शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

एकसंघ राष्ट्र निर्माणासाठी प्रयत्न करा! राज्यातील सामाजिक अशांततेबद्दल शरद पवारांना चिंता

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 5:44 AM

मणिपूरमध्ये सामाजिक अशांतता झाल्यानंतर पंतप्रधानांना तिकडे चक्कर टाकावी, लोकांना दिलासा द्यावा असे कधी वाटले नाही. आजूबाजूच्या राज्यांतही हे घडले. अलीकडच्या काळात महाराष्ट्रात काही घडेल की काय, अशी चिंता वाटते.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: मणिपूरमध्ये सामाजिक अशांतता झाल्यानंतर पंतप्रधानांना आपण तिकडे चक्कर टाकावी, लोकांना दिलासा द्यावा असे कधी वाटले नाही. आजूबाजूच्या राज्यांतही हे घडले. खाली कर्नाटकातही घडले. अलीकडच्या काळातही महाराष्ट्रात काही घडेल की काय, अशी चिंता वाटते. जात, धर्म, भाषा याच्या पलीकडे जाऊन एकसंघ राष्ट्र निर्माणासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसच्याशरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे व्यक्त केले.

डॉ. मंगेश आमले यांनी येथे आयोजित केलेल्या सामाजिक ऐक्य परिषदेमध्ये शरद पवार यांनी भूमिका मांडली. देशाच्या विविध भागांत चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. राज्यातही तसेच होते की काय, अशी स्थिती आहे. ऐक्य निर्माण करण्याची जबाबदारी सरकारची आहे. पण, सरकार तसे काम करीत नसल्याची टीकाही त्यांनी केली. 

महाराष्ट्रात अनेक महापुरुष होऊन गेले. त्यांनी समतेचा संदेश दिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी रयतेचे राज्य निर्माण केले. त्यांच्या राज्याभिषेकालाही काहीजणांनी विरोध केला. तोच वर्ग आज सामाजिक ऐक्याला धक्का देतोय. सर्वांनी एक होऊन सामाजिक ऐक्य टिकविले पाहिजे. आज देश एकसंघ आहे तो संविधानामुळे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिले. बाबासाहेबांनी देशविकासासाठी दिलेले योगदान महत्त्वाचे आहे. त्यांच्या विचारातूनच भाक्रा नानगलसारखी धरणे तयार झाली. पाण्यापासून वीजनिर्मितीला सुरुवात झाली. त्यांनी समतेचा विचार रुजवला. महात्मा फुले, शाहू महाराज यांनीही समता रुजविली, तो विचार टिकविण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. 

महायुतीने प्रत्येक मतदारसंघात पैसे  वाटले : रोहित पवार

समाजामध्ये भांडणे लावण्याचे काम काही व्यक्ती करत आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीने प्रत्येक मतदारसंघामध्ये ६० कोटी वाटले. काही ठिकाणी १०० कोटी, तर काही ठिकाणी १५० कोटी खर्च केल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी  केला. प्रचंड पैसे खर्च करूनही जनतेने त्यांना सामान्य माणसांची ताकद दाखवून दिली, असे मत व्यक्त केले. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस