शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
2
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
3
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
4
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
5
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
6
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
7
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
8
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
9
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
10
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
11
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
12
Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स
13
"पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा मृत्यू झाला असता तर आरोपीला ३० मिनिटांत जामीन दिला असता का?"
14
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
15
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
16
IND vs BAN : शुबमन गिलची कमाल! शतकी खेळीसह द्रविड-कोहलीसह रुट-बाबरला धोबी पछाड!
17
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?
18
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
19
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
20
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट

गरजेपोटीच्या घरांचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर; मंदा म्हात्रेंचं मुख्यमंत्र्यांना स्मरणपत्र

By नारायण जाधव | Published: June 17, 2024 6:08 PM

स्थानिक आगरी-कोळी प्रकल्पग्रस्तांनी कुटुंब कबिला वाढल्याने शासनाने नवी मुंबईसाठी संपादित केलेल्या आपल्याच जमिनीवर ही गरजेपोटीची घरे बांधली आहेत

नवी मुंबई : नवी मुंबईतील भूमिपुत्रांनी गरजेपोटी बांधलेली दि. २५ फेब्रुवारी २०२२ पर्यंतची घरे नियमित करण्याचा निर्णय घेऊन दोन वर्षे उलटली तरी राज्य सरकारने याबाबतची अंतिम अधिसूचना न काढल्याने येथील प्रकल्पग्रस्तांत नाराजी आहे. ती ओळखून बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी पुन्हा याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून याविषयी आठवण करून दिली आहे. यामुळे हा विषय पुन्हा एकदा ऐन विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या तोंडावर ऐरणीवर आला आहे.

स्थानिक आगरी-कोळी प्रकल्पग्रस्तांनी कुटुंब कबिला वाढल्याने शासनाने नवी मुंबईसाठी संपादित केलेल्या आपल्याच जमिनीवर ही गरजेपोटीची घरे बांधली आहेत. ती कायम करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. याविषयी आमदार म्हात्रे यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडून शासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर दोन वर्षांपूर्वी ही घरे नियमित करण्याची घोषणा एकनाथ शिंदे यांनीच नगरविकासमंत्री असताना केली होती. तसेच प्रकल्पग्रस्तांच्या हरकती-सूचना आणि अडचणी ऐकून त्याच्या अंमलबजावणीसाठीचा मसुदा पाठविण्याची सूचना केली होती. मात्र, वर्ष उलटूनदेखील सिडकोने तो न पाठविल्याने गेल्या वर्षीसुद्धा दि. ६ जून २०२३ पर्यंत पाठविण्याचे आदेश पुन्हा सिडकोला दिले होते. मात्र, शिंदे यांनी केलेल्या घोषणेला दोन वर्षे उलटली तरी अद्याप त्याची अधिसूचना निघालेली नाही. यामुळे आमदार मंदा म्हात्रे यांनी पुन्हा मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून याबाबत आठवण करून दिली आहे.

टॅग्स :Manda Mhatreमंदा म्हात्रेEknath Shindeएकनाथ शिंदे