शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Asian Champions Trophy: भारताचा पाकिस्तानवर 3-1 ने मोठा विजय, सेमीफायनलमध्ये दमदार एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 18:31 IST

भारताच्या हरमनप्रीतने 2 आणि आकाशदीपने 1 गोल करत भारतीय संघाची पकड मजबुत केली.

पाकिस्तानविरुद्ध दणदणीत विजय नोंदवत भारताने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. हरमनप्रीतच्या दोन आणि आकाशदीपच्या एका गोलच्या जोरावर टीम इंडियाने पाकिस्तानचा 3-1 ने पराभव केला. पाकिस्तानच्या जुनैदने पाकिस्तानकडून एकमेव गोल केला. हरमनप्रीतने दोनदा पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर केले. सामन्यात भारताने पहिल्या क्वार्टरमध्ये आघाडी घेत पाकिस्तानला पुनरागमनाची संधी दिली नाही.

सामन्याच्या तिसऱ्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांनी चांगला खेळ करत प्रत्येकी एक गोल केला. आकाशदीपने भारतासाठी दुसरा गोल करत टीम इंडियाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर पाकिस्तानच्या जुनैद मंजूरने गोल करत भारताची आघाडी कमी केली. मात्र, नंतर हरमनप्रीतने या सामन्यात दुसरा गोल करत भारताला 3-1 अशी आघाडी मिळवून दिली, जी निर्णायक ठरली.

भारताचा आक्रमक खेळसामन्यात भारताने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ दाखवत पहिल्या क्वार्टरमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली होती. दुसऱ्या क्वार्टरमध्येही भारतीय संघाने गोल करण्याचे अनेक प्रयत्न केले. पाकिस्तानच्या गोलपोस्टवर सतत हल्ले केले, मात्र पाकिस्तानच्या बचावफळीने भारताला उत्तम बचाव करत तीनवेळा गोल करण्यापासून रोखले. पाकिस्तानचा गोलरक्षक अली अमजदने दोन अप्रतिम बचाव केले.

हरमनप्रीतने दुसरा गोल केला

स्पर्धेत पाकिस्तानला प्रथमच पेनल्टी कॉर्नर मिळाला, मात्र त्याचे गोलमध्ये रूपांतर करता आले नाही. नीलम संजीवच्या चुकीमुळे पाकिस्तानला ही संधी मिळाली, मात्र सूरज कारकेराने डाव्या पायाने चेंडू रोखून त्यांचा प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही. काही वेळातच भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि हरमनप्रीतने सामन्यातील दुसरा गोल करत टीम इंडियाची आघाडी मजबूत केली. या सामन्यातही पाकिस्तानला दुसरा पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण इथेही गोल करता आला नाही.

एशियाडमध्ये दोन्ही संघ नऊ फायनल खेळले

भारत आणि पाकिस्तान या आधी सात आशियाई क्रीडा स्पर्धेच्या हॉकी फायनलमध्ये आमनेसामने आले होते. आशियाई खेळांमध्ये त्यांनी एकमेकांविरुद्ध एकूण नऊ फायनल खेळले आहेत, ज्यामध्ये पाकिस्तानने सात आणि भारताने दोन सुवर्णपदके जिंकली आहेत. दोन्ही देशांनी 1956 ते 1964 पर्यंत सलग तीन ऑलिम्पिक फायनलमध्ये प्रवेश केला होता. यामध्ये भारताने दोन, तर पाकिस्तानने एकदा विजय मिळवला होता.

गेल्या वेळी हे दोन्ही संघ आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या साखळी टप्प्यात आमनेसामने आले होते आणि तेव्हाही भारताने 3-1 अशा फरकाने विजय मिळवला होता. भारतीय संघाने आतापर्यंत पाकिस्तान, कोरिया आणि बांगलादेशविरुद्धच्या तीन सामन्यांत 14 गोल केले आहेत. भारत सहा गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. पाकिस्तानने जपानसोबत गोलशून्य बरोबरी साधली आणि भारताविरुद्धच्या पराभवानंतर चौथ्या स्थानावर आहे.

टॅग्स :HockeyहॉकीIndiaभारतPakistanपाकिस्तान