शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
2
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
3
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
4
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
5
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ३० जणांचा मृत्यू, १७ जखमी
6
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
7
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
8
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
9
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
10
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
11
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
12
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
13
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
14
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
15
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
16
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
17
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
18
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
19
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
20
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास

गरजेपोटीची बांधकामे नियमित करण्याचा प्रश्न चिघळणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2016 3:51 AM

प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी उभारलेली बांधकामे नियमित करण्याचा प्रश्न दीर्घकाळ रखडला आहे. या प्रश्नावर शासनाकडून केवळ घोषणाबाजी केली जात आहे, प्रत्यक्ष मात्र कोणत्याही

- कमलाकर कांबळे,  नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी उभारलेली बांधकामे नियमित करण्याचा प्रश्न दीर्घकाळ रखडला आहे. या प्रश्नावर शासनाकडून केवळ घोषणाबाजी केली जात आहे, प्रत्यक्ष मात्र कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी होताना दिसत नाही. सिडकोने यासंदर्भात शासनाकडे पाठविलेला प्रस्ताव मागील दीड वर्षापासून धूळखात पडून आहे. एकूणच ही बांधकामे नियमित करण्याच्या नावाखाली प्रकल्पग्रस्तांची बोळवण केली जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे या विषयावरून येत्या काळात आंदोलन पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.साडेबारा टक्के योजनेअंतर्गत भूखंड वाटपात सिडकोकडून मोठ्या प्रमाणात दिरंगाई झाली. तसेच मागील ४० वर्षांत गावठाणांचा विस्तारही केला नाही. त्यामुळे वाढत्या कुटुंबाची गरज म्हणून प्रकल्पग्रस्तांनी आपल्या राहत्या घरांचे वाढीव बांधकाम केले. ही सर्व बांधकामे नियमित करण्याची मागणी होत आहे. मागील १५ ते २० वर्षांपासून प्रकल्पग्रस्त या मागणीचा पाठपुरावा करीत आहेत. मात्र प्रत्येक वेळी आश्वासन देऊन त्यांची बोळवण केली जात आहे. राज्य शासनाने पहिल्यांदा २00७ मध्ये प्रकल्पग्रस्तांची बांधकामे नियमित करण्याचा सकारात्मक निर्णय घेतला. यासंदर्भातील अध्यादेशही काढण्यात आला. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. परंतु या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही. बांधकामे नियमित करण्यासाठी सिडकोच्या वतीने गावांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले. परंतु या सर्वेक्षणाला प्रकल्पग्रस्तांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. प्रकल्पग्रस्तांच्या असहकार्यामुळे सात ते आठ गावांच्या सर्वेक्षणानंतर सिडकोला ही मोहीम थांबवावी लागली. त्यामुळे गरजेपोटीची बांधकामे नियमित करण्याचा प्रश्न रेंगाळला. याच दरम्यान गरजेपोटीच्याआडून फिफ्टी-फिफ्टीच्या बांधकामांचा ट्रेंड सुरू झाला. स्थानिक भूमिफियांना हाताशी धरून मुंबई, ठाण्यातील फास्ट ट्रॅक बिल्डर्सनी गावगावठाणात हैदोस घातला. गरजेपोटीच्या घरांनी टोलेजंग इमारतींची जागा घेतली. यातील घरे विकून कथित बिल्डर्स परागंदा झाले, तर स्थानिक भूधारकाने इमारतीतील आपल्या हिश्शाची घरे भाडेतत्त्वावर देऊन उदरनिर्वाहाचा पर्याय उपलब्ध केला. त्यामुळे जुन्या बांधकामांसह अलीकडच्या काळात उभारलेल्या टोलेजंग इमारतीही नियमित व्हाव्यात, अशी प्रकल्पग्रस्तांची मागणी आहे. प्रकल्पग्रस्तांच्या मागणीची दखल घेऊन सिडकोने २0१४ मध्ये डिसेंबर २0१२ पर्यंतची सर्व बांधकामे नियमित करण्याचा एक प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी तो राज्य शासनाकडे पाठवून दिला होता. हा प्रस्ताव आजतागायत राज्य सरकारच्या लालफितीत अडकून पडला आहे. दरम्यान, प्रस्तावाला मंजुरी मिळेल ही गृहीत धरून सिडकोने जानेवारी २0१३ नंतरच्या बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारला. त्यामुळे सिडकोच्या या मोहिमेला प्रकल्पग्रस्तांनी पुन्हा तीव्र विरोध दर्शविला. त्यामुळे सिडकोला ही मोहीम काहीशी शिथिल करावी लागली. यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिसेंबर २0१५ पर्यंतची राज्यातील सर्व अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची घोषणा केली. त्यामुळे जवळपास २0 हजार बांधकामधारकांना दिलासा मिळाला. परंतु गुरुवारी मुख्यमंत्र्यांनी पुन्हा २0१२ पर्यंतची बांधकामे नियमित करण्याबाबत लवकरच अध्यादेश काढण्याचे विधानसभेत जाहीर केले. त्यामुळे राज्य शासनाच्या भूमिकेविषयी प्रकल्पग्रस्तांत पुन्हा संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, प्रकल्पग्रस्तांनी यासंदर्भात आता आक्रमक पवित्रा घेतला असून, येत्या काळात या विषयांवर मोठे आंदोलन पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.सिडकोची कोंडीप्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटीच्या बांधकामांना अभय देण्याच्या विषयावरून सिडकोची चांगलीच कोंडी झाली आहे. यासंदर्भात राज्य शासनाच्या भूमिकेत वारंवार होणाऱ्या बदलामुळे सिडकोचा संबंधित विभाग चांगलाच संभ्रमात सापडला आहे. ही बाब भूमाफियांच्या चांगलीच पथ्यावर पडल्याने अनधिकृत बांधकामांचा पुन्हा धडका सुरू झाला आहे.