शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

कर्नाळा अभयारण्यात पक्षी, प्राण्यांवर पाणीसंकट

By admin | Published: May 10, 2016 2:10 AM

राज्यात सर्वत्र दुष्काळाचे सावट आहे. या दुष्काळाचा फटका पनवेलजवळील कर्नाळा अभयारण्यालादेखील बसल्याचे दिसून येत आहे

पनवेल : राज्यात सर्वत्र दुष्काळाचे सावट आहे. या दुष्काळाचा फटका पनवेलजवळील कर्नाळा अभयारण्यालादेखील बसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या अभयारण्याला पाणीसंकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे प्राणीप्रेमींसह परिसरातील ग्रामस्थांनी वन खात्याकडे जुन्या पाण्याच्या तलाव स्रोतांचा गाळ काढून पुनरुज्जीवित करण्याची मागणी केली आहे. पनवेल शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कर्नाळा अभयारण्यात सुमारे १२५-१५० जातीचे पक्षी आढळतात. त्याचप्रमाणे मोर, लांडोर, माकडे, रानडुकरे, ससे, हरणे व नुकतेच दर्शन झालेले बिबटे व इतर निशाचर प्राणी यांचे वास्तव्य आहे. यातील सुमारे ४ चौरस कि. मी.च्या परिसरात पक्षी अभयारण्य उभारले आहे. मुंबईपासून ६२ कि. मी. अंतरावर पाताळगंगेच्या खोऱ्यात आपटे, कल्हं, रानसई-चिचवण गावाच्या पंचक्रोशीत हे अभयारण्य वसलेले आहे. या ठिकाणी आपण केव्हाही गेलात तरी पाचपन्नास निरनिराळे पक्षी आढळतात. अगदी परदेशी पर्यटकांनादेखील या अभयरण्याच्या प्रेमात आहेत. मलबार, व्हिसलिंग थ्रश, कोकिळा, फ्लाय कॅचर, भरड्या, तांबट, कोतवाल, पांढऱ्या पाठीची गिधाडे, दयाळ शहीन ससाणा, टिटवी, बगळे असे अनेक पक्षी येथे आढळतात. अभयारण्यात तीन थरांचे जंगल आढळतात. तळातील भागात दिंडा, वावडिंग, कारवी अशी झुडपे आहेत. मध्य भागात पांगारा, बहावा, तामण यांचे प्रमाण जास्त आहे तर उंचावरच्या भागात जांभूळ, साग, आंबा, आईन हे वृक्ष आढळतात. पक्ष्यांव्यतिरिक्त भेकरे, रानमांजर, माकडे, ससे इत्यादी प्राणीही आझळतात. हे अभयारण्य रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात असून ते मुंबईपासून ६० कि.मी. अंतरावर आहे. हे महाराष्ट्रीतील पहिले पक्षी अभयारण्य आहे. कर्नाळा येथे निरनिराळ्या प्रकारचे वृक्ष असून, येथे १५० जातींचे पक्षी आढळतात. यात मोर, बुलबुल, दयाळ, भारद्वाज, तितर, गरुड, घार, पोपट, सुतारपक्षी, कोतवाल, बहिरी, ससाणा, शहाबाज इत्यादी जातींचे पक्षी आढळतात. मात्र आज या अभयारण्यातील पक्षी आणि प्राण्यांनादेखील दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे येथे देखील पाण्याचे दुर्भिक्ष दिसून येते. कर्नाळा अभयारण्यात दोन मोठे तलाव आहेत. यापैकी एक तलाव जरी सुकलेला असला तरी एका तलावमध्ये काही प्रमाणात पाणी असल्याचे चित्र दिसत आहे. या तलावातील गाळ काढल्यास या तलावापासून पशु-पक्ष्यांची तहान भागू शकते. परंतु वन अधिकाऱ्यांचे वेगळेच नियाजन या ठिकाणी पाहण्यास मिळत आहे. तलावांचे खोलीकरण करण्यापेक्षा नवीन तलाव खोदण्याचे काम सुरू केले आहे. जलयुक्त शिवारअंतर्गत ही कामे केली जात आहेत. या कामामुळे जुने तलावेही नाहीसे होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शासनाच्या निधीचा दुरुपयोग या ठिकाणी चालू असल्याचा आरोप शिवसेना पक्षाच्या शाखप्रमुखांकडून होत आहे.