शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

पाल्यातील गुंडशाही संपवणार कोण? ‘एपीएमसीसह पाेलिसांनी त्वरित कडक भूमिका घ्यावी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 12:33 IST

पोलिस व बाजार समितीने कडक भूमिका घेऊन गुंडगिरी करणाऱ्यांना मार्केटच्या बाहेर हद्दपार करावे, अशी चर्चा सुरू झाली आहे. 

नवी मुंबई : भाजीपाला मार्केटमधील पाला उचलण्याचा वाद  गोळीबारापर्यंत गेल्यामुळे बाजार समितीच्या प्रतिमेलाही तडा गेला आहे. मार्केट स्वच्छतेचा अधिकृत ठेका दिलेला असताना सामाजिक संस्थांच्या नावाखाली गुंडगिरी करणाऱ्यांना अभय का दिले जात आहे, असा प्रश्न केला जात आहे.

पोलिस व बाजार समितीने कडक भूमिका घेऊन गुंडगिरी करणाऱ्यांना मार्केटच्या बाहेर हद्दपार करावे, अशी चर्चा सुरू झाली आहे. बाजार समितीमध्ये  कोबी, फ्लॉवरचा पाला उचलण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पाल्यात दडलेल्या अर्थकारणामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. 

लाखोंच्या उलाढालीमुळे गुंडांचा शिरकावलाखो रुपयांची उलाढाल होत असल्यामुळे तो उचलण्यासाठीच्या व्यवसायात गुंडांचाही शिरकाव झाला आहे.हाणामारी, धमक्या देणे व राडे हे नित्याचेच झाले आहेत. आता थेट गोळीबार करण्यापर्यंत प्रकरण गेले आहे. अनेक वर्षांपासून पाल्यावरून वाद होत आहेत. गुन्हेगारी विश्वाशी संबंध असलेल्यांचा यामध्ये सहभाग आहे. 

शासनालाही द्यावा अहवालशासनाने सामाजिक संस्थांना पाला उचलण्यासाठी दिलेले काम योग्य नाही, हे बाजार समितीचे अधिकारी, कर्मचारीही खासगीत बोलतात. येथील गुंडगिरी थांबविली पाहिजे, असेही सांगितले जात आहे. आता येथील स्थिती शासनाच्या निदर्शनास आणून कचरा उचलण्याची जबाबदारी साफसफाई ठेकेदारांवरच सोपविण्यात यावी तरच गुन्हेगारीची साखळी मोडीत निघेल, असा सूर उमटू लागला आहे.

अनेकांवर दाखल आहेत गुन्हे काम करणाऱ्यांवर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत. वास्तविक, बाजार समितीच्या पाचही मार्केटमध्ये साफसफाईसाठी अधिकृतपणे ठेकेदाराची नियुक्ती केली आहे. सर्व कचरा उचलण्याची जबाबदारी या ठेकेदाराचीच आहे. ठेकेदारही जबाबदारी टाळत नाही. रात्रंदिवस स्वच्छतेचे काम सुरू आहे. यानंतरही फक्त कोबी, फ्लॉवरच्या पाल्याची जबाबदारी एखाद्या संस्थेवर किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्यांना का दिली जात आहे, असा प्रश्न केला जात आहे. यावरून झालेल्या गोळीबारामुळे बाजार समितीच अप्रत्यक्षपणे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना अभय देत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती