शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
5
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
6
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
8
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
9
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
10
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
11
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
12
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
13
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
15
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
16
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
17
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
18
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
19
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस

विंडीज बोर्डावर 250 कोटींचा दावा

By admin | Published: November 02, 2014 12:59 AM

धर्मशाला येथे वन-डे सामना खेळल्यानंतर भारताचा दौरा तडकाफडकी सोडल्याबद्दल भारतीय क्रिकेट बोर्डाने वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डावर 250 कोटींचा नुकसानभरपाई दावा दाखल केला आहे.

ब्रिजटाऊन : धर्मशाला येथे वन-डे सामना खेळल्यानंतर भारताचा दौरा तडकाफडकी सोडल्याबद्दल भारतीय क्रिकेट बोर्डाने वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डावर 250 कोटींचा नुकसानभरपाई दावा दाखल केला आहे. बोर्डासोबत वेतन मुद्दय़ावर सुरू असलेल्या तंटय़ामुळे विंडीज खेळाडूंनी न खेळण्याचा निर्णय घेतला. यामुळे आधीच कंगाल झालेल्या विंडीज बोर्डाला बीसीसीआयने हा आणखी एक धक्का दिल्याने संकट कोसळू शकते.
बीसीसीआय सचिव संजय पटेल म्हणाले, की मी 25क् कोटी नुकसानभरपाई करण्याची मागणी असलेले पत्र विंडीज बोर्डाकडे पाठविले आहे. आम्ही दौरा सुरू ठेवण्यासाठी वारंवार आग्रह धरला; शिवाय मध्यस्थीची तयारीही दाखविली. तरीही दौ:यातून माघार घेतल्याने भारतीय क्रिकेटच्या नुकसानभरपाईचा दावा करणारे पत्र पाठवावे लागले. 
पाच सामन्यांच्या वन-डे मालिकेपाठोपाठ विंडीजला भारताविरुद्ध एक टी-2क् सामना आणि हैदराबाद, बंगळुरू तसेच अहमदाबाद येथे कसोटी सामने खेळायचे होते.
बीसीसीआयने विंडीज बोर्डाला नुकसानभरपाई कशी करणार, याची ठोस योजना सादर करण्यासाठी दोन आठवडय़ांचा अवधी दिल्याचे विश्वसनीय सूत्रंनी सांगितले. असे न झाल्यास कॅरेबियन बोर्डाविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली जाईल.
 
 
 
पटेल यांच्या स्वाक्षरीनिशी असलेल्या या पत्रत पुढे म्हटले आहे, की बीसीसीआयला जो आर्थिक फटका बसला, त्याची नुकसानभरपाई कशी करणार आणि त्यासाठी काय पावले उचलणार, हेदेखील स्पष्ट करावे. पत्र मिळाल्यापासून 15 दिवसांत अटी आणि शर्ती स्वीकारार्ह असल्याचा प्रस्ताव मिळाला नाही, तर बीसीसीआय भारतीय न्यायालयात आपल्या वकिलांमार्फत खटला दाखल करेल. ही पहिली नोटीस औपचारिक मागणी असल्याचे आपण मानू शकता. पटेल यांनी हे पत्र विंडीज क्रिकेट बोर्डाचे प्रमुख डेव्ह कॅमेरून यांना पाठविले आहे.(वृत्तसंस्था)
 
भारताची मनधरणी करावी : अॅण्डी रॉबर्ट्स
बीसीसीआयने 25क् कोटींचा नुकसानभरपाईचा दावा केल्यामुळे विंडीज बोर्डाचे अस्तित्व धोक्यात येणाची भीती व्यक्त करून हा दावा मागे घेण्यासाठी विंडीज अधिका:यांनी ताबडतोब भारतात दाखल होऊन समजूत काढायला हवी, असे मत विंडीजचे वेगवान गोलंदाज अॅण्डी रॉबर्ट्स यांनी व्यक्त केले.
बीसीसीआयने विंडीजसोबतचे क्रिकेट संबंध तोडलेच; शिवाय मोठय़ा रकमेची मागणी केली. यामुळे विंडीज क्रिकेट संपण्याची भीती आहे. यावर रॉबर्ट्स म्हणाले, ‘‘विंडीज बोर्ड आणि खेळाडूंमध्ये काय चालले आहे, हे पाहण्यासाठी टास्क फोर्स स्थापन करण्यापेक्षा विंडीजच्या अधिका:यांनी भारतात दाखल होऊन समजूत काढायला हवी. भारत-विंडीजदरम्यान पुढील आठ वर्षात पाच मालिकांचे आयोजन आहे. त्यात चार वेळा भारतीय संघ विंडीजचा दौरा करेल. भारताने हे दौरे न केल्यास आमच्या देशातील क्रिकेट रसातळाला जाईल.’’ दौरा अर्धवट सोडणा:या खेळाडूंच्या निर्णयाचा मी धिक्कार करतो; पण कुणाला दोषी धरण्याआधी सविस्तर माहिती मिळवावी लागेल, असे रॉबर्ट्स यांचे मत आहे. (वृत्तसंस्था)