शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
3
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
4
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
5
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
6
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
7
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
8
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
9
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
10
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
11
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
12
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
13
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
14
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
15
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
16
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
17
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
18
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
19
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
20
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 

महिनाभरात हजार बोअरवेल

By admin | Published: April 04, 2016 2:02 AM

शहरातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पालिका व नागरिकांनी एका महिन्यात एक हजारापेक्षा जास्त बोअरवेल व हातपंप खोदले आहेत. यामुळे जमिनीची अक्षरश: चाळण झाली

उल्हासनगर : शहरातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पालिका व नागरिकांनी एका महिन्यात एक हजारापेक्षा जास्त बोअरवेल व हातपंप खोदले आहेत. यामुळे जमिनीची अक्षरश: चाळण झाली असून भूगर्भातील पाण्याची पातळी ४०० फुटांपर्यंत गेली आहे. तर, अनेक ठिकाणी बोअरवेलला पाणीच लागत नसल्याने एप्रिल-मे महिन्यांत पाणीटंचाईची सर्वाधिक झळ बसण्याची भीती व्यक्त होत आहे. महापालिकेकडे पाण्याचा पर्यायी स्रोत नसल्याने त्यांना एमआयडीसीच्या मनमानी कारभारावर अवलंबून राहावे लागत आहे. पालिका आयुक्त मनोहर हिरे यांनी टंचाईची झळ कमी करण्यासाठी जुन्या बोअरवेल व हातपंपांची दुरुस्ती करण्याचे आदेश दिले आहे. तसेच प्रत्येक प्रभागात तीन बोअरवेल खोदण्याला मान्यता दिली. मात्र, नागरिकांच्या मागणीनुसार एका प्रभागात सहापेक्षा जास्त बोअरवेल खोदण्यात येत आहे. पालिकेने एका महिन्यात ३०० पेक्षा जास्त तर लहान-मोठ्या कारखान्यांनी ७०० पेक्षा जास्त बोअरवेल खोदल्याची चर्चा आहे. >शहरातून बारमाही वाहणारी उल्हास नदी आहे. अशा वेळी नदीपात्रातून पाणी न उचलता किनारी बोअरवेल खोदून त्याद्वारे शहराला पाणीपुरवठा करण्याची मागणी आयुक्तांकडे होत आहे. नदीकिनाऱ्यावरील पाणी पिण्यास योग्य असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले असून स्वत:चा पाणीस्रोत उभारण्याची मागणी पालिकेकडे होत आहे. नवीन बोअरवेल व हातपंप खोदण्यावर पालिकेने वेळीच निर्बंध न घातल्यास भूगर्भातील पाणीपातळी ४०० फुटांपेक्षा जास्त खोल जाईल, असे तज्ज्ञ सांगत आहेत. > मनसेचे शहराध्यक्ष प्रदीप गोडसे यांनी नवीन बोअरवेल व हातपंप खोदण्याऐवजी जुन्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. बहुतांश नवीन बोअरवेलला पाणी लागत नसल्याने पालिकेचे लाखो रुपये पाण्यात जात आहेत. मात्र, ज्या जुन्या बोअरवेल व हातपंपांना मुबलक पाणी आहे, त्यांची दुरुस्ती केल्यास टंचाईग्रस्त नागरिकांना दिलासा मिळेल. पालिकेने वेळीच कारवाई सुरू न केल्यास आंदोलनाचे शस्त्र पुुन्हा हाती घ्यावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.