शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

‘बिनधास्त खेळ’ ही टी-२० ची गरज

By admin | Published: May 13, 2017 2:04 AM

आयपीएल-१० मधील साखळी सामन्यांचा शेवट होत असताना सामने अत्यंत चुरशीचे ठरताना दिसतात. प्ले आॅफमध्ये पहिल्या दोन स्थानांवर

सुनील गावस्कर लिहितात...आयपीएल-१० मधील साखळी सामन्यांचा शेवट होत असताना सामने अत्यंत चुरशीचे ठरताना दिसतात. प्ले आॅफमध्ये पहिल्या दोन स्थानांवर पोहोचण्यासाठी तसेच पात्रता गाठण्याची संघांची धडपड हृदयाचे ठोके चुकविणाऱ्या रोमहर्षक निकालांतून दिसून येत आहे. दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि गुजरात लायन्स यांच्या प्ले आॅफच्या आशा आधीच मावळल्या. तरीही त्यांच्यातील चढाओढ एक चेंडू शिल्लक असेपर्यंत गाजली. दुसऱ्या दिवशी मुंबई इंडियन्सने देखील किंग्स इलेव्हन पंजाबच्या धावडोंगरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. गेल्या काही सामन्यात किंग्स इलेव्हन संघ भीती घालवून खेळत असल्याने या संघाकडे आजच्या स्थितीत पात्रता गाठण्याची संधी कायम आहे. दिल्लीबाबत असेच घडले. दिल्लीने आधीचे सामने गमविल्याचा फटका त्यांना बसलाच आहे. पण राहिलेल्या सामन्यात खेळताना ‘गमविण्यासारखे काहीच नाही’ या निर्धाराने संघ बिनधास्त खेळ करीत आहे. टी-२० प्रकारात याच निर्धाराची गरज असते.गत चॅम्पियन सनरायजर्सने स्वत:ला सावरले. गुजरात लायन्सविरुद्ध विजय मिळविल्यास प्ले आॅफसाठी पात्रता गाठता येईल, याची संघाला जाणीव आहे. कानपूरच्या ग्रीनपार्कची खेळपट्टी जलद स्वरुपाची आहे. येथे चेंडू झटपट बॅटवर येतो. त्यातच आऊटफिल्ड जलद असल्याने मारलेल्या फटक्यांवर चार धावा मिळण्यास मदत होते. हैदराबाद संघ वॉर्नर आणि धवन यांच्याकडून पुन्हा एकदा झकास सुरुवात मिळावी, अशी आशा बाळगत असावा. पण काढलेल्या धावांचा बचाव करण्यासाठी गोलंदाजीतही काळजी घ्यावी लागेल. उपलब्ध पर्यायांचा शिताफीने वापर करण्याची गरज आहे. मोझेस हेन्रिक्स फलंदाजीत तर यशस्वी ठरला पण त्याचा मारा तितकासा प्रभावी दिसत नाही. तो गोलंदाजी करताना प्रतिस्पर्धी फलंदाज चांगली फटकेबाजी करताना दिसतात.कोलकाता येथे केकेआर आणि मुंबई हे विजयाच्या जिद्दीने खेळताना दिसतील. या लढतीत सुनील नारायणवर मुंबई संघ फलंदाजी-गोलंदाजीत कसा आवर घालतो हे निर्णायक ठरणार आहे. ख्रिस लीनसोबत गौतम गंभीर सलामीला येऊ शकतो. उथप्पा, पांडे आणि युसूफ यांना देखील आपापली जबाबदारी ओळखून योगदान द्यावे लागेल. मुंबईने हातातोंडाशी आलेले काही विजय घालविले. त्यामुळेच अखेरची लढत जिंकण्याला महत्त्व असेल. विजयामुळे आत्मविश्वास परत येईलच, शिवाय गुणतालिकेत नंबर वनसह अव्वल स्थानावर देखील कायम राहता येईल. (पीएमजी)