शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

विमानतळाजवळ सर्वात मोठी बाजार समिती उभारणार, पणनमंत्री रावल यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 13:47 IST

बाजार समितीचे प्रश्न प्राधान्याने सोडविणार

नवी मुंबई : नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट आशिया खंडातील सर्वात मोठे मार्केट आहे. पुढील काळात जगातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती निर्माण करणार असून, यासाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीटी बंदराजवळ प्रशस्त जागा शोधण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे पणनमंत्री जयकुमार रावल यांनी सोमवारी नवी मुंबईत दिली.वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट देऊन त्यांनी व्यापारी, संचालक मंडळाशी चर्चा करून मार्केटची पाहणी केली. पणन विभागाचा आढावा घेऊन भविष्यातील उपाययोजनांचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. बाजार समितीतील जुन्या इमारतींचा पुनर्विकास वेगाने केला जाईल. सर्वांना विश्वासात घेऊन धोरणे आखली जातील, असे रावल यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. बाजार समितीमध्ये आमदार शशिकांत शिंदे, कामगार नेते नरेंद्र पाटील व संचालक मंडळाने पणनमंत्र्यांचे स्वागत केले. बाजार समितीचे नवीन प्रकल्प व शासनाकडून काय सहकार्य  हवे याचीही माहिती दिली. संस्थेची माहिती घेतल्यानंतर रावल यांनी प्रत्यक्षात मार्केटची पाहणी केली.

आवश्यक सुधारणांकडे वेधले लक्ष --  मुंबई बाजार समितीमधील प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणार. महाराष्ट्रातील कृषिमालाला जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे रावल यांनी सांगितले. -  व्यापाऱ्यांनी मार्केटमध्ये कोणत्या सुधारणा आवश्यक आहेत त्याकडे रावल यांचे लक्ष वेधले. -  बाजार समिती सभापती अशोक डक, सचिव पी. एल. खंडागळे,  बाजार समिती संचालक संजय पिंगळे, आदी उपस्थित होते

टॅग्स :airplaneविमानMarketबाजार