शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
2
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
3
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
4
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
5
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, युट्यूबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
6
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
8
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
9
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
10
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
11
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
12
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
13
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
14
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
15
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
16
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
17
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
18
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
19
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
20
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा

गरजेपोटीच्या घरांचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर; मंदा म्हात्रेंचं मुख्यमंत्र्यांना स्मरणपत्र

By नारायण जाधव | Updated: June 17, 2024 18:08 IST

स्थानिक आगरी-कोळी प्रकल्पग्रस्तांनी कुटुंब कबिला वाढल्याने शासनाने नवी मुंबईसाठी संपादित केलेल्या आपल्याच जमिनीवर ही गरजेपोटीची घरे बांधली आहेत

नवी मुंबई : नवी मुंबईतील भूमिपुत्रांनी गरजेपोटी बांधलेली दि. २५ फेब्रुवारी २०२२ पर्यंतची घरे नियमित करण्याचा निर्णय घेऊन दोन वर्षे उलटली तरी राज्य सरकारने याबाबतची अंतिम अधिसूचना न काढल्याने येथील प्रकल्पग्रस्तांत नाराजी आहे. ती ओळखून बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी पुन्हा याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून याविषयी आठवण करून दिली आहे. यामुळे हा विषय पुन्हा एकदा ऐन विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या तोंडावर ऐरणीवर आला आहे.

स्थानिक आगरी-कोळी प्रकल्पग्रस्तांनी कुटुंब कबिला वाढल्याने शासनाने नवी मुंबईसाठी संपादित केलेल्या आपल्याच जमिनीवर ही गरजेपोटीची घरे बांधली आहेत. ती कायम करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. याविषयी आमदार म्हात्रे यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडून शासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर दोन वर्षांपूर्वी ही घरे नियमित करण्याची घोषणा एकनाथ शिंदे यांनीच नगरविकासमंत्री असताना केली होती. तसेच प्रकल्पग्रस्तांच्या हरकती-सूचना आणि अडचणी ऐकून त्याच्या अंमलबजावणीसाठीचा मसुदा पाठविण्याची सूचना केली होती. मात्र, वर्ष उलटूनदेखील सिडकोने तो न पाठविल्याने गेल्या वर्षीसुद्धा दि. ६ जून २०२३ पर्यंत पाठविण्याचे आदेश पुन्हा सिडकोला दिले होते. मात्र, शिंदे यांनी केलेल्या घोषणेला दोन वर्षे उलटली तरी अद्याप त्याची अधिसूचना निघालेली नाही. यामुळे आमदार मंदा म्हात्रे यांनी पुन्हा मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून याबाबत आठवण करून दिली आहे.

टॅग्स :Manda Mhatreमंदा म्हात्रेEknath Shindeएकनाथ शिंदे