शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
2
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
3
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
5
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
6
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
7
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
8
पोलिस करतात विनातिकीट प्रवास, धमक्या देतात; रेल्वे टीसींची नाराजी
9
देवाच्या प्रसादात राजकारण कशाला कालवता?
10
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार
11
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
12
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
13
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
14
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
15
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
16
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
17
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
18
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
19
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला

शमीकडून मोठी अपेक्षा : रोहित शर्मा

By admin | Published: March 11, 2016 11:35 PM

गुडघ्याच्या दुखापतीतून सावरून कुठल्याही गोलंदाजासाठी पुनरागमन करणे कठीण असते. मोहम्मद शमी मात्र वेगवान माऱ्यातील लय मिळविण्यासाठी कठोर सराव करीत आहे

कोलकाता : गुडघ्याच्या दुखापतीतून सावरून कुठल्याही गोलंदाजासाठी पुनरागमन करणे कठीण असते. मोहम्मद शमी मात्र वेगवान माऱ्यातील लय मिळविण्यासाठी कठोर सराव करीत आहे. भारतीय संघाला टी-२० विश्वचषकात त्याच्याकडून मोठी कामगिरी अपेक्षित असल्याचे मत सलामीवीर रोहित शर्मा याने व्यक्त केले आहे. आॅस्ट्रेलिया आणि श्रीलंकेविरुद्ध शमीचे नाव संघात होते पण जखमेमुळे त्याला संघाबाहेर पडावे लागले.शमीने जखमेतून सावरल्यानंतर विंडीजविरुद्ध काल ३० धावा देत दोन गडी बाद केले होते. रोहित म्हणाला, गुडघ्याच्या दुखापतीतून सावरून कुण्याही गोलंदाजासाठी वेगवान मारा करणे कठीण असते. शमी याला अपवाद ठरला. त्याने विंडीजविरुद्ध टिच्चून मारा करीत दोन गडी बाद केले. त्याने या दरम्यान बाऊन्सर, यॉर्कर तसेच मंद चेंडू टाकले. आम्हाला त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. नेटमध्ये घाम गाळल्याने शमी हे करू शकला.’फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागात वर्चस्व राखल्यामुळेच भारतीय संघ बलाढ्य बनल्याचे सांगून रोहित म्हणाला, ‘तिन्ही विभागार सरस कामगिरीमुळेच आम्ही लागोपाठ ११ सामने जिंकण्यात यशस्वी होऊ शकलो. माझ्या सहकाऱ्यांनी बरोबरीचे योगदान दिल्यामुळेच हे साध्य होऊ शकले.’ (वृत्तसंस्था)