शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

आदित्य वर्मा यांचे शशांक मनोहर यांना आव्हान

By admin | Published: February 26, 2016 4:06 AM

बिहार क्रिकेटला बीसीसीआयचे पूर्ण सदस्यत्व मिळवून देण्यासाठी प्रदीर्घ कालावधीपासून संघर्ष करीत असलेले क्रिकेट असोसिएशन आॅफ बिहारचे (सीएबी) सचिव आदित्य वर्मा

नवी दिल्ली : बिहार क्रिकेटला बीसीसीआयचे पूर्ण सदस्यत्व मिळवून देण्यासाठी प्रदीर्घ कालावधीपासून संघर्ष करीत असलेले क्रिकेट असोसिएशन आॅफ बिहारचे (सीएबी) सचिव आदित्य वर्मा यांनी आता बोर्डाचे अध्यक्ष शशांक मनोहर यांना चर्चेसाठी आव्हान दिले आहे. आदित्य वर्मा यांनी बीसीसीआयवर अहंकार बाळगणारी संस्था असल्याचा आरोप करताना गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात बीसीसीआय विरोधात याचिका दाखल केली आहे. वर्मा म्हणाले, ‘बीसीसीआय जस्टीस लोढा समितीच्या शिफारशींना महत्त्व देण्याचे टाळत असून न्यायालयाचा अवमान करीत आहे.’वर्मा पुढे म्हणाले, ‘मी सर्वोच्च न्यायालयात बीसीसीआयच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. यावर ३ मार्च रोजी सुनावणी होणार आहे. जस्टीस लोढा समितीने आपल्या शिफारशींमध्ये बिहारला पूर्ण सदस्यता बहाल करण्याची सूचना केली आहे; पण बीसीसीआयने मात्र अद्याप याबाबत कुठलाही निर्णय घेतलेला नाही. बीसीसीआय स्वत:ला अहंकारी संस्था मानत असून त्यांच्या लेखी सर्वोच्च न्यायालयातर्फे स्थापन करण्यात आलेल्या समितीला महत्त्व नाही.’बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांना पदावरून हटविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आदित्य वर्मा यांनी आता शशांक मनोहर यांना खुले आव्हान दिले आहे. आदित्य म्हणाले, ‘शशांक मनोहर मोठे वकील आहेत; पण लोढा समितीच्या शिफारशींना ते महत्त्व देत नाहीत, ही आश्चर्याची बाब आहे. ते नियमबाह्य कृती का करीत आहेत, हे न समजण्यासारखे आहे. मी त्यांना वादविवादासाठी आव्हान देत असून यात माझी सरशी होईल, असा मला विश्वास आहे. त्यांनी जर मला पराभूत केले तर मी क्रिकेट सोडून देईल.’आदित्य पुढे म्हणाले, ‘गेल्या १५ वर्षांपासून राष्ट्रीय क्रिकेट खेळण्यापासून वंचित असलेल्या बिहारमधील क्रिकेटपटूंसाठी माझी लढाई सुरू आहे. बीसीसीआयने बिहारमधील कुठल्याही संघटनेला मान्यता दिली तर मला अडचण नाही. बीसीसीआयने कुठल्याही संघटनेला मान्यता न दिल्यामुळे मला सर्वोच्च न्यायलयाचे दार ठोठवावे लागले. ३ मार्च रोजी या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर बोर्डाला निश्चितच मोठा धक्का बसणार आहे. काही राज्यांमध्ये चार तर काहीमध्ये तीन असोसिएशन आहेत; पण बिहार प्रकरणात झारखंडची निर्मिती झाल्यानंतर झारखंड क्रिकेट संघटनेला मान्यता देण्यात आली. मात्र, बिहार क्रिकेट संघटनेकडे डोळेझाक करण्यात आली. मुंबईमध्ये गेल्या १९ फेब्रुवारी रोजी झालेल्या बीसीसीआयच्या विशेष आमसभेमध्ये बोर्डाने अवैधपणे बीसीए पाटणा येथील एका गटाला पाचारण केले होते. त्यांना बैठकीमध्ये सहभागी होण्याची संधी दिली. हे लोढा समितीच्या अहवालाचे उल्लंघन आहे.’ (वृत्तसंस्था)शिफारशींचे पालन करण्यास टाळाटाळ लोढा समितीने आपल्या अहवालामध्ये बिहारला मताचा अधिकार बहाल करण्यासह पूर्ण सदस्यता प्रदान करण्याची शिफारस केली आहे. बीसीसीआयचे विद्यमान अधिकारी लोढा समितीच्या शिफारशींचे पालन करण्यास टाळाटाळ करीत आहेत. बीसीएच्या एका गटाला परवानगी बहाल करताना सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करीत आहेत. मी दाखल केलेल्या याचिकेमध्ये बोर्डाने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राचा आणि लोढा समितीच्या अहवालाचा उल्लेख केला आहे.