शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
2
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
3
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
4
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
5
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
6
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
7
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
8
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
9
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
10
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
11
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
12
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
14
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
15
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
16
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
17
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
18
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
20
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले

गोलंदाजांची भेदक कामगिरी;भारताचा 93 धावांनी विजय, मालिकेत विजयी आघाडी

By admin | Published: July 01, 2017 7:05 AM

गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजचा 93 धावांनी पराभव केला आहे. खडतर परिस्थितीत महेंद्रसिंग धोनीने केलेल्या 78 धावा आणि डावाच्या

ऑनलाइन लोकमत

अॅंटिग्वा, दि. 1 - गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजचा 93 धावांनी पराभव केला आहे. खडतर परिस्थितीत महेंद्रसिंग धोनीने केलेल्या 78 धावा आणि डावाच्या अखेरीस केदार जाधवने (26 चेंडूत 40 धावा) केलेल्या फटकेबाजीच्या बळावर  भारताने वेस्ट इंडिजला 252 धावांचं आव्हान दिलं होतं. भारताने दिलेल्या 252 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ 38.1 षटकांत केवळ 158 धावांमध्येच गारद झाला. भारताकडून फिरकी गोलंदाज आर.अश्विन आणि कुलदिप यादव यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. वेस्ट इंडिजकडून जेसन मोहम्मद याने सर्वाधिक 40 तर रोमॅन पॉवेल याने 30 धावांची खेळी करून थोडीफार लढत देण्याचा प्रयत्न केला पण इतर फलंदाजांनी पुन्हा एकदा निराशा केली. या विजयासोबतच भारताने 5 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अशी विजयी आघाडी घेतली आहे. महेंद्रसिंग धोनीला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला.  दोन्ही संघांमधील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता.  

खराब सुरुवात झाल्यानंतर जबरदस्त सूर गवसलेला सलामीवीर अजिंक्य रहाणे आणि युवराज सिंग यांनी नाबाद अर्धशतकी भागीदारी करताना वेस्ट इंडीजविरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यात भारताचा डाव सावरला.  अजिंक्य रहाणेने 72 धावांची चिवट खेळी केली. त्याला युवराज सिंगने 55 चेंडूत 4 चौकारांसह 39 धावा करून चांगली साथ दिली.  

रात्री पडलेल्या पावसामुळे तिसरा एकदिवसीय सामना ४५ मिनिटांनी उशिरा सुरू झाला. त्यानंतर नाणेफेक जिंकणाऱ्या वेस्ट इंडीजने भारताला प्रथम फलंदाजीस आमंत्रित केले. पहिल्या दोन सामन्यांत अजिंक्य रहाणे आणि शिखर धवन यांनी शतकी सलामी दिली होती; परंतु आज मात्र, भारतीय संघ चांगली सुरुवात करू शकला नाही.

सामन्याच्या तिसऱ्याच षटकात कमिन्सने शिखर धवनला (२) बाद केले. कमिन्सच्या आखूड टप्प्याच्या चेंडूवर थर्डमॅनला हवेत मारलेला शिखर धवनचा फटका चेसने सहजरीत्या टिपला. विशेष म्हणजे जबरदस्त फार्मात असणारा धवन तब्बल ९ व्या डावानंतर एकेरी धावांत बाद झाला. धवन तंबूत परतला तेव्हा भारतीय संघाच्या धावफलकावर अवघ्या ११ धावा होत्या. त्यानंतर वेस्ट इंडीज गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना भारतीय फलंदाजांना जखडून ठेवले. त्यातच चांगला सूर गवसलेल्या विराट कोहलीला कर्णधार जेसन होल्डरने बाद करीत भारताला दुसरा धक्का दिला. होल्डरचा उजव्या यष्टीवर उसळत्या चेंडूवर कोहलीचा गलीमध्ये उडालेला झेल केल होप याने डावीकडून सूर मारून टिपला. सुरुवातीलाच दोन धक्के बसल्यानंतर अजिंक्य रहाणे आणि युवराज सिंगने भारतीय संघाच्या डावाला आकार दिला. युवराज- रहाणे जोडी बाद झाल्यानंतर धोनीने सामन्याची सुत्रं आपल्या हाती घेतली. केदार जाधवसोबत शानदार भागीदारी रचत त्याने भारताला 250 धावांचा टप्पा ओलांडून दिला. 

या मालिकेत पहिला सामना ३९ षटकांचा खेळ झाल्यानंतर पावसामुळे रद्द करावा लागला होता, तर पोर्ट आॅफ स्पेनचा दुसरा सामना भारताने १०५ धावांनी जिंकला होता.