शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
3
संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
4
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
5
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
6
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
7
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
8
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
9
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
10
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
11
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
12
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
13
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
14
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
15
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
16
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
17
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
18
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
19
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
20
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 

चॅम्पिअन्स ट्रॉफी - भारत अडचणीत, सेमीफायनलसाठी करा किंवा मरा

By admin | Published: June 09, 2017 9:04 AM

श्रीलंकेने सात गडी राखून मिळवलेल्या दमदार विजयानंतर भारताचं गणित बिघडलं असून आता करा किंवा मरा अशी परिस्थिती झाली आहे

ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 9 - आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफीसाठी दावेदार समजल्या जाणा-या भारतीय संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. श्रीलंकेने सात गडी राखून मिळवलेल्या दमदार विजयानंतर भारताचं गणित बिघडलं असून आता करा किंवा मरा अशी परिस्थिती झाली आहे. चॅम्पिअन्स ट्रॉफी सुरु होण्याआधी भारत सहजपणे फायनल गाठेल असा दावा केला जात होता, मात्र श्रीलंकेने 321 धावांचा पाठलाग करताना भारतावर सात गडी राखत सहज विजय मिळवला. श्रीलंकेचा पराभव केला असता तर भारत सहजपण सेमीफायनलमध्ये पोहोचला असता. पण सेमीफायनलमध्ये पोहोचणं भारतासाठी आता तितकं सोपं नसणार आहे.
 
(फलंदाजांची चमक, लंकेची सरशी)
(भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची संधी : ब्रेट ली)
(पाकिस्तान विजयी)
 
ग्रुप बी मध्ये आता फक्त दोनच सामने बाकी आहे. रविवारी भारतीय संघ आयसीसी वनडे रँकिंगमधअये पहिल्या क्रमांकावर विराजमान असलेल्या दक्षिण अफ्रिकेसोबत दोन हात करणार आहे. तर सोमवारी पाकिस्तान आणि श्रीलंका आपापसात भिडणार आहेत. सेमीफायनलमध्ये कोणते दोन संघ पोहोचतील हे या दोन्ही सामन्यांचा निकालच ठरवणार आहे. 
 
दक्षिण अफ्रिकेविरोधात करा किंवा मरा
भारताचा पुढील सामना रविवारी दक्षिण अफ्रिकेसोबत होणार आहे. या सामन्याला हवं तर क्वार्टर फायनलही म्हणू शकतो. हा सामना जिंकणा-या संघाचं सेमीफायनलमधील स्थान जवळपास नक्की होईल. जर भारताने दक्षिण अफ्रिकेचा पराभव केला तर भारताचं सेमीफायनलचं तिकीट नक्की होईल. पण जर भारताचा पराभव झाला तर आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफी 2017 मधील त्यांचा प्रवास तिथेच संपेल. 
 
पाकिस्तान आणि श्रीलंकेची क्वॉर्टर फायनल
सोमवारी ग्रुप बी मधील पाकिस्तान आणि श्रीलंका आपापसात भिडतील. भारतासमोर शरणागती पत्करलेल्या पाकिस्तान संघाने दक्षिण अफ्रिकेचा पराभव करत चॅम्पिअन्स ट्रॉफीमधील आपलं आव्हान कायम ठेवलं आहे. सोमवारी हा सामना जिंकणारा संघही सेमीफायनलमध्ये आपलं स्थान नक्की करेल. 
 
पाऊस निभावू शकतो महत्वाची भूमिका
इंग्लंडमध्ये खेळल्या जात असलेल्या चॅम्पिअन्स ट्रॉफीत आतापर्यंत पावसाने अनेक सामन्यांचा निकाल ठरवला आहे. जर उर्वरित सामन्यांमध्येही पावसाने व्यत्यय आणल्यास परिस्थिती अजून उत्साहवर्धक होऊ शकते. जर भारत आणि दक्षिण अफ्रिकेच्या सामन्यात पाऊस पडला तर तर दोन्ही संघांना एक - एक अंक दिला जाईल, ज्यानंतर दोघांचे तीन अंक होतील. यानंतर श्रीलंका आणि पाकिस्तानध्ये होणा-या सामन्यात विजयी संघाचे चार अंक होतील आणि तो संघ सेमीफायनलमध्ये दाखल होईल. यानंतर अंतिम चार संघात जाणारा दुसरा संघ रनरेटच्या आधारे ठरवण्यात येईळ.