शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
3
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
4
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
5
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
6
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
7
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
8
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
9
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
11
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
12
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
13
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
14
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
15
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
16
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
18
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
19
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
20
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)

जिल्हा परिषदेला हवी मदत

By admin | Published: November 24, 2015 1:59 AM

रायगड जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाला कोट्यवधीच्या निधीची चणचण भासत आहे. जिल्ह्यातील विविध कंपन्यांनी मदतीचा हात पुढे करावा यासाठी त्यांनी प्रयत्नही सुरू केले आहेत

आविष्कार देसाई,  अलिबागरायगड जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाला कोट्यवधीच्या निधीची चणचण भासत आहे. जिल्ह्यातील विविध कंपन्यांनी मदतीचा हात पुढे करावा यासाठी त्यांनी प्रयत्नही सुरू केले आहेत. मात्र हजारो कोटी रुपयांची उलाढाल असणाऱ्या विविध कंपन्या आपल्या खिशात हात घालायला तयार नसल्याचे दिसते. त्यामुळे स्वच्छता मिशन कसे पूर्ण करायचे याबाबत प्रशासनावर डोक्याला हात लावायची वेळ आली आहे.२०१९ सालापर्यंत जिल्ह्यात एक लाख २७ हजार शौचालये उभारायची आहेत. यासाठी प्रत्येकी सुमारे १२ हजार रुपयेप्रमाणे १५२ कोटी ४० लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. सरकारकडे एवढ्या मोठ्या संख्येने निधीची कमतरता आहे. ही सर्व शौचालये टप्प्याटप्प्याने बांधायची असल्याने त्याप्रमाणात निधीची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे निधी उभारण्याचे आव्हान तर दुसरीकडे उद्दिष्टपूर्ती करणे असे दुहेरी संकट रायगड जिल्हा प्रशासनापुढे उभे राहिले आहे. सरकारकडे निधी नव्हता, तर एवढे मोठे मिशन हाती घेण्याची सरकारला काय गरज होती असा सूरही आता उमटत आहे.निधीचा प्रश्न सुटावा यासाठी सरकारने एक सुपीक कल्पना बाहेर आणली आहे. जिल्ह्यातील विविध कंपन्यांकडून सीएसआर फंडाच्या माध्यमातून योजना पूर्ण करण्याकडे सरकारचा कल आहे. कंपन्यांनी सामाजिक उत्तरदायित्वातून स्वच्छताविषयक उपक्रम राबवावा. यासाठी १९ नोव्हेंबर २०१४ च्या सरकारी निर्णयाचा आणि कोकण उपआयुक्तांच्या ५ डिसेंबर २०१४ च्या ईमेलचा आधार घेतला आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या स्वच्छता विभागाने जिल्ह्यातील कंपन्यांना त्या त्या स्तरावरील गटविकास अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पाणी व स्वच्छतेसाठी सीएसआर फंड खर्च करावा. याबाबत पत्रव्यवहार केला आहे, मात्र त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद आलेला नाही, अशी माहिती पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी पुंडलिक साळुंखे यांनी दिली. जिल्ह्यात सुमारे २४५ छोट्या-मोठ्या कंपन्या आहेत. त्यांची उलाढाल सुमारे ५०० कोटी रुपयांपासून अडीच हजार कोटी रुपयांपर्यंत आहे. या कंपन्या येथे व्यवसाय करुन कोट्यवधी रुपयांचा नफा कमवित आहेत. त्यांचे उत्तरदायित्व म्हणून कंपन्यांनी मदतीचा हात पुढे करणे गरजेचे आहे.