्वासात न घेता १४ गावे लादली आहेत. या गावांच्या सोयी-सुविधांसाठी ६८०० कोटी  रुपयांची गरज असून ती द्यावी, असा प्रस्ताव तत्कालीन आयुक्तांनी दिला होता. 

अतिक्रमणे काढून देण्याची मागणीही केली होती. परंतु, या अटींचा विचार न करता या गावांचा समावेश केला आहे. आता शहरवासीयांनी कररूपाने दिलेल्या पैशांतून तेथील गावांचा विकास करायचा का?, नागरिकांना हा भुर्दंड सहन करू दिला जाणार नाही. शहराच्या हितासाठी शेवटपर्यंत लढा दिला जाईल. नवी मुंबईच्या हितापुढे आमदार, मंत्रिपद महत्त्वाचे नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी माजी नगरसेवक सूरज पाटील, गणेश भगत आदी उपस्थित होते. 

हा नाईक-शिंदे वाद नाही

१४ गावांच्या विकासासाठी लागणारा ६८०० कोटींचा भुर्दंड  नवी मुंबईकरांनी का सहन करायचा. आमची भूमिका नवी मुंबईच्या हिताची आहे. काहीजण याला शिंदे-नाईक विरोधाचा रंग देत आहेत; पण हा राजकीय  विरोधाचा विषय  नसून नवी मुंबईचे नुकसान टाळण्यासाठीची भूमिका असल्याचे गणेश नाईक यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Ganesh Naikगणेश नाईकEknath Shindeएकनाथ शिंदेNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाShiv SenaशिवसेनाBJPभाजपा