शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
2
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
3
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
4
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
5
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
6
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
7
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
8
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
9
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
10
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
11
Pitru Paksha 2024: विशेषतः पितृपर्वात त्र्यंबकेश्वर येथे जाऊन का केली जाते कालसर्प शांती? वाचा
12
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
13
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
14
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
15
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
16
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
17
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
19
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
20
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप

... आणि बांगलादेशी वाघांचे झाले मांजर !

By admin | Published: June 16, 2017 4:09 AM

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या उपांत्य लढतीचा निकाल अखेर अपेक्षेप्रमाणे लागला. संपूर्ण भूतल पादाक्रांत करण्याच्या इराद्याने

- बाळकृष्ण परब/ऑनलाइन लोकमत
 
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या उपांत्य लढतीचा निकाल अखेर अपेक्षेप्रमाणे लागला. संपूर्ण भूतल पादाक्रांत करण्याच्या इराद्याने निघालेल्या सैन्याने वाटेत येणारे अडथळे अगदी सहजपणे चिरडून पुढे वाटचाल करावी, तसे विराट सेनेने बांगलादेशला चिरडले. तसे या सामन्यापूर्वी त्यांनी डरकाळ्या फार फोडल्या. सोशल मीडियावर टिंगल केली. पण प्रत्यक्ष मैदानात भारताच्या सिंहाशी गाठ पडल्यावर त्यांना पळता भूई थोडी झाली. मँचेस्टरच्या मैदानात फक्त भारतीय सिंहाची डरकाळी घुमली आणि बांगलादेशी वाघांचे पार मांजर झाले.
बांगलादेशचा संघ युवा आहे, त्यांच्यात जोश आहे. त्यांनी काही वेळा भारताला पराभूतही केलेय. पण म्हणून प्रत्येक वेळी भारतीय संघ त्यांच्यासमोर कमकुवत ठरेल असे नाही. या सामन्यात भारतीय संघ वरचढ ठरणार हे निश्चित होते. गरज होती ती प्रतिस्पर्ध्याला कमी न लेखता सावध राहण्याची. टीम इंडियाच्या शिलेदारांनी त्याची योग्य खबरदारी घेतली आणि अगदी शांतपणे आपली रणनीती अमलात आणत बांगलादेशला गारद केले.
खरंतर बांगलादेशी खेळाडू या लढतीत प्रचंड तयारी करून उतरले होते. जागतिक क्रिकेटच्या मंचावर भारतीय संघाला मात देण्याचा त्यांचा इरादा होता. खराब सुरुवात झाल्यानंतर तमीम इक्बाल आणि मुशफिकूर रहिम खेळपट्टीवर असेपर्यंत बांगलादेशने आपल्यावर वर्चस्व राखले होते. पण केदार जाधवला गोलंदाजीसाठी आणण्याचा विराट कोहलीचा डाव भारतीय संघासाठी मास्टरस्ट्रोक ठरला. केदारने घेतलेले तमिम आणि मुशफिकूरचे बळी सामन्यात टर्निंग पॉईंट ठरले. त्यानंतर मात्र बांगलादेशी खेळाडूंना सामन्यात पुनरागमन करणे शक्य झाले नाही. 
बांगलादेशी फलंदाजांनी अडखळत धडपडत उभे केलेले 265 धावांचे आव्हान भारतीय फलंदाजांसाठी किरकोळ होते. पुढे धवन, विराट आणि रोहितच्या फलंदाजीने ते अगदीच किरकोळ बनवून टाकले.  शानदार शतकी खेळी करणाऱ्या रोहिबरोबर विराटचेही शतक पूर्ण झाले असते तर दुधात साखर पडली असती, असो. धवन, विराट आणि रोहितची धडाकेबाज फलंदाजी पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या अंतिम लढतीपूर्वी सुचिन्हच म्हटले पाहिजे. तसेच प्रत्येक स्पर्धेगणिक आपली कामगिरी उंचावणारा बांगलादेशचा संघ भविष्यात अधिक देदीप्यमान यश मिळवेल, हेही येथे नमूद करावे लागले. आता आपल्याला रविवारवर लक्ष केंद्रित करावे लागेल. त्यात योगायोगाने पुन्हा एकदा पाकिस्तानसोबत अंतिम लढत खेळण्याची संधी मिळालीय. त्यामुळे या लढतीचं महत्त्व शतपटीने वाढलंय. बाकी फायनलमध्ये पाकिस्तानला लोळवून अजिंक्यपद पटकावण्यात जी मजा आहे ती दुसऱ्या कशातही नाही...