शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
3
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
4
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
5
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
6
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
7
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
8
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
9
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
10
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
11
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
12
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
13
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
14
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
15
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
16
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
17
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
18
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
19
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
20
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी

पुन्हा "जिंक्स" फॅक्टर आणि मुंबईचा भेदक मारा

By admin | Published: May 22, 2017 2:21 AM

आयपीएल १० चे विजेतेपद मुंबई इंडियन्सने पटकावले. आयपीएलमध्ये तीन वेळा विजेतेपद पटकावण्याचा विक्रम मुंबईने केला

आकाश नेवे/ आॅनलाईन लोकमत

हैदराबाद , दि. 22 - आयपीएल १० चे विजेतेपद मुंबई इंडियन्सने पटकावले. आयपीएलमध्ये तीन वेळा विजेतेपद पटकावण्याचा विक्रम मुंबईने केला. अंतिम लढतीत मुंबईला पुन्हा एकदा जिंक्स फॅक्टर म्हणजेच अजिंक्य रहाणेचा सामना करावा लागला.बुमराह, मलिंगा, जॉन्सन या तिकडीने अचूक आणि भेदक गोलंदाजीने हा सामना मुंबईच्या बाजूने फिरवला. आयपीएल १० मध्ये मुंबई इंडियन्सच्या पुणे संघाविरोधातील विजयाचा मोठा अडसर ठरला होता तो जिंक्स म्हणजेच अजिंक्य रहाणे. रहाणेने मुंबई विरुद्ध पुणे या सामन्यात नेहमीच मोठी धावसंख्या उभारली होती. फायनलमध्येही तो मोठी धावसंख्या उभारण्यात यशस्वी ठरला. मात्र संघाच्या धावगतीने अखेरच्या क्षणात पुण्याचा एका धावेने घात झाला. पुण्याचा विजयासाठी एक धाव उणी पडली. हैदराबादच्या उप्पल स्टेडिअमची संथ खेळपट्टी पाहता मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पुण्याच्या गोलंदाजांना अफलातून मारा करताना मुंबईला अडचणीत आणले. मुंबई शंभरीही पार करेल का प्रश्न निर्माण झाला. मात्र संघाचे संतुलन ठेवणारा अष्टपैलु कृणाल पांड्याने याने ४७ धावांची दमदार खेळी केली. त्यामुळे मुंबईने १२९ धावा केल्या. आयपीएलच्या अंतिम फेरीतील ही सर्वात कमी धावसंख्या होती. पुण्याची सुरूवातही दमदार झाली. साखळी फेरीत आणि क्वालिफायर १ च्यासामन्यात मुंबईसमोर उभा ठाकणाऱ्या अंजिक्य रहाणे याने स्मिथच्या साथीने ५४ धावांची भागिदारी केली. रहाणेला चौथ्याच षटकांत जीवदान मिळाले होते.त्याचा त्याने फायदा घेतला. मात्र दुसऱ्या बाजुने स्मिथ संथ खेळत होता. नंतर स्मिथने धावांचा वेग वाढवला पण तो पर्यंत बहुदा वेळ निघून गेली होती. यॉर्करमॅन बुमराह आणि मलिंगा यांनी डेथ ओव्हर्समध्ये केलेल्या अचुक माऱ्याच्या जोरावर अखेरच्या षटकापर्यंत सामना खेचला. अखेरच्या षटकांत पुण्याला विजयासाठी ११ धावा हव्या होत्या. त्यातच मनोज तिवारीने पहिल्या चेंडूवर चौकार खेचला. मात्र मिशेल जॉन्सन याने पुण्याच्या फलंदाजांना अनुभव काय असतो हे दाखवून दिले. मुंबईचा विक्रमी विजय मुंबईने तीन वेळेस या स्पर्धेत विजेतेपद पटकावले आहे. या आधी मुंबईने २०१३ आणि २०१५ मध्ये विजेतेपद पटकावले होते. त्यासोबतच केकेआर आणि सीएसकेने दोन वेळा विजेतेपद पटकावले आहे. आॅरेंज कॅप - सनराजयर्स हैदराबादच्या डेव्हिड वॉर्नर आणि ख्रिस गेल यांनी दोन वेळा आॅरेंज कॅप पटकावली आहे. वॉर्नरने २०१५ आणि २०१७ मध्ये तर गेल याने २०११ आणि २०१२ मध्ये आॅरेंजकॅप पटकावली होती.पर्पल कॅप - ब्राव्हो याने २०१३ आणि २०१५ मध्ये तर भुवनेश्वर कुमार याने २०१६ आणि २०१७ मध्ये पर्पल कॅप दोन वेळा पटकावलीएकाच संघातील खेळाडूंनी आॅरेंज कॅप आणि पर्पल कॅप पटकावण्याचा विक्रम या सत्रात झाला आहे. हैदराबादच्या वॉर्नर आणि भुवनेश्वर कुमार यांनी ही कामगिरी केली तर या आधी २०१३ मध्ये सीएसकेच्या माईक हसी आणि ब्राव्होयांनी ही कामगिरी केली होती.महेंद्र सिंह धोनी या हा आयपीएल अंतिम लढतीतील सलग चौथा पराभव आहे. त्याने याआधी सीएसकेकडून २०११ च्या विजेतेपदानंतर २०१२,२०१३,२०१५ अंतिम फेरी गाठली होती. त्यात पराभूत व्हावे लागले. तर यंदा त्याने पुणे संघाकडून अंतिम फेरी गाठली मात्र आताही पराभवच पदरी पडला. धोनीने आयपीएलच्या सात अंतिम लढती खेळल्या त्यातील पाच अंतिम लढतीत पराभव स्विकारला आहे. त्या खालोखाल सुरेश रैना चार अंतिम लढतीत पराभव पत्करावालागला.