शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर प्रकरणी शाळेच्या ट्रस्टींना दिलासा! अटकेनंतर एकाच दिवसात दोघांना जामीन मंजूर
2
भाजपाला आणखी एक धक्का; बडा नेता शरद पवारांना भेटला, 'घरवापसी'चा निर्णय पक्का झाला?
3
आपला कोण, परका कोण हे न कळणारी हिंदू जमात महामूर्ख; संभाजी भिडेंची टिप्पणी
4
Video - बापरे! विंडो सीटवर बसून फोन वापरत होती चिमुकली; अचानक बाहेरून हात आला अन्...
5
तिसरं महायुद्ध झालं तर किती रुपयांचं होईल नुकसान? आकडा वाचून तुम्हाला बसेल धक्का!
6
Bigg Boss 18 : विषय संपला! गुणरत्न सदावर्तेंची 'डंके की चोट पे' बिग बॉस हिंदीमध्ये एन्ट्री; स्वत:च दिली माहिती
7
LLC 2024 : जणू काही 'लसिथ मलिंगा'! मराठमोळ्या केदार जाधवच्या गोलंदाजीने जुन्या आठवणींना उजाळा
8
अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदीयांनी सरकारी बंगला रिकामा केला; आता कुठे राहणार?
9
"देशाच्या काना-कोपऱ्यात बाबर, त्यांना धक्के मारून...", हे काय बोलून गेले हिमंत बिस्व सरमा
10
“दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कात भेटणार, सर्व गोष्टींचा फडशा पाडणार”; उद्धव ठाकरेंचा एल्गार
11
महिन्याचा नफा शेअर बाजारातील एका सत्रात संपला! १० लाख कोटींचं नुकसान, या क्षेत्राला सर्वाधिक फटका
12
Navratri 2024: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीच्या रूपाची पुजा का? जाणून घ्या कारण!
13
LLC 2024: ११ षटकार, ९ चौकार... मार्टिन गप्टिलचा तुफानी धमाका; ४८ चेंडूत ठोकलं शतक
14
Suzlon Energyचा शेअर ५ टक्क्यांनी घसरला; NSE आणि BSE नं कंपनीला दिलेला कारवाईचा इशारा
15
Maharashtra Politics : 'मविआ'चे जागावाटप म्हणजे "आत तमाशा बाहेर कीर्तन", बैठकीत खडाजंगी'; अजितदादांच्या नेत्याने डिवचले
16
मोफत रेशनचं आमिष दाखवून घेतात लोकांचं आधार कार्ड अन् नंतर थेट चीनमधून येतो कॉल
17
सणासुदीदरम्यान No-Cost EMI वर शॉपिंग करताय? त्यापूर्वी जाणून घ्या याचा फायदा होतो की नुकसान?
18
Women's T20 World Cup 2024 : आतापर्यंत ८ वेळा रंगली स्पर्धा, पण फक्त २ वेळा दिसला नवा विजेता
19
Share Market Crash : शेअर बाजारात खळबळ! सेन्सेक्स १८०० अंकांनी घसरला; गुंतवणूकदारांचे १०.५० लाख कोटींचे नुकसान

विदेशी फळांच्या बाजारपेठेत दहा वर्षांत तिप्पट वाढ

By नामदेव मोरे | Published: September 30, 2024 9:58 AM

नाशवंत कृषीमालामध्ये फळांचा अग्रक्रमांक असतो. पूर्वी फळे पिकली की एक आठवड्यात त्यांचा वापर होणे आवश्यक असायचे.

- नामदेव मोरेउप-मुख्य उपसंपादकआरोग्यासाठी आहारातील फळांचे महत्त्व नागरिकांच्या लक्षात आले आहे. कोरोनापासूनही आरोग्यविषयी जागरूकता वाढली असून, या सर्वांचा परिणाम फळांच्या मागणीवर झाला आहे. पूर्वी हंगामाप्रमाणे मिळणारी अनेक फळे आता वर्षभर मार्केटमध्ये उपलब्ध होऊ लागली आहेत. विदेशी फळांनाही मागणी वाढत असून दहा वर्षांत फळांची आयात तिप्पट वाढली आहे. मुंबईपासून खेडेगावापर्यंत प्रत्येक मार्केटमध्ये विदेशी फळेही उपलब्ध होऊ लागली आहेत. 

