शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

अभिजितची साधना फळास आली, ड्रॉ अवघड असतानाही दडपण न बाळगता मारली बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 00:41 IST

पुणे : हवेली तालुक्यातील कटकेबवाडीच्या अभिजितने महाराष्ट्राच्या लालमातीचा सर्वोत्तम किताब मिळविताना गेली सहा-सात वर्षे केलेली साधना अखेर फळास आली.

पुणे : हवेली तालुक्यातील कटकेबवाडीच्या अभिजितने महाराष्ट्राच्या लालमातीचा सर्वोत्तम किताब मिळविताना गेली सहा-सात वर्षे केलेली साधना अखेर फळास आली.६१ व्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्र केसरी गटात अभिजित सहभागी झाला तो गदा मिळविण्याच्या भक्कम इराद्याने. सोडत अवघड असताना देखील अभिजितच्या चेहºयावर तसुभर दडपण आले नव्हते. पहिल्याच फेरीत पुणे जिल्ह्याचा महाबली शिवराज राक्षेचे आव्हान ७-२ गुणांनी आघाडी घेत सहजतेने परतवून लावले होते. शिवराजवर केलेली आक्रमणे अतिशय वाखणण्याजोगी होती. पहिल्यांच फेरीतून मी किताबाचा प्रबळ दोवदार आहे याची चुणूक त्याने दाखविली.दुसºया फेरीत आंतरराष्ट्रीय खेळाडू गणेश जगताप याच्याबरोबर झालेली लढत अतिशय शांत डोक्याने खेळत अभिजितने गुणांवर मात केली. थंड डोक्याने केलेले डावपेच अभिजितला विजयी करण्यास सहायभूत ठरले. मोक्याच्या वेळी अभिजितने केलेला बचाव एखाद्या मुत्सद्दी कुस्तीगीरासारखा होता.उपांत्य फेरीत कोल्हापूरच्या महेश वरुटेबरोबरची लढत अभिजितच्या दृष्टीने फारशी आव्हानात्मक नव्हती. महेश वरुटेवर एका पाठोपाठ एक गुणांची कमाई करत लढत १० गुणांच्या फरकाने अभिजितने एकतर्फी जिंकत गादी विभागाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.या अंतिम फेरीच्या लढतीत अक्षय शिंदेचे आव्हान खडतर असेल असे अनेक कुस्ती शौकिनांचे मत होते. कारण वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेच्या निवड चाचणीत अभिजित विरुद्ध अक्षयची लढत काटेकी टक्कर अशी झाली होती. परंतु या लढतीतील चुका ध्यानात घेऊन अभिजितने अक्षयला कोणतीही संधी न देता सलग गुणांची बरसात करत एका पाठोपाठ एक १० गुण मिळवून उपस्थित कुस्ती शौकिनांचे अंदाज चुकीचे ठरवत एकतर्फी विजय मिळवून महाराष्ट्र केसरी किताबाच्या अंतिम फेरीत धडक मारली.खºया अर्थाने अभिजितची कसोटी होती ती अनुभवी किरण भगतच्या प्रबळ आव्हानासाठी. सहा मिनिटाच्या कुस्तीपैकी पाच मिनिटे १२ सेकंद कुस्ती झाली असताना ४-७ गुणांनी पिछाडीवर असलेल्या अभिजितने शेवटच्या ४० सेकंदात दिलेली लढत आजही प्रेक्षकांच्या डोळ्यासमोरून न हलणारी आहे. एवढेच नाहीतर अभिजितचे मार्गदर्शक अमर निंबाळकर यांनी दाखविलेली खेळाडू वृत्ती आणि अभिजितला दिलेले प्रोत्साहन या कुस्तीचे वैशिष्ट्य म्हणता येईल. ८-७ गुणांचा गुणफलक आणि २० सेकंद बाकी, समोर अनुभवी किरणसारखा मल्ल हुकमी डाव टाकण्याच्या इराद्यात आणि अशा वेळी न गडबडता अभिजितने केलेला बचाव आणि त्यातून संपादन केलेले गुण फारच दुर्मिळतेने पाहण्यास मिळतात.एकंदरीत अभिजितचा विजय म्हणजे अखंड साधनेतून केलेली मेहनत, आक्रमक लढाऊ वृत्ती आणि भक्कम बचाव या त्रिसूत्रीमुळे मिळाला असे म्हणणे वावगे ठरणार नाही.महाराष्ट्र केसरीच्या या रंगतदार लढतीबरोबर अनेक उमद्या खेळाडूंनी देखील प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. पहिल्यांदाच वरिष्ठ विभागात पदार्पण केलेला पुणे जिल्ह्याचा आदर्श गुंड याने मिळविलेला विजय खूपच कौतुकास्पद होता. कांस्यपदकाला गवसणी घालताना आदर्शने अनेक अनुभवी मल्लांना लीलया हरवले. तसेच पुणे शहराच्या तेजस वांजळेने मिळविलेले सुवर्ण पदकदेखील वाखणण्याजोगे ठरले. माती विभागात इंदापूरच्या सागर मारकडचे सुवर्णपदक काही कमी मोलाचे नव्हते. थोडक्यात पुणे जिल्ह्यातील या नवोदित मल्लांचे यश देखील तोलामोलाचे आहे.