शहरं
Join us  
Trending Stories
1
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
2
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
3
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
4
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
5
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
6
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
7
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
8
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
9
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
10
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
11
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
12
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
13
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
14
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
15
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
16
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
17
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
18
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
19
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
20
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ

खेळपट्टीबाबतचा दृष्टिकोन बदलावा : हरभजन सिंग

By admin | Published: September 20, 2016 5:21 AM

अनिल आणि विराट दोघेही सकारात्मक असून ते अशा खेळपट्टीवर खेळण्यास पसंत करतील, ज्यावर सामन्याचा निकाल चौथ्या किंवा पाचव्या दिवशी लागेल,

नवी दिल्ली : ‘‘गेल्या तीन-चार वर्षांपासून संघव्यवस्थापनाने अशा खेळपट्ट्यांना प्राधान्य दिले आहे, ज्यावर कसोटी सामना तीन दिवसांतच संपतो. मात्र माझ्या मते, अनिल आणि विराट दोघेही सकारात्मक असून ते अशा खेळपट्टीवर खेळण्यास पसंत करतील, ज्यावर सामन्याचा निकाल चौथ्या किंवा पाचव्या दिवशी लागेल,’’ असे स्पष्ट मत भारताचा दिग्गज आॅफस्पिनर हरभजनसिंग याने व्यक्त केले. आगामी न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या पार्श्वभूमीवर भज्जीने आपले मत मांडले. भज्जी म्हणाला, ‘‘कसोटी क्रिकेट म्हणजे सामन्याच्या पाचही दिवशी विविध स्तरांवर खेळाडूंचा मोठा कस लागतो. जर, आपण पूर्णपणे फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर अवलंबून राहिलो, तर त्याचा मोठा फटकादेखील आपल्याला बसू शकतो. याचे परिणाम आपण टी-२० विश्वचषक नागपूर सामन्यात पाहिलेच आहेत. किवी संघाचे मिशेल सँटेनर आणि इश सोढी याबाबत धोकादायक ठरू शकतात.’’ ‘‘फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर आपल्याला नक्की बळी मिळतील. मात्र, अशीदेखील वेळ येईल जेव्हा गोलंदाजालाच चेंडूच्या टप्प्याचा व दिशेचा अंदाज येणार नाही. कोणता चेंडू उसळेल आणि फिरकी घेईल याचाही अंदाज येणार नाही,’’ असेही भज्जीने या वेळी सांगितले.त्याचवेळी भज्जीने वेगवान गोलंदाजांकडे लक्ष वेधताना, इशांत शर्मा आणि मोहम्मद शमीसारख्या वेगवान गोलंदाजांना अधिक षटके टाकण्याची संधी मिळावी, असेही म्हटले. (वृत्तसंस्था)