शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

बीसीसीआय संकटात : अनुराग ठाकूर

By admin | Published: December 24, 2016 1:17 AM

‘बीसीसीआय’वरील लोढा पॅनलच्या शिफारशींचे संकट क्रिकेटपटूंना हितावह नसल्याची कबुली देत बोर्डाचे अध्यक्ष अनुराग ठाकूर

नवी दिल्ली : ‘बीसीसीआय’वरील लोढा पॅनलच्या शिफारशींचे संकट क्रिकेटपटूंना हितावह नसल्याची कबुली देत बोर्डाचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा करण्यावाचून पर्याय नसल्याचे म्हटले आहे. ३ जानेवारीला कोर्टाचा निर्णय येणार आहे. ठाकूर हे प्रो-कुस्ती लीगसाठी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरात ते म्हणाले, ‘सद्य:स्थिती क्रिकेटपटूंना हितावह नाही, याची मला जाणीव आहे. बीसीसीआय संकटात असून, ३ जानेवारीपर्यंत प्रतीक्षा करण्याशिवाय पर्याय नाही. सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या माजी सरन्यायाधीश आर. एन. लोढा यांच्या पॅनलच्या शिफारशींचा उल्लेख करीत त्यांनी वरील वक्तव्य केले. बोर्डाने लोढा समितीच्या काही शिफारशी मान्य नसल्याची भूमिका घेतल्याने अंतिम निर्णयाकडे त्यांचे लक्ष लागले आहे. काही माजी पदाधिकाऱ्यांनी बोर्डावर टीका केल्याप्रकरणी लक्ष वेधताच ठाकूर म्हणाले, ‘बीसीसीआयने सरकारकडून एकही छदाम न घेता स्वत:ची पायाभूत सुविधा उभारली. तरीसुद्धा काहीजण आमच्यावर तोंडसुख घेतात.’बीसीसीआय एक लाख पंचायतींपर्यंत एक लाख कोचेस का पाठवित नाही, या प्रश्नाच्या उत्तरात ठाकूर हसून म्हणाले, ‘आमच्याकडे खूप पैसा आहे; पण आम्ही तो खर्च करू शकत नाही. यासाठी परवानगीची गरज आहे.’ सर्वोच्च न्यायालयाने बोर्डावर निधी देण्यास निर्बंध घातले आहेत.आयसीसी कार्यकारी ग्रुपमध्ये भारताचा समावेश न केल्याबद्दल ठाकूर यांनी ‘आयसीसी’चीदेखील खिल्ली उडविली. ते म्हणाले, ‘मी बैठकीत होतो. विश्व क्रिकेट बलाढ्य करायचे झाल्यास बीसीसीआयची गरज असल्याचे प्रत्येक सदस्याचे मत होते. बीसीसीआयविना हे काम होऊ शकेल, असे कुणाला वाटत असेल, तर बीसीसीआयविना विश्व क्रिकेट प्रगती करू शकत नाही, हे त्यांनी ध्यानात घ्यावे. (वृत्तसंस्था)