शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

आंबोली कालव्याचे काम अद्याप रखडले

By admin | Published: May 08, 2017 6:29 AM

राज्यभर ‘जलयुक्त शिवार’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत असून अधिकाधिक जमीन पाण्याखाली आणून शेतकऱ्यांचे मनोधैर्य

लोकमत न्यूज नेटवर्कमुरुड जंजिरा : राज्यभर ‘जलयुक्त शिवार’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत असून अधिकाधिक जमीन पाण्याखाली आणून शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्याचे शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. तथापि, मुरुड तालुक्यातील आंबोली धरणावर अवलंबून असलेल्या उजव्या व डाव्या तीर कालव्याचे काम तब्बल दोन वर्षांपासून बंद पडल्याने धरण क्षेत्रातल्या हजारो शेतकऱ्यांना कालव्याचे पाणी न मिळाल्याने भात पिकासारख्या खरीप हंगामावर गुजराण करणे क्र मप्राप्त झाले आहे. आंबोली धरण लघुपाट बंधारे प्रकल्पांतर्गत उजव्या, डाव्या तीर कालव्याचे काम जून २०१५पासून बंद ठेवण्यात आल्याने अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या नशिबी प्रतीक्षा आली आहे. खारअंबोली धरणाची साठवणूक क्षमता प्रंचड आहे. कालव्याचे काम पूर्ण झाल्यास ६१६ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. विशेष भूसंपादन अधिकारी, रायगड-अलिबाग यांसकडून नोव्हेंबर २००६मध्ये तीर कालव्यासाठी तिसले, जोसरांजण, उंडरगाव, वाणदे, शिघ्रे, तसेच हाफिजखार, आंबोली, गोयगान आदी गावांतील शेतकऱ्यांची १६ एकर ३३ गुंठे जमीन संपादित केली. जमिनीची नुकसानभरपाई म्हणून १ कोटी ६४ लाखांचे वाटप उपविभागीय अधिकारी अलिबाग कार्यालयामार्फत करण्यात आले; परंतु प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना सुधारित दराने मोबदला मिळावा, अशी भूमिपुत्रांची मागणी आहे. आंबोली धरणाचा शुभारंभ २००९मध्ये झाला. हे धरण मुरुडसह लगतच्या १२ गावांची जीवनवाहिनी ठरले असून मुबलक पाणीसाठ्यामुळे पर्यटनस्थळी पाण्याची समस्या कायमस्वरूपी मिटली आहे. अंबोली धरण उजव्या तीर कालव्याचे काम ७.१० कि. मी.पैकी ६.१० कि. मी. अपूर्ण असून, डाव्या तीर कालव्याचे २.६४ कि. मी.पैकी १.६४ कि. मी. काम अपूर्ण आहे.कालव्याच्या पाण्याअभावी नारळाची झाडे सुकलीरोहा : रोहा तालुक्यात गेल्या चार वर्षांपासून कालव्याचे पाणी मिळू न शकल्याने ठिकठिकाणी पाणीटंचाई भेडसावत आहे. शेतकऱ्यांनी तयार केलेले कालवेही पाण्याअभावी आटल्याने परिसरातील नारळाच्या बागा सुकल्या आहेत.तालुक्यातील शेतीक्षेत्राच्या विकासाच्या दृष्टीने सुमारे ४० वर्षांपूर्वी सिंचन काळ प्रकल्पाच्या वतीने डोलवहाळ येथे बंधारा बांधून पाणी अडविण्यात आले. त्या बंधाऱ्याच्या माध्यमातून डावा तीर व उजवा तीर अशी कालव्यांची निर्मिती करून शेतीसाठी पाणी उपलब्ध करून दिले गेले. गेल्या ४० वर्षांत कालव्याच्या पाण्यावर ओसाड जमिनीवर शेतकऱ्यांनी चांगल्या प्रकारची भातशेती केली. कालव्याची निर्मिती केल्यापासून ४० वर्षांच्या कालावधीत ठिकठिकाणी कालव्याला भगदाड पडली आहेत. याशिवाय उंदीर, घुशी व खेकडे यांनीही कालवा पोखरून काढल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय होऊ लागला आहे. पर्यायाने मागील काही वर्षांपूर्वी कालव्याची पुनर्निर्मिती व पक्के बांधकाम करण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला. परिणामी, सहा वर्षांत कालव्याचे पाणी बंद झाल्यामुळे भातशेती तर ओसाड राहिली, याचबरोबर भातशेतीच्या बांधावर व मोकळ्या रानमाळावर असलेली विविध प्रकारची झाडे, बागायती व नारळाची झाडे सुकू लागली आहेत.