शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
3
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
4
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
5
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
6
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
7
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
8
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
9
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
11
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
12
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
13
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
14
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
15
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
16
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
18
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
19
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
20
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)

ऑस्ट्रेलियाचे भारताला १६१ धावांचे आव्हान

By admin | Published: March 27, 2016 6:54 PM

टी- २० वर्ल्डकपमधील सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला धावांचे १६१ आव्हान दिले आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने २० षटकात सहा बाद १६० धावा केल्या.

ऑनलाइन लोकमत 
मोहाली, दि. २७ -  टी- २० वर्ल्डकपमधील सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला धावांचे १६१ आव्हान दिले आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने २० षटकात सहा बाद १६० धावा केल्या. 
फलंदाज आरोन फिंचने या सामन्यात सर्वाधिक जास्त धावा केल्या. त्याने ३४ चेंडूत तीन चौकार आणि दोन षटकार लगावत ४३ धावा कुटल्या. तर, उस्मान ख्वाजा आणि एरॉन फिंचने पहिल्या विकेटसाठी ५४ धावांची सलामी दिली. ख्वाजाला २६ धावांवर नेहराने यष्ठीपाठी धोनीकरवी झेलबाद केले. त्यानंतर संघाच्या ७२ धावा असताना अश्विनच्या गोलंदाजीवर  धोकादायक डेव्हिड वॉर्नर पाच धावांवर यष्टीचीत झाला. ग्लेन मॅक्सवेल ३१ धावांवर बाद झाला.  त्यानंतर गोलंदाज हार्दीक पांड्याने दिला ऑस्ट्रेलियाला सहावा धक्का देत जेम्स फॉल्कनर १0 धावांवर बाद केले. 
युवराजने पहिल्याच षटकात कर्णधार स्मिथला अवघ्या दोन धावांवर यष्टीपाठी धोनीकरवी झेलबाद करुन ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का दिला. त्यानंतर सलामीवीर एरॉन फिंचला ४३ धावांवर  हार्दिक पंडयाने शिखर धवनकरवी झेलबाद केले. मॅक्सवेल १३ धावांवर नाबाद असून, त्याची साथ द्यायला धोकादायक शेन वॉटसन मैदानात आला आहे. 
आयसीसी टी-२० वर्ल्डकपची उपांत्यफेरी गाठण्यासाठी भारतीय संघासाठी 'करो या मरो' असलेला ऑस्ट्रेलिया विरुद्धचा सामना सुरु झाला आहे. नाणेफेकीचा कौल जिंकून ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथने फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. पंजाबमधील मोहालीच्या मैदानावर हा सामना होत आहे. 
विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेल्या भारताला पाकिस्तान विरुद्धचा सामना वगळता एकाही सामन्यात लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. शेवटच्या बांगलादेश विरुद्धच्या सामन्यातही भारतीय संघाने रडतखडत विजय मिळवला होता. हा सामना गमावला असता तर, भारतावर आजच्या सामन्यात सरस धावगती राखून विजय मिळवण्याचे दडपण वाढले असते.
नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी-२० मालिकेत भारताने तीन सामने जिंकून क्लीनस्वीप विजय मिळवला होता. मात्र आजच्या सामन्यात भारतीय खेळाडूंना लौकीकाला साजेशी कामगिरी केली तरच, भारतासाठी उपांत्यफेरीचे दरवाजे उघडू शकतात. भारतासाठी दिलाशाची बाब म्हणजे आतापर्यंत ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी-२० च्या बारा सामन्यात भारताने आठ विजय मिळवले आहेत.