शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
4
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
5
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
6
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
7
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
8
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
9
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
10
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
12
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
13
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
14
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
15
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
16
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
17
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
19
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
20
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार

कालवा वितरण प्रणालीची कामे ठप्प

By admin | Published: April 04, 2016 2:06 AM

जलयुक्त शिवाराची कामे राज्यभरात मोठ्या प्रमाणात सुरू असताना पेणमधील जलसमृद्धीचे श्रीमंतीचे वैभव धरणातच पडून आहे.

पेण : जलयुक्त शिवाराची कामे राज्यभरात मोठ्या प्रमाणात सुरू असताना पेणमधील जलसमृद्धीचे श्रीमंतीचे वैभव धरणातच पडून आहे. हेटवणे, आंबेघर धरणाचा पाणीसाठा कृषीक्षेत्रासाठी वापर करून पेणमधील ६६६८ हेक्टरवर सिंचनक्षेत्र अपेक्षित असताना राज्य शासनाने गेल्या पंधरा वर्षांत हेटवणे प्रकल्पाच्या वितरिकेची १८ किमी कामे केली आहे.हेटवणे व आंबेघर धरणाच्या ओलिताखाली शेतजमीन आल्यास पेणमधील हरितक्रांतीद्वारे मुंबईसह उपनगरांना फ्रेश भाजीपाला, फळे पुरवठा होणार आहे. पेणच्या शेतकऱ्यांनी एसईझेड प्रकल्पाला हद्दपार केले. त्यामधील २२ गावे एसईझेड प्रकल्पात होती. तशीच या गावांचे क्षेत्र हेटवणे प्रकल्पांच्या ओलिताखाली ही होते. मात्र एसईझेड प्रकल्प २००५ साली आल्यानंतर हेटवणे कालवा विभागाने वितरिकेची कामे ठप्प केली. भूमिगत कालव्यासाठी आलेले मोठमोठे सिमेंटचे पाइप आजतागायत पडून आहेत. पूर्वेला धरणाची रेलचेल तर पश्चिमेला अरबी समुद्रामार्गे मुंबई शहर तासभरात अंतरावर तर रेल्वे व बसप्रवास अडीच तासांचे अंतर येणाऱ्या प्रस्तावित प्रकल्प विकासकांनी तत्कालीन आघाडी सरकारच्या कालखंडात सक्तीचे भूसंपादन लादून जमिनी गिळंकृत करण्याचा डाव सपशेल फसला आणि शेष राहिला म्हणजे हेटवण्याच्या पाण्यावर हरितक्रांतीची नवी पालवी फुटावी ही समग्र शेतकऱ्यांची आशा आकांक्षा आहे.या कामासाठी लागणारा निधी देण्यासाठी अप्पर सचिव वित्त व नियोजन विभागाने यासाठी भरीव तरतूद करून मुख्यमंत्र्यांचा शब्द पाळावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. वर्षभरात ही कामे पूर्ण करावयाची असतील तर हेटवणे कालवा विभागाने मरगळ झटकून कामाला लागले पाहिजे. (वार्ताहर)