शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
3
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
4
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
5
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
6
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
7
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
8
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
9
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
10
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
11
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
12
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
13
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
14
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
15
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
16
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
17
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
18
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
19
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
20
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी

मुंबई-कोलकाता यांच्यात आज वर्चस्वाची लढाई

By admin | Published: May 13, 2017 2:02 AM

कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स या दिग्गज संघात आज शनिवारी आयपीएल-१० मध्ये होणाऱ्या लढतीद्वारे पहिल्या दोन स्थानांसाठी

कोलकाता : कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स या दिग्गज संघात आज शनिवारी आयपीएल-१० मध्ये होणाऱ्या लढतीद्वारे पहिल्या दोन स्थानांसाठी फैसला होईल. शानदार सुरुवातीनंतर दोन्ही संघ विजयी पथावरून भटकले आहेत. मुंबईला सलग दोन सामन्यात पराभवाचे तोंड पहावे लागले, तर केकेआर संघ तीन सामन्यात पराभूत झाला.प्ले आॅफ गाठणारा पहिला संघ मुंबईवर या सामन्यातील निकालाचा फारसा फरक पडणार नाही, पण केकेआर हा सामना जिंकून १८ गुणांसह दुसऱ्या स्थानावर विराजमान होण्यासाठी धडपडत आहे. सध्या मुंबईचे १८ तर केकेआरचे १६ गुण आहेत. पहिल्या दोन स्थानांवर राहणाऱ्या संघांना फायनलसाठी दोन संधी मिळतील. आयपीएलच्या पहिल्या टप्प्यातील निकालांवर नजर टाकल्यास मुंबईने केकेआरला आतापर्यंत सलग चार वेळा नमविले. दोन्ही संघाचा जयपराजयाचा रेकॉर्ड ४-१४ असा आहे. ज्या संघांनी अद्याप बाद फेरी गाठलेली नाही त्यात सर्वात प्रभावी धाव सरासरी (प्लस ०.७२९) केकेआरची आहे. पण अखेरपर्यंत न ताणता लवकर पात्रता गाठण्याची केकेआरला घाई झाली आहे. केकेआरला विजय मिळवायचा झाल्यास आघाडीच्या फलंदाजांवर विसंबून राहण्याची वृत्ती सोडावी लागेल. केकेआरची गोलंदाजी भक्कम असल्याने ही लढत मुंबईचे फलंदाज विरुद्ध केकेआरचे गोलंदाज अशी असेल. मुंबईचा कॅरेबियन स्टार लेंडल सिमन्स आणि किरोन पोलार्ड शानदार फॉर्ममध्ये आहेत. मागच्यावेळी मुंबईने केकेआरला दोन्ही सामन्यात पराभूत केले होते. दोन्ही सामन्यात कर्णधार रोहित शर्मा सामन्याचा मानकरी ठरला. रोहितपुढे उद्या स्थिरावून खेळण्याचे आव्हान असेल. पंजाबविरुध्दचा पराभव मागे टाकून मुंबई उद्या मैदानात उतरेल. (वृत्तसंस्था)आम्हाला घाबरण्याचीगरज नाही : पोलार्डप्ले आॅफमध्ये स्थान निश्चितीनंतर आयपीएल गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या मुंबई इंडियन्सला सलग दोन पराभवांना सामोरे जावे लागले तरी घाबरण्याची गरज नाही, असे या संघाचा फलंदाज विंडीजचा किरोन पोलार्ड याने म्हटले आहे. मुंबई संघ पंजाबकडून सात धावांनी पराभूत झाल्यानंतर पोलार्ड म्हणाला, ‘या पराभवामुळे आम्ही देखील माणसे आहोत आणि प्रत्येक सामना जिंकू शकत नाही, हे सिद्ध झाले. कामगिरीत सुधारणेची आम्हाला देखील गरज आहे. हैदराबादविरुद्ध खराब कामगिरी केली पण येथील चांगल्या विकेटवर आम्ही पंजाबविरुद्ध चांगला खेळ केला. चांगल्या संघांविरुद्धची लढत प्रत्येकवेळी जिंकू असे नाही. आमचे मनोबल कायम असल्याने प्ले आॅफमध्ये भीती बाळगण्याचे कारणनाही. पात्रता फेरी हे पहिले लक्ष्य असते. ते आम्ही गाठले. ज्या चुका झाल्या त्या सुधारून पुढील सामन्यात विजयमिळवू.’