युवक काँग्रेसचा मंत्रालयाला घेराव

By admin | Published: August 18, 2015 02:08 AM2015-08-18T02:08:37+5:302015-08-18T02:08:37+5:30

संसद आणि राज्यांच्या विधिमंडळात सुरू असलेली भारतीय जनता पार्टीची दडपशाही आणि काँग्रेसविरोधात सुरू केलेल्या अपप्रचाराला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्णय काँग्रेस

Youth Congress gherao the ministry | युवक काँग्रेसचा मंत्रालयाला घेराव

युवक काँग्रेसचा मंत्रालयाला घेराव

Next

मुंबई : संसद आणि राज्यांच्या विधिमंडळात सुरू असलेली भारतीय जनता पार्टीची दडपशाही आणि काँग्रेसविरोधात सुरू केलेल्या अपप्रचाराला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांनी सोमवारी गांधी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
शेतकऱ्यांच्या समस्या व भ्रष्टाचारासंदर्भात १९ आॅगस्ट रोजी युवक काँग्रेस मंत्रालयाला घेराव घालणार आहे. कदम म्हणाले, शेतकऱ्यांना भरीव मदत आणि भ्रष्ट मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी बुधवारी सकाळी ११-३० वाजता महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस आझाद मैदानातून मंत्रालयावर मोर्चा काढून मंत्रालयाला घेराव घालेल. युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आ. अमरिंदर सिंग ब्रार, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव व महाराष्ट्राचे प्रभारी हिंमत सिंग, विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या या मोर्चात राज्यातील युवक काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी होतील असे पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सांगितले. भाजपा-शिवसेना सरकारच्या कार्यकाळात २००० हून अधिक शेतकरी आत्महत्या झाल्या असल्याचे कदम म्हणाले.

Web Title: Youth Congress gherao the ministry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.