शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
2
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
3
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
4
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
5
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
6
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
7
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
8
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
9
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
10
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
11
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
12
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
14
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
15
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
16
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
17
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
18
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
19
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
20
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर

विहूर धरणातील पाणी आटले

By admin | Published: March 21, 2016 1:43 AM

यंदा पाऊस कमी पडल्याने महाराष्ट्रात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. याचा फटका रायगड जिल्ह्यालाही बसला असून, पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे.

मेघराज जाधव,  मुरूडयंदा पाऊस कमी पडल्याने महाराष्ट्रात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. याचा फटका रायगड जिल्ह्यालाही बसला असून, पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. विहूर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील विहूर धरणातील पाणी आटल्याने विहूरसह मोरे, मजगाव, खारदोडकुले, खारीकवाडा, नांदगाव मोहल्ला व कोळीवाडा गावात एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. एप्रिल, मे महिन्यात तर तीव्र पाणीटंचाईचा सामना येथील नागरिकांना करावा लागणार आहे. मुरुड तालुक्यात गतवर्षी १३० इंचाहून अधिक पर्जन्यमान होते. यंदा हे प्रमाण जेमतेम ९४ इंचापर्यंत पोहोचले. तालुक्यात ७३ गावे ३७ वाडे पाडे असून, २४ ग्रामपंचायती कार्यरत आहेत. मुरुड शहराची लोकसंख्या १२ हजार ७७०, तर उर्वरित गावांची लोकसंख्या ६१ हजार ७४७ एवढी आहे. नळपाणी योजनेंतर्गत भारत निर्माण योजनेतून ११ मंजूर कामांपैकी ८ कामे पूर्ण तर ३ प्रगतिपथावर आहेत. शिवकालीन दोन्ही बंधाऱ्यांचे काम पूर्ण असून, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतील ८ पैकी ५ कामे पूर्ण, तर ३ अपूर्ण आहेत. विहूर ग्रामपंचायत हद्दीत असलेले धरण यंदा पर्जन्यमान कमी असल्याने भरले नाही. केवळ ५० टक्केच पाणीसाठा होऊ शकला. धरणाला नदी वा गाणी (नैसर्गिक पाझर) यासारखे अन्य स्रोत नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात जेवढा जलसाठा होईल त्यावरच विहूर, मोरे, मजगाव, खारदोडकुले, खारीकपाडा, नांदगाव मोहल्ला, कोळीवाडा व नबाबाच्या पॅलेसला पाणीपुरवठा केला जातो. धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने येत्या एप्रिल, मे महिन्यात टँकर वा विंधण विहिरींशिवाय पर्याय नाही. येथील ग्रामस्थ तला कचकोन तसेच एजाज पांगारकर यांच्या मते, विहूर धरणाच्या क्षमतेपेक्षा अधिक गावांना पाणीपुरवठा करण्याचे शासनाचे आदेश अव्यवहार्य आहेत. त्याचा पुनर्विचार होण्याची आवश्यकता आहे. तसेच मजगाव ग्रामपंचायतीच्या जलवाहिन्यांची देखभाल नीट होत नसल्याने पाणी वाया जाते, अशीही माहिती मिळाली. विहूर धरणाचा पाणीसाठा जेमतेम १५ ते २० दिवस पुरेल. पाण्यावर नियंत्रण आणले तर ग्रामस्थांचा रोष पत्करावा लागतो. येत्या एप्रिल, मे महिन्यात प्रशासनाने टँकर, विंधण विहीर उपलब्ध करून घ्याव्यात. यापेक्षा अंबोली धरणातून ५ इंचाची जलवाहिनी जोडून द्यावी.- इकरार मोदी, सरपंच, विहूरयंदा पावसाचे प्रमाण कमी आहे. विहूर धरणात मोठ्या प्रमाणावर गाळ साठला आहे. जनतेने गाळ उपसून न्यावा, जेणेकरून धरणाची खोली वाढेल. मात्र त्यांच्याकडून रॉयल्टी न घेण्याचे आवाहन तहसीलदार उमेश पाटील यांनी केले.- पंडित पाटील, आमदार