शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
2
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
3
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान
4
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
5
"ठोकलं अक्षय शिंदेला आणि एन्काऊंटर विरोधकांचा"; आशिष शेलारांचा सणसणीत टोला
6
“शरद पवारांनी सुपारी दिली अन् संजय राऊतांनी ठाकरे गटाचा एन्काउंटर केला”; शिंदे गटाची टीका
7
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य
8
अक्षय शिंदेचा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर की ‘कुछ गडबड है’? CID तपास करणार
9
लैंगिक छळाच्या घटनांवर SC नाराज; केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश
10
वांद्रे पश्चिम मतदारसंघातून विधानसभेसाठी प्रिया दत्त? आशिष शेलारांविरोधात काँग्रेसची नवी खेळी
11
Irani Cup 2024 : दोन मराठमोळे कर्णधार! १ तारखेपासून थरार; मुंबईला ऋतुराजचा संघ भिडणार
12
"आधी म्हणत होते अक्षय शिंदेला फाशी द्या, आता...", अजित पवार 'मविआ'वर बरसले
13
Amazon Great Indian Festival Sale मध्ये 15 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतील 'हे' स्मार्टफोन
14
Exclusive: 'निक्कीला छत्रपती संभाजीनगरला घेऊन जाणार'; अरबाज म्हणतो, 'दोघांचंही बालपण...'
15
बदलापूरसारखीच घटना; मुख्याध्यापकाने सहा वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; अत्याचाराला विरोध केला म्हणून...
16
वेड्या बहिणीची वेडी ही माया! भाऊ अर्जुन तेंडुलकरच्या वाढदिवशी बहीण सारा भावुक, म्हणाली...
17
आपच्या पाठिंब्याशिवाय हरियाणात सरकार स्थापन होऊ शकणार नाही, अरविंद केजरीवाल यांचा दावा 
18
'आयफा'मुळे राजस्थानमधील पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक वाढेल - उपमुख्यमंत्री दिया कुमारी
19
भीषण अपघात! मध्य प्रदेशमध्ये ट्रकखाली आली ऑटो; ७ जणांचा मृत्यू, ४ जखमी
20
दुधाच्या अनुदान वाढीवरून अजित पवार आणि विखे पाटलांमध्ये खडाजंगी; बैठकीत नेमकं काय घडलं?

ऐतिहासिक ५००व्या कसोटी सामन्यासाठी बीसीसीआयचे अझरूद्दीनला निमंत्रण

By admin | Published: September 17, 2016 5:27 AM

भारताचा माजी कर्णधार मोहंमद अझरूद्दीनला कानपूर येथे होणाऱ्या ऐतिहासिक ५००व्या कसोटी सामन्यासाठी निमंत्रित केले आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. १७ : भारताचा माजी कर्णधार मोहंमद अझरूद्दीनला कानपूर येथे होणाऱ्या ऐतिहासिक ५००व्या कसोटी सामन्यासाठी निमंत्रित केले आहे. या आमंत्रणाचा अझरूद्दीनने स्वीकार केला. या संदर्भात बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी राजीव शुक्ला यांनी वृत्तसंस्थेला सांगितले, की अझरूद्दीन माजी कर्णधार आहे. त्याच्याव्यतिरीक्त माजी कर्णधारांपैकी के. श्रीकांत, दिलीप वेंगसरकर, सचिन तेंडुलकर यांनीसुद्धा निमंत्रण स्वीकारले आहे आणि ते कानपूर कसोटीच्या वेळी उपस्थित राहणार आहेत.कानपूरमध्ये २२ सप्टेंबरला न्यूझीलंडविरोधातील पहिला कसोटी सामना हा भारतीय संघाचा ५०० वा कसोटी सामना असणार आहे. या सामन्याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही खास तयारी केली आहे. भारताच्या सर्व माजी कर्णधारांना बीसीसीआयने आमंत्रण दिले आहे. टॉससाठी देखील चांदीचं नाणं तयार केलं जात असून त्यावर ५०० वी कसोटी असं लिहिलेलं असणार आहे.हा दिवस खास बनवण्यासाठी बीसीसीआयने अनेक कार्यक्रम आयोजीत केले आहेत अशी माहिती बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी आणि उत्तरप्रदेश क्रिकेट संघाचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी दिली. या सामन्यावेळी सर्व माजी कर्णधारांचा सन्मान कऱण्यत येणार आहे. नारी कांट्रेक्टर, चंदू बोर्डे, दिलीप वेंगसरकर, कपिल देव, रवि शास्त्री, सुनील गावसकर, सौरव गांगुली, सचिन तेंडूलकर, वीरेंद्र सहवाग, के श्रीकांत, अनिल कुंबळे, राहुल द्रविड हे सर्व माजी क्रिकेटपटू यावेळी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.