शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दिकी हत्या : एका आरोपीला पोलीस कोठडी, तर दुसऱ्याला..., न्यायालयाचा आदेश काय?
2
Baba Siddique : "२०१९ ला जेलमध्ये गेला, जामीन कसा मिळाला माहीत नाही; ११ वर्षांपूर्वीच घरातून हाकलून दिलं"
3
"उद्धव ठाकरे, सारखं वाघनखं काढतंय; एकनाथ शिंदे, ते एक पुष्पा वेगळंच"; राज ठाकरे बरसले
4
मोदींच्या 'त्या' विधानावर शरद पवारांनी ठेवलं बोट; म्हणाले, "आम्ही बदनामी करू इच्छित नाही, पण..."
5
"मी तुमचा चित्रपट बनवेन - एक था MLA", दाऊद इब्राहिमनं एकदा बाबा सिद्दिकींना दिली होती धमकी
6
"धानाला हेक्टरी २५ हजार रुपये बोनस देणार", देवेंद्र फडणवीसांची ग्वाही
7
"मी त्यांना कधीही हसताना..."; रतन टाटांच्या निधनाच्या तीन दिवसानंतर शंतनु नायडूंनी केली भावूक पोस्ट
8
"मला एक खून माफ करा...", राज ठाकरेंची थेट राष्ट्रपतींकडे विनंती; मेळाव्यात असं का म्हणाले?
9
Baba Siddique : "पुण्याला जातो सांगितलं, माझा मुलगा..."; बाबा सिद्दिकींची हत्या करणाऱ्या शिवाच्या आईची प्रतिक्रिया
10
'या लोकांना संपूर्ण देशात गुंडा राज आणायचे आहे', बाबा सिद्दिकी हत्याकांडावर केजरीवाल संतापले
11
"गृहमंत्र्यासोबत मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आम्ही नाकारत नाही"; बाबा सिद्दिकींच्या हत्येवरुन शिंदे गटाचे मंत्री स्पष्टच बोलले
12
झोपडीत राहिला, ४० रुपयांसाठी केली मजुरी; पंचायत फेम अभिनेत्याने सांगितला संघर्षमय काळ
13
'या' टॉप 5 इलेक्ट्रिक स्कूटर ऑनलाइन खरेदी करु शकता, मिळेल मोठा डिस्काउंट!
14
गंभीर घटना घडल्यानंतरही त्यांच्या नजरेसमोर फक्त खुर्ची आहे; फडणवीसांचे शरद पवारांना प्रत्यूत्तर
15
Baba Siddique Shot Dead : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई टोळीने घेतली; म्हणाला, "सलमान खान, आम्हाला हे युद्ध..."
16
सगळे थिएटर रिकामी! 'जिगरा' बघायला गेलेल्या अभिनेत्रीचे आलियावर आरोप, म्हणाली- "तिने स्वत:च तिकिटं खरेदी करून..."
17
Baba Siddique Shot Dead :'पोलिसांना फ्री हॅन्ड दिला पाहिजे, ही मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांची जबाबदारी'; छगन भुजबळ थेटच बोलले
18
मजुरी करायला पुण्यात आले, तिसऱ्याची ओळख झाली; मग घेतली बाबा सिद्दिकींच्या हत्येची सुपारी
19
"रेल्वे अपघात तर होतच राहतात"; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, लोकांनी व्यक्त केला संताप
20
लॉरेन्स बिश्नोई दाऊदच्या वाटेवर; ७०० शूटर्स, ६ देशांमध्ये गुन्हेगारीचे साम्राज्य, NIA कडून आरोपपत्र

उरण तालुक्यात सर्वच राजकीय पक्षांना ग्रासले बंडाळीने

By admin | Published: February 07, 2017 4:23 AM

रायगड जिल्हा परिषदेच्या उरण गण आणि गटाच्या एकूण १२ जागांसाठी सोमवारी काँग्रेस-शेकाप आघाडी, शिवसेना, मनसे आणि अपक्षांनी शक्तिप्रदर्शन करीत आणि रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल केले

उरण : रायगड जिल्हा परिषदेच्या उरण गण आणि गटाच्या एकूण १२ जागांसाठी सोमवारी काँग्रेस-शेकाप आघाडी, शिवसेना, मनसे आणि अपक्षांनी शक्तिप्रदर्शन करीत आणि रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल केले. यामध्ये जि. प. च्या चार जागांसाठी २७ तर पं. स. च्या ८ जागांसाठी ४९ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली.उरणमध्ये राजिप गटात चार तर पंचायत समितीच्या गणात आठ जागा आहेत. चाणजे, चिरनेर, नवघर, जासई या चार जि.प.च्या आणि पं. स.च्या केगाव, चाणजे, नवघर, भेंडखळ, चिरनेर, आवरे, जासई, विंधणे या आठ अशा एकूण १२ जागांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. सोमवार अखेरच्या दिवशी जिल्हा प्रमुख तथा आमदार मनोहर भोईर, उपजिल्हा प्रमुख नरेश रहाळकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने मोठी रॅली काढली. राघोबा मंदिर ते तहसील कार्यालयापर्यंत उरण शहरातून काढलेल्या रॅलीत तालुका प्रमुख बी. एन. डाकी, उपतालुका प्रमुख जयवंत पाटील, विभागप्रमुख कमलाकर पाटील, नीळकंठ घरत, उपविभाग प्रमुख बळीराम ठाकूर, शहर प्रमुख महेंद्र पाटील, माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे, नगरसेविका वर्षा पाठारे, नगरसेवक अतुल ठाकूर, सेनेचे अन्य पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.सेना-भाजपाची युती तुटल्याने भाजपाने स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी माजी खासदार रामशेठ ठाकूर, जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जय्यत तयारी सुरु केली आहे. उमेदवारांची चाचपणी करीत उरणमधील गण आणि गटातून भाजपाने उमेदवारही जाहीर केले आहेत. भाजपानेही शक्तिप्रदर्शन करीत आणि जाहीर सभा घेवून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.जि. प. आणि पं. स. शेकाप काँग्रेस अशी शेवटच्या क्षणी आघाडी झाली आहे. शिवसेनेबरोबर आघाडी करण्याला वरिष्ठांनी नकार दर्शविल्याने अखेर काँग्रेसने शेकापबरोबर आघाडी केली आहे. शेकाप काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांचेही अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यावेळी आघाडीच्या वतीने रॅलीही काढण्यात आली होती. पक्षीय झेंडे उंचावत आघाडीने काढलेल्या रॅलीत माजी आमदार विवेक पाटील, काँग्रेसचे श्याम म्हात्रे, महेंद्र घरत, मिलिंद पाडगावकर, महेंद्र ठाकूर, राजिप सदस्य वैजनाथ ठाकूर, उमेदवार आणि आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. मनसेबरोबरच अपक्षांचेही उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये उरण उत्क र्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील यांचाही समावेश आहे. नाराज कार्यकर्त्यांची बंडाळी सर्वच राजकीय पक्षांना डोकेदुखी ठरू लागली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांना निवडणुकांना मोठ्या बंडखोरीला सामोरे जाण्याची पाळी येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)