नाशवंत कृषीमालामध्ये फळांचा अग्रक्रमांक असतो. पूर्वी फळे पिकली की एक आठवड्यात त्यांचा वापर होणे आवश्यक असायचे. यामुळे पूर्वी हंगामाप्रमाणेच फळे मार्केटमध्ये उपलब्ध होत होती. परंतु फळांचे आहारातील महत्त्व लक्षात आल्यामुळे वर्षभर त्याची मागणी वाढली. मागणीप्रमाणे पुरवठा करता यावा यासाठी फळांची शीतगृहात साठवणूक करण्यास सुरुवात झाली. शीतगृहात साठवलेल्या फळांचे आयुष्य दोन महिन्यापर्यंत वाढविणे शक्य होऊ लागले. यामुळे आता वर्षभर ग्राहकांना मुबलक फळे मिळू लागली. मागणी व पुरवठा यांचा मेळ साधण्यासाठी फळांची आयातही सुरू झाली. २००९ मध्ये देशात २८४३ कोटी रुपयांची फळे आयात झाली होती. 

२०१३-१४ मध्ये हा आकडा ७७१५ कोटींवर पोचला. पुढील दहा वर्षांत  यामध्ये तीनपट वाढ झाली असून, २०२३-२४ या वर्षात आयात फळांची उलाढाल २२६६३ वर पोचली आहे. सफरचंद, संत्री, किवी, द्राक्ष,पिअर्स, अवाकडूसह १५ पेक्षा जास्त प्रकारच्या फळांची आयात होत आहे. 

विदेशी फळांविषीय ग्राहकांमध्येही प्रचंड आकर्षण आहे. त्यांच्या मार्केटिंगवरही विशेष लक्ष दिले जाते. पावसाळा सुरू झाला की डेंग्यू व मलेरियाची साथ प्रचंड वाढते. या काळात शरीरातील कमी झालेल्या पेशी वाढविण्यासाठी किवी व ड्रॅगन फ्रूट उपयुक्त असल्याची मार्केटिंग पद्धतशीरपणे करण्यात आले आहे. यामुळे किवीला मागणी वाढली असून गतवर्षी उलाढाल ४२२ कोटींवर पोचली आहे. किवीप्रमाणेच पपईचाही डेंग्यू, मलेरियाच्या आजारात उपयोग होतो. पण त्याविषयी योग्य मार्केटिंग होत नाही.  विदेशी सफरचंदची उलाढालही ३ हजार कोटींवर पोहोचली आहे. आकर्षक पॅकिंग व विदेशी फळांविषयी आकर्षण यामुळे ग्राहकांकडूनही या फळांना पसंती मिळते. देशातील एकूण आयात फळांमध्ये २० ते २५ टक्के वाटा फक्त मुंबईचा आहे. जेएनपीटी बंदर व हवाई मार्गाने फळे मुंबईत येतात व येथून संपूर्ण राज्यात त्याचे वितरण केले जात आहे. 

फळांची साठवणूक करण्यासाठी नवी मुंबई, तळोजा व इतर राज्याच्या विविध भागांत शीतगृहांची साखळी उपलब्ध आहे. शीतगृहामध्ये साठवणूक केल्यामुळे फळे सडण्याचे प्रमाणही नगण्य झाले आहे. आरोग्यासाठी व रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यामध्ये फळांचा उपयोग होत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले आहे. डॉक्टरही आजारपणात फळे खाण्याचा सल्ला देत असल्यामुळे देशी फळांबरोबर विदेशी फळांना मागणी वाढत आहे.