शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
3
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
4
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
5
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
6
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
7
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
8
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
9
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
10
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
11
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
12
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
13
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
14
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
15
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
16
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
17
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
18
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
19
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
20
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका

शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

By admin | Published: January 21, 2016 2:44 AM

तालुक्यात २४ जून २०१५ ला सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पाऊस झाला होता. यावेळी आसल ग्रामपंचायतीच्या हद्दीतील एका शेतकऱ्याच्या शेतात असलेल्या घराचे मोठ्या

कर्जत : तालुक्यात २४ जून २०१५ ला सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पाऊस झाला होता. यावेळी आसल ग्रामपंचायतीच्या हद्दीतील एका शेतकऱ्याच्या शेतात असलेल्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्या शेतकऱ्याला शासनाकडून कोणतीही मदत मिळाली नसून अनेक अडथळे शासकीय पातळीवर समोर केले जात आहेत. वडवली येथील मारु ती काशिनाथ तळपे या शेतकऱ्याने आता कोणाकडे हात पुढे करायचा असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तळपे वडवली येथील मारु ती तलपे यांचे शेतात बांधलेले घराचे सिमेंट पत्रे उडून गेले होते आणि भिंती कोसळल्या होत्या. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसात घराचे प्रचंड नुकसान झालेल्या जागेचा पंचनामा त्यावेळी माणगाव तलाठी सोंडकर यांनी केला होता. त्यावेळी शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन नेरळ मंडल अधिकाऱ्यांनी दिले होते. परंतु सरकारी निर्णय क्र .सीएलएस /२४८३६१- क ६२० /म ३, ३१ जानेवारी १९८३ नुसार त्या दिवशीचे किमान पर्जन्य ६५ मिमी पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. मात्र २४ जूनला पर्जन्य नोंदणीनुसार पावसाची नोंद ६३ मिमी असल्याने त्यांचा अर्ज निकाली काढून नुकसान भरपाई देता येणार नाही असे पत्र दिले आहे. त्यामुळे तळपे यांना नुकसान भरपाईपासून वंचित राहावे लागणार आहे. जून २०१५ मध्ये कर्जत तालुक्यात वादळी वाऱ्यात अनेक घरांचे नुकसान झाले होते. त्यासर्वांचे प्रस्ताव फेटाळण्यात आले आहेत. जोरदार पावसात मोठ्या प्रमाणात घरांचे नुकसान झाले होते. त्या सर्वांना भरपाई मिळालेली नसल्याने ते नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. त्यातील वडवली येथील मारु ती तळपे यांचे घराचे नुकसान होऊन विटा, पत्रे, पाइप, तांदूळ, भांडी यांचे प्रचंड नुकसान झाले होते आणि त्यांचे कुटुंब रस्त्यावर आले होते. महसूल खात्याकडे देण्यात आलेल्या पंचनामा अहवालात सुमारे १ लाख ४ हजार २००रु पयांचे नुकसान झाल्याचा अहवाल कर्जत तहसील कार्यालयात पाठविण्यात आला होता. परंतु पावसाची नोंद कमी असल्याचे दाखवून त्यांचा अर्ज निकाली काढण्यात आला आहे. याबाबत मारु ती तळपे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्जाद्वारे घराचे प्रचंड नुकसान होऊन काहीच भरपाई मिळालेली नाही. तरी अर्जाचा विचार करून थोड्या प्रमाणात का होईना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)