शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

फलंदाजी हीच निर्णायक बाब ठरेल!

By admin | Published: March 19, 2016 1:58 AM

कोलकाता महालढतीसाठी सज्ज झाले आहे. पारंपरिक संघातील या लढतीसाठी ईडन गार्डन येथे खेळाडूंचे स्वागत असून, क्रिकेटविश्वातील दिग्गजांचे डोळे शनिवारच्या लढतीकडे लागलेले

- सौरव गांगुली लिहितो़...कोलकाता महालढतीसाठी सज्ज झाले आहे. पारंपरिक संघातील या लढतीसाठी ईडन गार्डन येथे खेळाडूंचे स्वागत असून, क्रिकेटविश्वातील दिग्गजांचे डोळे शनिवारच्या लढतीकडे लागलेले असतील. क्रिकेटच्या प्रत्येक हालचालींचा मिनिटा मिनिटाला मिळणारा आनंद फार मोठा असतो. क्रिकेटपटू या नात्याने मी भारत-पाक लढतीचा प्रत्यक्ष साक्षीदार राहिलो. आता आयोजक या नात्याने नवी जबाबदारी आव्हानात्मक आहे.पहिला सामना भारताने गमविल्यामुळे चाहते फारच दडपणात आहेत; पण एक सांगू का, दडपणातून मार्ग काढणारा आणि मुसंडी मारणारा जर कुठला संघ असेल तर तो भारतच आहे. ११ पैकी १० सामने भारताने सलग जिंकले हे विसरू शकत नाही.ईडनची खेळपट्टी फलंदाजीला अनुकूल आहे. अनेक भारतीय खेळाडू या खेळपट्टीवर मोठी खेळी करू शकतील, अशी अपेक्षा करता येईल. या खेळपट्टीवर चेंडू उसळी घेत असल्याने ती वेगवान माऱ्यालादेखील मदत करेल पण फिरकी गोलंदाजांनी चेंडूचा टप्पा अचूक ठेवल्यास फलंदाजांना ते त्रस्त करू शकतील. मैदानाचे आऊटफिल्डही वेगवान आहे. क्षेत्ररक्षकांच्या हातून चेंडू निसटल्यास तो थेट सीमारेषेवरच जाऊन विसावतो. खेळपट्टीचे स्वरूप संपूर्ण ४० षटके एकसारखे राहणार असल्याने नाणेफेक कुणीही जिंको फारसा फरक पडणार नाही.ईडनवर पाकने बांगलादेशला नमविल्याने त्यांचे पारडे या सामन्यात किंचित जड आहे. पण, याचा अर्थ असा नव्हे की भारताविरुद्ध त्यांची बाजू भक्कम ठरावी. शनिवारचा दिवस नवा असेल आणि एका बलाढ्य फलंदाजी असलेल्या संघाविरुद्ध ते खेळणार आहेत. पाकची गोलंदाजी धारदार आहे, पण फलंदाजी मात्र चिंतेचा विषय राहीलच. या सामन्यात फलंदाजी हीच दोन्ही संघांसाठी निर्णायक बाब ठरेल, असे माझे मत आहे.दोन्ही संघ आजच्या लढतीसाठी फारसे बदल करतील असे वाटत नाही. भारत न्यूझीलंडविरुद्ध खेळलेला संघ कायम ठेवेल. बांगलादेशवर विजय मिळविणाऱ्या पाक संघात चांगला समन्वय होता. यात अधिक बदलाची आणि प्रयोगाची गरज असेल असे वाटत नाही. भारत-पाक सामना हा धर्मयुद्धासारखा असतो. सामन्यादरम्यान अनेकांचा श्वास रोखला जावा, अशा घटना घडतात. चाहत्यांच्या प्रतिसादामुळे खेळाडूंमध्येही उत्साहाचा संचार होतो. या लढतीत राष्ट्रीयत्व हा देखील प्रतिष्ठेचा मुद्दा बनतो. कुणाविरुद्धही हरलात तरी चालेल, पण पाककडून पराभव नको अशी चाहत्यांची भावना असते. ईडनवर सामना असेल तर ६६ हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीचे दडपणही यजमान संघावर असेलच. ईडनवरील पाकच्या विजयाची फारच चर्चा रंगली आहे. येथे पाक संघ भारताविरुद्ध एकाही सामन्यात हरलेला नाही; पण येथे हेदेखील ध्यानात घ्यायला हवे की भारताने विश्वचषकात पाकविरुद्ध एकही सामना गमविलेला नाही. (गेमप्लान)