शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

आशिया चषकाची फायनल भारत आणि बांगलादेश संघांमध्ये, बांगलादेशचा पाकिस्तानवर ५ गडी राखून दणदणीत विजय

By admin | Published: March 02, 2016 10:29 PM

सौम्य सरकार (४८)च्या दमदार खेळीच्या जोरावर बागंलादेशने पाकिस्तानला ५ विकेटने पराभव करत आशिया चषकाच्या अंतिम फेरित धडक मारली, आंतिम फेरित त्यांची लढत भारताशी होईल

मिरपूर, दि. २ - सौम्य सरकार (४८)च्या दमदार खेळीच्या जोरावर बागंलादेशने पाकिसतानला ५ विकेटने पराभव करत आशिया चषकाच्या अंतिम फेरित धडक मारली, आंतिम फेरित त्यांची लढत भारताशी होईल. यजमान बांगलादेशने आज करो या मरो लढतीत संपूर्ण सामन्यात पाकिस्तावर वर्चस्व गाजवले. 
 
गुणतालिकेत भारताचे ३ सामन्यात ६ गुण असून भारताचा एक सामना बाकी आहे. तो यूएई बरोबर असल्यामुळे गुणतालिकेत भारतच आघाडीवर राहील. बांगलादेश संघाने अटीतटीच्या सामन्यात पाकिस्तानला ५ गड्यांनी पराभव करत गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आणि आपली अंतिम सामन्यातील दावेदारी निच्छित केली. ३ मार्च रोजी भारताचा मुकाबला यूएईशी होइल तर ४ मार्च रोजी पाकिस्तान आणि श्रीलंकेत औपचारिक लढत होणार आहे कारण दोन्ही संघाचे आशिया चचषकातील आव्हान संपूष्टात आलेले आहे. ६ मार्च रोजी भारत आणि बांगलादेशमध्ये आशिया चषकाची अंतिम लढत होणार आहे. 
 
त्यापूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानला सर्फराज अहमदच्या झुंजार अर्धशतकी खेळीनंतर बांगलादेशाने आशिया चषक ट्वेंटी - २० क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानला २० षटकांत १२९ धावांवर रोखले. पाकिस्तानकडून सर्फराज अहमदने ४२ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ५८ धावांची खेळी केली. शोएब मलिकने ३० चेंडूंत ५ चौकार व एका षटकारासह ४१ धावा फटकावल्या. बांगलादेशाकडून अल अमीन हुसेन याने २५ धावांत ३ गडी बाद केले. त्याला अराफत सन्नी याने ३५ धावांत २ गडी बाद करून साथ दिली. तस्कीन अहमद आणि मोर्तझा यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.
 
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी पत्करण्याचा पाकिस्तानचा निर्णय चुकीचा ठरवताना बांगलादेशाच्या गोलंदाजांनी ८.२ षटकांतच त्यांची अवस्था ४ बाद २८ अशी दयनीय केली. अखेर सर्फराज अहमद आणि शोएब मलिक यांनी पाचव्या गड्यासाठी ४४ चेंडूंत केलेल्या ७० धावांच्या भागीदारीमुळे पाकिस्तानला २० षटकांत ७ बाद १२९ पर्यंत मजल मारता आली.