शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

भारत पेट्रोलियमची जेतेपदाची हॅटट्रिक; ठाणे महापालिकेला नमवत मारली बाजी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2024 15:07 IST

अनिकेत मानेच्या सुसाट आणि भन्नाट चढायानंतरही ठाणे महानगरपालिका भारत पेट्रोलियमला धक्का देण्यात अपयशी ठरली.

मुंबई: अनिकेत मानेच्या सुसाट आणि भन्नाट चढायानंतरही ठाणे महानगरपालिका भारत पेट्रोलियमला धक्का देण्यात अपयशी ठरली आणि भारत पेट्रोलियमने ठाणे पालिकेचा थरारक संघर्ष ३०-२५ असा मोडत स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या राजाभाऊ देसाई स्मृतीचषकावर सलग तिसर्‍यांदा आपले नाव कोरले. गतवर्षीही त्यांनी आयएसपीएलवर निसटता विजय मिळवत जेतेपद राखले होते तर यंदा टीएमसीला हरवत हॅटट्रिक साजरी केली.

प्रभादेवीच्या चवन्नी गल्लीच्या कबड्डीभूमीत उभारलेल्या सीताराम चव्हाण क्रीडानगरीत कबड्डीप्रेमींना अंगावर शहारे आणणारा संघर्ष अनुभवता आला. उपांत्य फेरीच्या लढतीत भारत पेट्रोलियम आणि ठाणे महानगर पालिकेने प्रतिस्पर्धी संघांना संघर्ष करण्याची संधीच दिली नाही. पण एकतर्फी उपांत्य लढतींनी कंटाळलेल्या कबड्डीप्रेमींनी अंतिम सामन्यात रोमांचक मेजवानीचा मनसोक्त आस्वाद घेतला. 

शेवटच्या चढाईवर उपांत्य फेरी गाठणार्‍या भारत पेट्रोलियम आणि ठाणे महानगर पालिकेनेच अंतिम फेरी गाठली आणि सामन्याचा थरार शेवटच्या मिनीटापर्यंत कायम ठेवला. भारत पेट्रोलियमने आकाश पिकलमुंडेच्या चढाई-पकडीच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर पहिल्या सत्रात १५-१० अशी आघाडी घेतली असली तरी ठाणे महानगर पालिकेच्या अनिकेत मानेने अफलातून चढाया करत  शेवटपर्यंत सामन्यात विजयाचा सस्पेन्स कायम राखला.

भारत पेट्रोलियममध्ये प्रो कबड्डीचे अनेक स्टार असले तरी आकाश पिकलमुंडे आणि शुभम शेळकेच्या खेळापुढे त्यांचे अस्तित्व जाणवलेच नाही. शेवटची ८ मिनीटे असताना अनिकेत मानेच्या झंझावाती खेळाने सामन्यात अनोखी रंगत आणली. ते १६-२१ असे पिछाडीवर होते तेव्हाच अनिकेतच्या करंट मारणार्‍या चढाईने भारत पेट्रोलियमचे तीन खेळाडू बाद केले. त्यामुळे स्कोर १९-२१ असा झाला. मात्र यानंतर पिकलमुंडेच्या चढाईं आणि पकडींनी संघाला २८-१९ अशी आघाडी मिळवून दिली. ठाणे पालिकेवर लोण चढल्यामुळे ते काहीसे मागे पडले. पण  शेवटची ३ मिनीटे असताना सामन्याने वेगळेच रंग दाखवले. 

अनिकेतने आणखी एक भन्नाट चढाई करत बीपीसीएलच्या दोघांना टिपले. त्यातच शुभम शेळकेची पकड करून ठाणे पालिकेने बीपीसीएलच्या पोटात गोळा आणला. सामन्यात ठाणे पालिका २२-२८ अशी मागे होती. त्याच क्षणाला अनिकेत मानेच्या आणखी एका चढाईने पुन्हा एकदा बीपीसीएलच्या ३ खेळाडूंना बाद करत सामना २५-२८ वर नेला. बीपीसीएलवर लोणचे संकट ओढावले होते. सामना संपायला फक्त ९० सेकंद बाकी होते. तेव्हा अनिकेतची ही चढाई निर्णायक ठरली. पिकलमुंडे आणि निलेश शिंदेने दोघांत अनिकेतची मगरमिठीसारखी जबरदस्त पकड करत आपले लोणचे संकट टाळले आणि आपला पराभवही टाळला. अनिकेतला या चढाईत यश मिळाले असते तर स्कोर २९-२८ असा ठाणे पालिकेच्या बाजूने असता. पण बीपीसीएलने जेतेपद ३०-२५ असे खिशात घालत राजाभाऊ देसाई स्मृती चषक जिंकण्याची हॅटट्रिक केली. बीपीसीएलचा पिकलमुंडे सर्वोत्तम चढाईपटू तर शुभम शेळके सर्वोत्तम खेळाडू ठरला. टीएमसीचा सिद्धेश तटकरे सर्वोत्तम पकडवीर ठरला.

तत्पूर्वी उपांत्य सामन्यात भारत पेट्रोलियमने शुभम शेळके आणि आकाश पिकलमुंडेच्या जोरदार चढायांमुळे बँक ऑफ बडोदाचा ३२-२१ असा सहज पराभव केला.अभिमन्यू गावडे आणि साहिल राणे यांनी मध्यंतराला बडोदा बँकेला १३-११ अशी आघाडी मिळवून दिली होती, पण उत्तरार्धात त्यांचा खेळ फुसका झाला. दुसर्‍या सामन्यात ठाणे पालिकेने अनिकेत माने आणि मनोज बोंद्रेच्या खेळामुळे न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्सचा ३६-२४ असा सहज पराभव केला होता.

टॅग्स :MumbaiमुंबईKabaddiकबड्डी