शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
2
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
3
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
4
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
5
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
6
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
7
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
8
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
9
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
10
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
11
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
12
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
13
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
14
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
15
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
16
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
17
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
18
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
19
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
20
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'

अश्विन-साहाची नाबाद शतकी भागीदारी; भारत सुस्थितीत

By admin | Published: August 10, 2016 5:53 AM

रविचंद्रन अश्विन व वृद्धिमान साहा यांनी केलेल्या नाबाद शतकी भगीदारीमुळे तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने पहिल्या दिवसाचा खेळ संपला ५ बाद २३४ धावा केल्या. अश्विन ७५ तर वृद्धिमान साहा ४८ धावावर खेळत होते

ऑनलाइन लोकमतसेंट लुसिया, दि. १० : वेस्ट इंडिजविरुध्दचा तिसरा कसोटी सामना जिंकून चार सामन्यांची मालिका जिंकण्याच्या प्रयत्नात असलेला भारतीय संघ पहिल्याच दिवशी अडचणीत आला. पण मोक्याच्या वेळी रविचंद्रन अश्विन व वृद्धिमान साहा यांनी केलेल्या नाबाद शतकी भगीदारीमुळे तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने पहिल्या दिवसाचा खेळ संपला ५ बाद २३४ धावा केल्या. अश्विन ७५ तर वृद्धिमान साहा ४८ धावावर खेळत होते. आघाडीचा फलंदाज राहुलने ५० व राहानेने ३५ धावांचे योगदान दिले.दरम्यान, शिखर धवन, कर्णधार विराट कोहली स्वस्तात परतल्यानंतर आणि अर्धशतकवीर लोकेश राहुलही (५०) बाद झाल्याने भारताने चहापानापर्यंत ५२ षटकात ५ बाद १३० धावांची मजल मारली होती. विशेष म्हणजे मालिकेत प्रथमच संधी देण्यात आलेला रोहित शर्माही (९) अपयशी ठरल्यानंतर भरवशाचा अजिंक्य रहाणे (३५) खराब फटका मारुन परतला. पण अश्विन आणि साहा यांनी विकेटन पडू देता खेळपट्टीवर उभे ठाकले.

डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात यजमानांनी नाणेफेक जिंकून टीम इंडियाला प्रथम फलंदाजीस निमंत्रित केले. कर्णधार जेसन होल्डरचा विश्वास गोलंदाजांनी सार्थ ठरवताना भारतीयांना जखडवून ठेवले. सलामीवीर शिखर धवन अडखळत खेळत असताना दुसरीकडे राहुल आत्मविश्वासाने खेळत होता. शॅनन गॅब्रियलने धवनला (४) यष्टीरक्षक शेन डॉर्विचकरवी बाद करुन भारताला पहिला धक्का दिला. भारत या धक्क्यातून सावरत असतानाचा युवा गोलंदाज अलझारी जोसेफने कर्णधार विराट कोहलीला स्लीपमध्ये डॅरेन ब्रावो करवी झेलबाद केले.

या निर्णायक बळीनंतर विंडिजला राहुलच्या तंत्रशुध्द फटकेबाजीला सामोरे जावे लागले. यावेळी मुंबईकर अजिंक्य रहाणेने संयमी फलंदाजी घेत खेळपट्टीचा अंदाज घेतला. तर, स्थिरावलेल्या राहुलने शानदार अर्धशतक झळकावले. मात्र, अष्टपैलू रोस्टन चेसने राहुलला क्रेग ब्रेथवेटकरवी झेलबाद करुन पुन्हा भारताला बॅकफूटवर आणले. राहुलने ६५ चेंडूत ६ चौकारांसह ५० धावा फटकावल्या. त्याने रहाणेसह तिसऱ्या बळीसाठी ५८ धावांची भागीदारी केली.

यानंतर रोहित शर्माच्या कामगिरीकडे भारतीयांचे लक्ष होते. मात्र तो केवळ ९ धावा काढून जोसेफचा शिकार ठरल्याने भारताची ४ बाद ८७ अशी अवस्था झाली. रहाणे आणी अश्विन यांनी पाचव्या विकेटसाठी ३९ धावांची भागीदारी केली. रहाणे - अश्विन भारताला सावरणार असे दिसत असतानाच रहाणेचा चेसला स्वीप करण्याचा अंदाज चुकला आणि तो त्रिफळाचीत झाला. रहाणेच्या य चुकीमुळे भारताचा अर्धा संघ १२६ धावांत परतला. उद्या भारताला अश्विन, साहा, जडोजा यांचाकडून खेळपट्टीवर टिकून धावा वाढवण्याच्या आशा असतील.