शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

राष्ट्रकुल नेमबाजी भारतात होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 07:49 IST

ही सकारात्मक प्रतिक्रिया ५ डिसेंबर रोजी म्युनिच येथे सीजीएफ आणि आंतरराष्टÑीय

नवी दिल्ली : बर्मिंगहॅम (२०२२) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून नेमबाजी वगळण्यात आल्यानंतर भारताने कडवा विरोध दर्शविला. त्याचा परिणाम म्हणून राष्ट्रकुल नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेचे यजमानपद भारताला सोपविले जाण्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रकुल क्रीडा महासंघाने (सीजीएफ) भारतीय ऑलिम्पिक संघटनेला (आयओए) यासंदर्भात औपचारिक प्रस्ताव पाठविण्याची सूचना केली. हा प्रस्ताव जानेवारीच्या सुरुवातीला सीजीएफच्या क्रीडा समितीपुढे मांडण्यात येणार असून, मंजुरीसाठी कार्यकारी समितीकडे पाठविला जाईल.

ही सकारात्मक प्रतिक्रिया ५ डिसेंबर रोजी म्युनिच येथे सीजीएफ आणि आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघादरम्यान (आयएसएसएफ) झालेल्या बैठकीनंतर आली आहे. आयओए प्रमुख नरिंदर बत्रा यांना लिहिलेल्या पत्रात सीजीएफ प्रमुख म्हणाले,‘भारतीय राष्टÑीय रायफल महासंघाचे अध्यक्ष रानिंदर सिंग आणि ब्लादिमीर लिसिन यांच्यातील चर्चेत हा मुद्दा चर्चेला आला. २०२२ च्या राष्टÑकुल स्पर्धेआधी नेमबाजी राष्टÑकुल चॅम्पियनशिपचे आयोजन भारतात करावे, असे सुचविण्यात आले.’सीजीएफने पत्रात म्हटले की, ‘एनआरएआयने भारत सरकारच्या परवानगीने प्रस्ताव सादर करावा. या प्रस्तावास मंजुरी मिळताच स्पर्धा आयोजनास सहकार्य केले जाईल. एनआरएआय प्रमुखांनीदेखील या प्रस्तावास होकार दिला आहे. रानिंदर यांनी पत्रात लिहिले की, या प्रस्तावित स्पर्धेमध्ये खेळाडूंना दिली जाणारी पदके राष्टÑकुलमधील पदकांइतकी महत्त्वपूर्ण मानली जावीत.’ प्रस्तावित चॅम्पियनशिपचे आयोजन १४ मार्च २०२२ पासून करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.आयओएने नेमबाजी राष्टÑकुलमधून वगळण्यात येताच, या खेळावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली होती. याशिवाय नेमबाजी स्पर्धांचे आयोजन इतर देशात करावे तसेच ही पदके राष्टÑकुल पदकांच्या खात्यात जमा व्हावी, असा उपायदेखील सुचविला होता.

टॅग्स :ShootingगोळीबारCommonwealth Games 2018राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१८