शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

Champions Trophy : या पाच कारणांसाठी बांगलादेशचा संघ भारतासाठी धोकादायक

By admin | Published: June 15, 2017 11:04 AM

यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत अनेक धक्कादायक निकालांची नोंद झाली आहे. बांगलादेशच्या तुलनेत भारताचा संघ सर्वच आघाडयांवर सरस असला तरी...

 ऑनलाइन लोकमत 

बर्मिंगहॅम, दि. 15 - यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत अनेक धक्कादायक निकालांची नोंद झाली आहे. बांगलादेशच्या तुलनेत भारताचा संघ सर्वच आघाडयांवर सरस असला तरी, आपल्याला काही गोष्टींसाठी बांगलादेशपासून संभाळून राहण्याची गरज आहे. 
 
1) श्रीलंकेचा भारतावर विजय, बांगलादेशची न्यूझीलंडवर मात तसेच पाकिस्तानचा इंग्लंडवर विजय या निकालांनी क्रिकेट पंडितांचे अंदाज चुकवले. त्यामुळे आज बांगलादेश विरुद्ध होणा-या सामन्यात भारताचे पारडे जड असेल तरी भारतच जिंकेल असे छातीठोकपणे म्हणता येणार नाही. 
 
2)  2007 वर्ल्डकपमध्ये बांगलादेशने भारताला पराभूत करुन संपूर्ण क्रिकेट जगताला धक्का दिला. त्यामुळे वर्ल्डकपमधील भारताची वाटचाल साखळीतच संपली. 2015 च्या वर्ल्डकपमध्ये बांगलादेश विरुद्धच्या उपांत्यपूर्वफेरीच्या सामन्यातही रोहित शर्माला बाद न देण्याचा निर्णयही बराच वादग्रस्त ठरला होता. त्यावेळी रोहित बाद झाला असता तर, भारताचा डाव अडचणीत सापडला असता. 2015 मध्ये भारत-बांगलादेशमध्ये झालेल्या एकदिवसीय मालिकेत बांगलादेशने 2-1 ने विजय मिळवला होता. 2016 च्या टी-20 वर्ल्डकपमध्येही भारताने बांगलादेशवर अवघ्या 1 रन्सने विजय मिळवला होता. 
 
आणखी वाचा 
 
3)  चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रोहित शर्मा आणि शिखर धवन या दोन्ही सलामीवीरांनी भारताला चांगली सुरुवात करुन दिली असली तरी, त्यांना पहिल्या पावरप्लेचा फायदा उचलता आलेला नाही. पहिल्या दहा षटकात भारताने पाकिस्तान विरुद्ध 46, श्रीलंके विरुद्ध 48 आणि दक्षिण आफ्रिके विरुद्ध 35 धावा केल्या. 
 
4) कॅचेस विन मॅचेस म्हटले जाते. उपांत्यफेरीच्या महत्वाच्या सामन्यात झेल सोडणे भारताला परवडणारे नाही. पाकिस्तान विरुद्ध केदार जाधवने, हार्दिक पांडयाने कुशल मेंडिस, हाशिम आमला यांचे झेल सोडले होते. भारताला क्षेत्ररक्षणातही आणखी सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. 
 
5) आर. अश्विनचा संघात समावेश झाला असला तरी, एक वेगवान गोलंदाज कमी झाला आहे. अश्विनच्या समावेशाने फलंदाजीत फायदा होणार असला तरी, हाणामारीच्या षटकात फटका बसू शकतो. कमी धावसंख्येचा आपण बचाव करु शकतो ? या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. कारण चॅम्पियन्स ट्रॉफीत भारतावर अजून अशी वेळ आलेली नाही.